निसर्गस्नेही सहजीवनाची पंचवीस वर्षं

विवेक मराठी    02-Mar-2021
Total Views |

कुडावळे या छोट्याशा खेडेगावात गेली पंचवीस वर्षं निसर्गस्नेही जीवनशैली जगणारं आणि अशा जीवनशैलीविषयी व्यापक प्रबोधन करणारं जोडपं म्हणून दिलीप आणि पौर्णिमा कुलकर्णी अख्ख्या महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटीतून केलेलं हे हितगुज.

 
pryavaran_2  H


माझे
महाविद्यालयातले दिवस फार द्विधा मन:स्थितीत गेले. अर्थशास्त्र विषय घेतलेला आणि दिलीप कुलकर्णींच्या विचारांनी भारावून गेलेलो! एका बाजूला वर्गातजीडीपी कसा वाढवायचा, जास्त उपभोग म्हणजे जास्त आर्थिक विकासहे अर्थशास्त्रातले सिद्धान्त शिकत होतो आणि घरी येऊन दिलीप कुलकर्णींचीप्लास्टिक वापरायचं नाही’, ‘इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरायच्या नाहीत’.. . . ‘संयमित उपभोगाचीतत्त्वं वाचत होतो. उपभोगवादामुळे निसर्गाचा होणारा अपरिमित र्हास ही वस्तुस्थिती असल्याने दिलीप कुलकर्णींचे विचार पटत होते; पण लोकांनी गाड्याच घेतल्या नाहीत, मोबाइल-कॉम्प्युटर वापरलाच नाही, प्लास्टिकवर आणि कचरा करणार्या इतर सर्व वस्तूंवर बंदी आणली तर अर्थव्यवस्था भुईसपाट होईल, त्याचं काय? हा प्रश्न पडत होता. मनातलं हे द्वंद्व आजही पूर्णतः संपलेलं नाही, कदाचित संपणारही नाही. पण गेली पंचवीस वर्षंनिसर्गस्नेही जीवनशैलीहे व्रत म्हणून घेऊन जगणार्या या आचारनिष्ठ दांपत्याला प्रत्यक्ष भेटून गप्पा मारायची तीव्र इच्छा होती. नुकताच हा योग जुळून आला.
 

गेल्याच महिन्यातला एक दिवस ठरवून सकाळी एकटाच एसटीने कुडावळ्याला दिलीपकाकांच्या घरी पोहोचलो. शेणाने सारवलेल्या मातीच्या घराच्या पडवीत कट्ट्यावर, पौर्णिमाकाकूंनी खास त्यांच्या पद्धतीने केलेल्या गुळाच्या खमंग चहाचे घोट घेत काका-काकूंशी गप्पा रंगल्या.

 

कुडावळ्यासारख्या छोट्याशा खेडेगावात, मर्यादित गरजांमध्ये, शरीरश्रमावर आधारित पर्यावरणपूरक जीवनशैली जगण्याचा प्रयोग तुम्ही गेली पंचवीस वर्षं करत आहात. हा प्रयोग शंभर टक्के यशस्वी झालाय असं आज आपल्याला वाटतं का?” मी प्रश्न केला.

 
शंभर टक्के नाही.” काका उत्तरले.
 

एखादं तत्त्वज्ञान प्रत्यक्ष आचरणात आणताना त्यात काही उणिवा राहतात. पण शंभर टक्क्यांचं ध्येय आपण जेव्हा ठेवतो, तेव्हा किमान त्याच्या जास्तीत जास्त जवळ कसं जाता येईल हा प्रयत्न असतो. आमच्या हल्लीच प्रकाशित झालेल्यास्वप्नामधील गावां...’ या पुस्तकात आम्हाला काय काय गोष्टी जमल्या आणि काय काय नाही जमल्या, त्यानुसार आम्ही स्वतःलाच ‘100पैकी गुणदिले आहेत. 1996च्या सुमारास आम्ही कुडावळ्याला जमीन भाड्याने घेऊन मातीचं घर बांधलं, जे आजही उत्तम स्थितीत आहे आणि आम्ही त्यात आनंदाने राहत आहोत. वीज आम्हाला घ्यायची नव्हती, पण त्यामुळे काही अडचणी निर्माण व्हायला लागल्या, म्हणून विजेची जोडणी करून घेतली. पण घरात बाकी कुठलं इलेक्ट्रॉनिक यंत्र नाही, त्यामुळे आमचा महिन्याचा वीजवापर फक्तएक ते दोन युनिटएवढा कमी राखण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. सुरुवातीला आमच्याकडे गॅस होता, पण 2004 साली आम्ही तो काढून टाकला आणि आता पूर्ण स्वयंपाक चुलीवरच होतो. सात्त्विक आहार, सूर्योदय-सूर्यास्तानुसार सम्यक दिनचर्या या गोष्टीही बर्यापैकी जमल्या आहेत. "प्लास्टिकचा वापर पूर्णतः टाळणं शक्य नाही झालेलं" अनेक ठिकाणी प्रवास होतो, त्यासाठी पेट्रोल-डिझेल जाळलं जातं. पण सार्वजनिक वाहनानेच फिरायचं हा नियम मात्र आम्ही कटाक्षाने पाळत आलो आहोत. संपर्कासाठी साध्या मोबाइलचा वापर करतो. लिखाणासाठी कागद-पेन वापरावं लागतं. त्यामुळे पर्यावरणीय निकषांवर स्वतःच्या जीवनशैलीचं मूल्यमापन करताना आम्ही 100पैकी 50 गुणांवरच आहोत. आणि लोकांनाही आमचं हेच सांगणं असतं की अशा प्रकारे प्रत्येकाने आपापलं मूल्यमापन करत राहावं आणि आपलास्कोअरवाढवत राहावं.”

