राजकीय क्षेत्रात सक्रिय होण्याचा तुमचा विचार आहे. या क्षेत्रातले तुमचे आदर्श कोण?
'प्रत्येक घरात शाम उपक्रम : साने गुरुजी' या उपक्रमाच्या माध्यमातून साने गुरुजी यांच्या 'श्यामची आई'चा आदर्श डोळयासमोर ठेवून श्यामची आई संस्कार स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात 550 महिला सहभागी झाल्या. त्यातून 5 मातांना पैठणी देऊन सन्मानित केले होते.
तरुणांसमोरचा बेरोजगारीचा प्रश्न डोळयासमोर ठेवून चाळीसगावात युवक रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात 2500 युवकांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी 10वी, 12वी व ITI उत्तीर्ण 1600 जणांना नियुक्ती पत्र मिळाले.
चाळीसगावातील वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांना विविध वनस्पतींची माहिती व्हावी, म्हणून डॉ. विनोद कोतकर बोटॅनिकल गार्डन तयार करून कवयित्री बहिणाबाई उ.म. विद्यापीठाचे कुलगुरूंच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. या ठिकाणी 46 प्रकारच्या दुर्मीळ वनस्पती आहेत.
या सगळया उपक्रमांबरोबरच, ई-लर्निंग ही काळाची गरज आहे हे ओळखून ग्रामीण विद्यार्थ्यांना त्याचे ज्ञान मिळावे म्हणून मी ज्या तळवाडे येथील शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले आहे त्या शाळेतील एका वर्गाचे डिजिटायझेशन केले.
तसेच गेल्या चार वर्षांपासून वृक्ष लागवडीचा एक अभिनव उपक्रम आम्ही आई फाउंडेशनच्या माध्यमातून राबवीत आहोत. माझ्या हॉस्पिटलमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाच्या घरी जाऊन मी एक वृक्ष लावतो. पुढे त्या झाडाचे संगोपन ते कुटुंब करते. या माध्यमातून आजवर सुमारे 3500 झाडे लावली आहेत. या वर्षी 876 वृक्षांची लागवड केली.
सामाजिक आणि वैद्यकीय कामात तुम्ही इतके व्यग्र असताना राजकीय क्षेत्रात जाण्याचा विचार कसा मनात आला?
वैद्यकीय पेशाच्या माध्यमातून आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून मी सामाजिक काम करतोच आहे. मात्र अशा प्रकारच्या कामाला मर्यादा येतात, याची मला जाणीव झाली. सामाजिक कामाची व्याप्ती आणि प्रभाव वाढविण्यासाठी राजकारण आणि त्यातही सत्तेच्या राजकारणात सहभागी होणे आवश्यक आहे, असे मला वाटते. चाळीसगावच्या ए.बी. हायस्कूलच्या माध्यमातून ते मला जाणवले. या संस्थेत सचिव म्हणून काम करताना, पद असले तर आपण अधिक चांगल्या प्रकारे विकासकामे करू शकतो याचा अनुभव घेतला. स्वच्छ प्रतिमा घेऊन राजकारण करता येते. शासन व प्रशासन सोबत असेल तर अनेक पटींनी कामे करता येतात. भविष्यात सत्तेच्या राजकारणात एखादे पद मिळाले, तर तेही सामाजिक कामासाठीचे प्रभावी माध्यम म्हणूनच वापरण्याची इच्छा आहे.
समाजकारणासाठी राजकारणात सहभाग असा तुमचा विचार आहे हे लक्षात आले. त्यापलीकडे अाणखी काय उद्दिष्टे आहेत?
आई हॉस्पिटलच्या माध्यमातून किंवा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मी काम करतोच आहे. भविष्यात सत्तेच्या राजकारणात सहभागी होण्याची संधी मिळाल्यास शेती, युवा, वीज व पाणी, महिला व आरोग्य, शिक्षण या पंचसूत्रीवर आधारित माझ्या कामाची रचना असेल.
शेतीचे अद्ययावत ज्ञान शेतकऱ्यांच्या दारापर्यंत न्यायचे आहे. वीज व पाणी या नैसर्गिक साधनांवर लक्ष केंद्रित करणे, सौर ऊर्जेच्या अधिकाधिक वापरासाठी उपक्रम आखणे याकडे मी लक्ष देईन. अनेक समस्यांनी शेतीचे क्षेत्र पॅरालाइज झाले आहे. अद्ययावत माहिती, साधने, माती परीक्षण करून शेतकरी शेती करतील यासाठी कार्यशाळा आयोजित करून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करेन.
पिण्याचे पाणी ही तालुक्याची मोठी समस्या आहे. 140 गावांपैकी 50 गावात आजही टँकरने पाणी पुरविले जाते. पाण्याच्या नियोजनाचा अभ्यास करून आमचा तालुका टँकरमुक्त करण्याचा मी प्रयत्न करीन.
थोडक्यात, राजकारणाच्या माध्यमातून समाजातील अधिकाधिक समस्यांवर तोडगा शोधायचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल.
- मुलाखत : चिंतामण पाटील