‘विवेक विचार मंचा’कडून पालघर हत्याकांडाच्या सखोल चौकशीची मागणी
पुणे : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात गडचिंचले गावी जमावाने पोलिसांसमक्ष दोन साधूंसह तिघांच्या केलेल्या निर्घृण हत्येने देशभरात खळबळ उडाली आहे. याप्रकारे पोलिसांसमक्ष वा पोलिसांवर हल्ले करणाऱ्या घटनांमध्ये शासनविरोधी, अराजकवादी, सामाजिक संघर्ष निर्माण करू पाहणाऱ्या जहाल डाव्या व फुटीरतावादी व्यक्ती किंवा संघटनांचा हात असण्याची शक्यता ‘विवेक विचार मंच’ या संघटनेने व्यक्त केली असून, या घटनेतील हल्लेखोरांना चिथावणी देणारे किंवा जमावाची दिशाभूल करणारे लोक वा संघटना कोणत्या याची सखोल चौकशी करण्याची मागणीही ‘विवेक विचार मंचा’ने केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष प्रदीप रावत व कार्यवाह महेश पोहनेरकर यांनी याबाबत पत्रक प्रसिद्ध केले असून यामध्ये पालघर – गडचिंचले घटने
डाव्या व फुटीरतावादी संघटनांकडून चिथावणी?
भारतीय कायदे अमान्य करणारे लाल रंगाचे फलक डहाणू तालुक्यातील काही गावांत गेल्यावर्षी झळकले होते, याची आठवण करून देत डहाणू परिसरात कायदा व्यवस्थेच्या विरोधात काम करणारे संशयास्पद गट सक्रीय असल्याचे दिसते, असेही विवेक विचार मंचने या पत्रकात म्हटले आहे. तसेच, त्यामुळे गडचिंचले