 
pryavaran_1  H

स्वतःच्या जीवनशैलीच्या पर्यावरणपूरकतेचं स्वतःच गुणांकन करायचं ही काका-काकूंची आयडिया भन्नाट तर आहेच, तशीच आपला पर्यावरणीय पाऊलठसा (Ecological footprint) कमी करण्यासाठी किती मार्गदर्शक ठरणारी आहे!


पण काका, एकट्यादुकट्याने प्लास्टिक वगैरे वापरून प्रदूषणाचा प्रश्न सुटणारे का? त्यासाठी उत्पादनावरच बंदी नको का यायला?” मी प्रतिप्रश्न केला.

 

बंदी खरं तर हवीच! पण हे होत नाही, कारण त्यात उद्योजकांची कोट्यवधीची गुंतवणूक असते, अनेकांचा रोजगार अवलंबून असतो आणि सरकारला त्यातून कररूपाने भरपूर उत्पन्न मिळत असतं. एक साधं उदाहरण घेतलं, तर लिंबू सरबत, कैरीचं पन्हं अशी स्थानिक, आरोग्यदायक आणि रुचकर पेयं प्रत्येकाला घरी बनवून सेवन करणं शक्य आहे. पण तरीही, उत्पादन-पॅकिंग-साठवण-वाहतूक यांमध्ये प्रचंड ऊर्जा खर्च होणार्या आणि प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा कचरा करणार्या ब्रँडेड शीतपेयांना सरकार का परवानगी देतं? कारण त्यातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो! त्यामुळे उत्पादनावर बंदी ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. जागतिक राजकारणात पर्यावरणाला नेहमीच दुय्यम स्थान राहिलं आहे. त्यातल्या त्यात भूतान आणि क्यूबा या दोन देशांनी काहीसे वेगळ्या विकासनीतीचे प्रयत्न करून बघितले; पण अन्य ठिकाणी कुठेचराष्ट्रीय धोरणम्हणून पर्यावरणरक्षणाला प्राधान्य दिलं गेलेलं नाही. भारतही आंतरराष्ट्रीय दबावापोटी या बाबतीत काही ठाम भूमिका घेऊ शकत नाही. तेव्हा या गोष्टींचा फार विचार करता, एक ग्राहक म्हणून निसर्गाची हानी करणार्या वस्तू नाकारणं एवढंच आपल्या हातात उरतं आणि किमान ते तरी आपण करावं.” काका उत्तरले.


तुमच्या एकंदर जगण्यात आणि विचारांमध्ये भारतीय आयुर्वेदाचा आणि अध्यात्माचा खूप प्रभाव जाणवतो. या दोघांचा पर्यावरणाशी नेमका कसा संबंध आहे?” मी उत्सुकतेने विचारलं.


आयुर्वेदाची दोन मूळ उद्दिष्टं आहेत - ‘स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणमआणिआतुरस्य व्याधी हरणं’. ही उद्दिष्टं गाठण्यासाठी आयुर्वेदामध्ये जी काही दिनचर्या आणि जीवनशैली सांगितली आहे, ती शंभर टक्के पर्यावरणपूरक अशीच आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदिक औषधं ही अत्यंत कमी ऊर्जा खर्च करून, साध्या यंत्रांचा आणि शारीरिक बळाचा वापर करून, घरगुती पद्धतीने बनवता येऊ शकतात. त्यांचं स्थानिक उत्पादन शक्य आहे. याउलट ॅलोपॅथिक औषधं मोठ्या यंत्रांवर, प्रचंड ऊर्जा खर्च करून, केंद्रीकृत पद्धतीने बनवावी लागतात. या निकषावरही आयुर्वेद जास्त पर्यावरणपूरक ठरतो.

