पाच दिवसांत दोनदा एव्हरेस्टवर चढाई करणारी अंशु जम्सेंपा!

विवेक मराठी    18-Jun-2021
Total Views |

पाच दिवसांत दोनदा एव्हरेस्टवर चढाई करणारी जगातील पहिली महिला अंशु जम्सेंपा!

अंशु जम्सेंपा यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन गिर्यारोहक म्हणून वेगळी वाट निवडली. त्यांच्या पराक्रमाची ओळख पटवून देत केंद्र सरकारने यंदाच्या प्रजासत्ताक दिनी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.


Anshu Jamsempa_1 &nb

 

अंशु जम्सेंपा. 41 वर्षीय अरुणाचल प्रदेशातील बोंबडीला भागातील गिर्यारोहण करणार्या पहिल्या महिला आहेत. सलग पाच दिवसांत दोनदा एव्हरेस्ट सर करण्याचा मान त्यांच्या नावे आहे. अंशु जम्सेंपा नॉर्थ-ईस्ट टूरिझमच्या ब्रँड अँबेसेडर आहेत. आजवर अंशु जम्सेंपा ह्यांनी पाच वेळा एव्हरेस्टवर चढाई केली आहे. अद्वितीय कार्यासाठी ह्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने अलंकृत झाल्या आहेत.

 

 

जर आपला प्रचंड आत्मविश्वास असेल आणि काहीतरी करण्याची जिद्द असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे अंशु जम्सेंपा. प्रत्येकाला आयुष्यात एकदा तरी एखादा डोंगरावर चढावे, एखादे शिखर सर करावे असे वाटत असतेच. जणू काही आपल्याला खूप मोठे बक्षिस मिळाल्याचा आनंद त्यातून मिळतो. अंशु जम्सेंपा ह्यांनी 2017मधील मे महिन्यात सलग 16 मे आणि 21 मे ह्या दोन दिवशी माउंट एव्हरेस्ट सर केला होता. 8848 मीटर म्हणजे (29,028 फूट) अंतर त्यांनी पार केले आहे. आज एव्हरेस्टमधील सर्वात वेगवान डबल क्लाइंबिंग करण्याचा बहुमान त्यांच्या नावाने आहे.

 

16 मे रोजी इतर 17 गिर्यारोहकांसह अंशु जम्सेंपा एव्हरेस्टच्या शिखरावर चढून सकाळी 9.15 वाजता त्यांनी भारतीय राष्ट्रध्वज फडकावला. पुन्हा 19 मे रोजी नेपाळी गिर्यारोहक फूरी शेर्पाबरोबर त्यांची दुसरी चढाई सुरू झाली. जवळजवळ कुठेही थांबता त्यांनी गिर्यारोहण सुरू ठेवले. शिखर दरवाढीच्या अगोदर थोडा थोडा वेळ त्यांनी विश्रांती घेतली आणि शेवटी 21 मे रोजी सकाळी 7.45 वाजता जेनिथ गाठली. मिशन पूर्ण करण्यासाठी त्यांना 118 तास 30 मिनिटे लागली.

2009पासून अंशु जम्सेंपा ह्यांच्या गिर्यारोहण प्रयत्नांना सुरुवात झाली. त्यांनी बर्याच प्रस्तरारोहण (ठेलज्ञ उश्रळालळपस) आणि साहसी खेळांमध्ये सहभाग नोंदवला आहे. अरुणाचल माउंटेनिअरिंग आणि ॅडव्हेंचर स्पोर्ट्स असोसिएशनमधून गिर्यारोहक म्हणून सुरुवात केली आणि ह्यासाठी घरच्यांनी कायमच प्रोत्साहित केले. एकदा सुरुवात केल्यावर मागे वळून पाहण्याची त्यांच्यावर कधीही वेळ आली नाही. प्रशिक्षण कोर्सच्या वेळी जाणवले की डोंगरात उभे राहायला आवडते आणि कुठेतरी माउंट एव्हरेस्टला भेटायचे विचार त्यातून पुढे आले. पहिल्यांदा ही भावना फारच जबरदस्त होती. त्यासाठी त्यांनी सर्व प्रकारचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. माउंट एवरेस्टवर चढाई करण्याच्या आधी त्यांनी इतर लहानमोठ्या शिखरांवर चढाई केली, कारण त्यांना जाण होती की मोठ्या गोष्टीसाठी स्वतःला तयार करण्यासाठी हे करावे लागणार होतेच. हा प्रवासही शून्यातून सुरू झाला आहे. लहानपणी लवकर लग्न झाल्याने आणि अत्यंत गरीब परिस्थितीत असताना प्रसंगी जमीन विकून त्यांनी गिर्यारोहक म्हणून स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आहे.

आज अरुणाचल प्रदेशसारख्या दुर्गम आणि सुदूर भागातील असूनसुद्धा जिद्द आणि काही करण्याची उमेद त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि गिर्यारोहक म्हणून वेगळी वाट त्यांनी निवडली. त्यांच्या पराक्रमाची ओळख पटवून देत केंद्र सरकारने यंदाच्या प्रजासत्ताक दिनी त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा आहेत.