 

भारतीय अध्यात्म असं सांगतं की खरा आनंद हा अधिक उपभोगांमध्ये नसून तोमन शांत होण्यातआहे. सूर्योदय, सूर्यास्त, वारा, पाऊस, झाडांना पालवी येणं, पक्ष्यांचा किलबिलाट या सगळ्या निसर्गातल्या विविध क्रियांचा आस्वाद घेणं, काहीतरी नियमित श्रमाचं काम करून घाम गाळणं, देवाचं नामस्मरण करणं अशा गोष्टींमधूनही मन शांत होतं आणि आनंद मिळतो, ज्यामध्ये ऊर्जा आणि संसाधनं वापरली जात नाहीत. यात एक उत्कट रसिकता असते. याउलट उपभोगांमधल्या आनंदात एक प्रकारचीवखवखअसते. अध्यात्म माणसाला अतिरेकी उपभोगांच्या मागे लागता आनंदी राहायला शिकवतं, म्हणून पर्यावरणदृष्ट्या त्याचं महत्त्व आहे. कुसुमाग्रजांची एक फार सुंदर उक्ती आहे - ‘मी म्हणोनि सोडिला हा नाद आता मंजिलाचा। चालण्याचे श्रेय आहे अन्य धर्माचार नाही.’ बुद्धीच्या साहाय्याने मनावर ताबा ठेवत राहणं ही एक नित्य साधना आहे आणि ती प्रत्येकाने आपापल्या पातळीवर सुरू ठेवायची आहे.”


भारतीय तत्त्वज्ञानातल्या निसर्गविचाराबाबत आपण बोललो. हा निसर्गविचार पाश्चात्त्य संस्कृतीत आढळतो का?” माझी आणखी एक उत्सुकता.


आढळतो की! चारशे वर्षांपूर्वी जगातली सगळी माणसं निसर्गस्नेहीच जगत होती. कारण निसर्गाच्या मर्यादा ओलांडणारं तंत्रज्ञान मानवाच्या हाती नव्हतं. अठराव्या शतकात धार्मिक विचार मागे पडून जडवादी विचार लोकप्रिय होणं आणि त्याच वेळी वेगवेगळे तांत्रिक शोध लागणं या दोन्ही गोष्टी युरोपात एकदम झाल्यामुळे निसर्गाच्या मर्यादा ओलांडल्या जाऊ लागल्या आणि मग त्याला काही सुमारच राहिला नाही. पण अमेरिकेतही थोरोसारखे काही विचारवंत होऊन गेले, ज्यांनी निसर्गाच्या मर्यादा ओळखल्या होत्या आणि या मर्यादांचा आदर करण्याचा विचार मांडला होता. अमेरिकेतल्या रेड इंडियन जमाती किंवाआमिषलोक अत्यंत साधी जीवनशैली जगतात. अमेरिकन उपभोगवादाचं वारंही ते लागू देत नाहीत. युरोप, जपान या आणि अनेक विकसित राष्ट्रांमध्ये अलीकडे ऐच्छिक साधेपणा (Voluntary Simplicity), ‘मिनिमलिझम (Minimalism)’ अशा नव्या जीवनपद्धती ज्यांमध्येगरजा मर्यादित ठेवणंहा मुख्य विचार आहे, याचं स्वागतच करायला हवं. फरक इतकाच की भारतीय संस्कृतीमध्ये अशा जीवनपद्धतीचा संबंधमोक्षाशीवा अध्यात्माशी जोडलेला आहे. पाश्चात्त्य संस्कृतीमध्ये शुद्ध भौतिक प्रेरणेतून असे विचार पुढे आलेले आहेत.” काकांनी संदर्भासहित स्पष्टीकरण केलं.


pryavaran_3  H

दिलीपकाकांनी
घरीसोलर पॅनलमुद्दाम बसवलेलं नाही, हे माहीत होतं. त्याची नेमकी कारणमीमांसा त्यांच्याकडून जाणून घ्यायची होती म्हणून विचारलं, “आज सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, विजेवर चालणार्या गाड्या, एलइडी बल्ब . प्रकारच्याहरित तंत्रज्ञानक्षेत्रात मोठी क्रांती घडून येत आहे आणि हा पर्यावरणरक्षणाचा उपाय म्हणून जगासमोर ठेवला जातोय. हेहरित तंत्रज्ञानकितपत प्रभावी ठरणारं आहे?”


छे! हे तंत्रज्ञानहरितबिलकुल नाही, तर आणखीकाळंआहे.” काका उत्तरले.

 

म्हणजे??”


त्याचं कारण म्हणजे हे सगळं तंत्रज्ञानरूपांतरित ऊर्जेवरआधारलेलं आहे. भौतिकशास्त्रीय नियम सांगतो की ऊर्जेचं एका प्रकारातून दुसर्या प्रकारात रूपांतर करताना ऊर्जेची नासाडी होत असते. एक सोलर पॅनल बनवण्यासाठी जेवढी ऊर्जा लागते, तेवढी ऊर्जा ते सोलर पॅनल आयुष्यभरात निर्माण नाही करू शकत. इलेक्ट्रिक वाहन वापरताना, त्याची बॅटरी बनवण्यासाठी लागणारी ऊर्जा, ती बॅटरी बाद झाल्यानंतर तिची विल्हेवाट लावण्यासाठी लागणारी ऊर्जा आणि या सगळ्यासाठी जाळली जाणारी जीवाष्म इंधनं यांचं गणित कधी कोणी आपल्यासमोर मांडत नाही. हे गणित भौतिकशास्त्रातल्याएंट्रॉपीच्या नियमानुसारउणेच’ (negative) येतं. ऊर्जेचाथेटवापरच निसर्गाची तुलनेने कमी हानी करतो. त्यामुळे रेल्वे चालवायचीच असेल तर ती विजेवर चालवायच्याऐवजी कोळशावर वा डिझेलवरच चालवावी. अंतिमतः ऊर्जापिपासू तंत्रज्ञानाचा अवलंब कमीत कमी करून साध्या, शारीरिक शक्तीवर चालणार्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणं हाचशाश्वत विकासाकडेजाण्याचा एकमेव मार्ग आहे.” काकांनी अगदी रोखठोक उत्तर दिलं.


अनेकांना
दिलीपकाकांचं हे म्हणणं धक्कादायक वाटेल, पण केवळहरित तंत्रज्ञानया शब्दाला भुलता भौतिकशास्त्रीय गणितं करूनच आपण योग्य निष्कर्षापर्यंत यायला हवं, हे काकांशी बोलताना जाणवलं.


तुम्ही चूल वापरता, याविषयी अनेक लोक आक्षेप घेतात. चुलीसाठी लाकडं जाळली जातात, त्यामुळे धूर आणि प्रदूषण होतं, मग चूल पर्यावरणपूरक कशी?”

 

त्याचं असं आहे की, चुलीमध्ये लाकडं जाळणं ही एककार्बन न्यूट्रल प्रोसेसआहे. आपण आजूबाजूच्या परिसरातून लाकडं गोळा करतो, ती जाळल्यावर कार्बन डाय ऑक्साइड तयार होतो आणि तो त्याच परिसरातल्या झाडांकडून पुन्हा शोषला जातो. खनिज तेल किंवा कोळसा जाळताना आपण पाच लाख वर्षांपूर्वी जमिनीखाली गाडला गेलेला कार्बन बाहेर काढतो आणि तो हवेत सोडतो. त्यामुळे ती प्रक्रियाकार्बन न्यूट्रल राहताकार्बन पॉझिटिव्हबनते आणि वातावरणातलं कार्बन डाय ऑक्साइडचं प्रमाण वाढून तापमानवाढ होते. आता, अन्न अजिबात शिजवता नुसती कच्ची फळं, कंद वगैरे खाऊन राहायचं म्हटलं, तर ते निश्चितपणे चुलीपेक्षा जास्त पर्यावरणपूरक ठरेल. पण गॅस, इंडक्शन कुकर, स्टोव्ह या सगळ्यांपेक्षा चूल अधिक पर्यावरणपूरक ठरते. धूर कमी होईल आणि तो नाकातोंडात जाणार नाही अशा पद्धतीने चुलीची रचना केलेली असल्याने आम्हाला श्वसनाचा वगैरे त्रास कधीच झालेला नाही.” पौर्णिमाकाकूंनी खुलासा केला.


स्वतः निसर्गनियमांच्या चौकटीत राहून जगणं याचबरोबर त्याबद्दल व्यापक जनजागृती करणं हे कार्यसुद्धा तुम्ही गेली पंचवीस वर्षं करत आहात. याला लोकांचा एकंदर प्रतिसाद कसा आहे? अपेक्षित बदल खरंच होतोय का?”


खरं सांगायचं झालं, तर एकंदर चित्र नकारात्मकच आहे. जगाने स्वीकारलेली विकासनीती, प्रसारमाध्यमांचा जबरदस्त प्रभाव हे सगळं माणसाला उपभोगाच्या प्रवाहात वाहून नेणारं आहे. पण आपण हताश होता निष्काम कर्मयोग्याप्रमाणे प्रबोधनकार्य करत राहायचं, हे आम्ही ठरवलेलं आहे आणि आम्ही ते करतो आहोत. काही सकारात्मक चित्रंही दिसतात. आमच्याकडून प्रेरणा घेऊन काही लोक शहर सोडून गावात येऊन राहिले, काही लोकांनी घरातला फ्रीज काढून टाकला, काहींनी आइसक्रीम खाणं सोडलं, काही लोक चारचाकीवरून सायकलवर आले. असे काही बदल लोक करतायत. अगदीच नाही असं नाही.”


बरेचदा असं होतं की, आपल्याला पर्यावरणाबद्दल आस्था असते, पण तरीही, ‘लोक काय म्हणतील?, वृद्धापकाळी आपलं कसं होईल?, आपल्या मुलांच्या भवितव्याचं काय?’ अशा सांसारिक विवंचना माणसाला पैशाच्या मागे लागायला भाग पाडतात आणि गरजा मर्यादित ठेवणं ही गोष्ट इच्छा असूनही होत नाही. या सांसारिक विवंचना तुम्हाला कितपत भेडसावतात?”


माणसं अधिक पैशाला आणि अधिक उपभोगांनानकोम्हणण्याचं धाडस कितपत दाखवतात त्यावर हे अवलंबून आहे. व्यावहारिक अडचणी असतात हे मान्य आहे. पणकाय होईल ते होईलअसं म्हणून आम्ही पाण्यात उडी मारली. वृद्धापकाळी काही दुर्धर आजार झाला, तर आम्ही सरळ मृत्यूला सामोरे जाऊ. आम्ही आमच्या दोन्ही मुलांना गावातल्याच मराठी शाळेत शिकवलं आणि याबद्दल त्यांची कुठलीच तक्रार नाहीये. शिवाय, आमच्यासारखंच त्यांनी जगलं पाहिजे असा आग्रहही आम्ही ठेवलेला नाही. त्यांची ध्येयं गाठायला त्यांना मोकळीक आहे. दोघेही आपापल्या व्यवसायांमध्ये उत्तम प्रगती करत आहेत.”


दिलीपकाका
आणि पौर्णिमाकाकू दोघांशी गप्पा म्हणजे एक तत्त्वचिंतन होतं. त्यांच्या स्वभावातला प्रेमळपणा, हसतमुखपणा, निसर्गावरची अपार निष्ठा, ज्ञानाची आणि विचारांची खोली, वृत्तीतली लवचीकता आणि आपल्या मर्यादा मान्य करण्याची तयारी हे व्यक्तिमत्त्वाचे सर्व पैलू त्यांच्याशी संवाद साधताना उलगडत होते. महाराष्ट्रातले अनेक लोक या दांपत्याचे चाहते आहेत, तसंचते अतिरेक करतातअशीही एक प्रतिक्रिया अनेकांकडून कानावर पडली आहे. माणसाच्या केवळ एखाद्या विधानावरून त्यालाजजकरण्यापेक्षा आपण त्याच्या सहवासात काही काळ घालवतो, तेव्हा तो माणूस खर्या अर्थाने कळतो.

 

सुमारे पावणेदोन तासांच्या गप्पांनंतर पोळी-भाजी आणि नारळी भात असंसाधं पण स्वादिष्टभोजन झालं. काका-काकूंच्या घराजवळच शंभर एकरांची एक देवराई आहे. दुपारचा वेळ देवराईत घालवला. खुरईच्या फुलांचा घमघमाट सर्वत्र पसरला होता. रायवळ आंब्याची आणि बेहड्याची उंचच उंच आणि अजस्र झाडं मानेचा व्यायाम घडवत होती. एरवीआंबा-काजू-नारळ-सुपारीमयझालेल्या कोकणात कुठेतरी एका कोपर्यात धार्मिक भावनेने का होईना, पारंपरिक जंगल जपलं गेलंय याचं समाधान वाटलं. जंगलातल्या त्या दुपारच्या नीरव शांततेत वीस मिनिटं डुलकी काढून परतीच्या प्रवासाला निघालो. तो दिवस एक सकारात्मकऊर्जादेऊन गेला!