जागतिक वारसास्थळ मानांकन प्राप्त झालेल्या रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि जिंजी ह्या शिवदुर्गाकडे पाहिल्यास त्यांचे शिवकाळातील अस्तित्व किती वैशिष्ट्यपूर्ण होते हे कळून येते. मराठ्यांचा विश्वपटलावर आले हे पहिले यश आहे. खरे काम आता करावे लागणार आहे. ऊन-वारा-पाऊस ह्या त्रयींशी सामना करीत उभे असलेले शिवदुर्ग यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन कार्य वाढीस लागले पाहिजे. हे संचित सांभाळू आणि पोहोचवू शकलो तरच ह्या मानांकनाच्या अभिमानाला खरा अ
पुढील काही वर्षांत भारताने अंतराळ क्षेत्रात अनेक लक्ष्ये निश्चित केली आहेत. त्यांतील एक म्हणजे 2027 सालची गगनयान मोहीम. त्याची तयारी सुरू असली आणि अंतराळवीरांचे प्रशिक्षण सुरू असले तरी ते ‘सिम्युलेटर’च्या साह्याने. गगनयान मोहिमेचे अंदाजपत्रक सुमारे 20 हजार कोटी रुपयांचे आहे. ती मोहीम यशस्वी करायची तर भारतीय अंतराळवीराने काही काळ तरी अंतराळात प्रत्यक्षात जाऊन अनुभव घेऊन येणे निकडीचे हे ‘अॅक्सिअम -4’ मोहिमेत स्थान मिळविण्यासाठी 548 कोटी रुपये खर्च करण्याचे मुख्य प्रयोजन! शुक्ला यांना आता अंतराळ मोहिमेतील सर्
वारीमध्ये सर्व स्तरांतील लोक सहभागी होतात, त्याचप्रमाणे वारी ही परंपरागतदेखील आहे. थोडक्यात एकाच घरात वारीची परंपरा पिढ्यानुपिढ्या चालत असते आणि वारीशी जोडलेली मूल्यपरंपरा एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे संक्रमित होत असते. म्हणजेच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक घोंगडीचे उभे आणि आडवे धागे वारीमध्ये गुंफले जात असतात. गावागावांतून सर्व स्तरांतून वारीममध्ये सहभागी होणारे वारकरी त्यांच्या माध्यमातून वारकरी मूल्यं समाजाच्या कानाकोपर्यात पोहोचतात. पिढ्यांपर्यंत हा ऐतिहासिक आणि शाश्वत ठेवा पोहोचतो आहे. वारीच्या माध्यमात
’पाऊले चालती पंढरीची वाट’ हे यंदाच्या वर्षी घडून आलं. जगाच्या पाठीवर हा एकच सोहळा आहे की या वारीत चालणार्या सर्वांचा देव विठ्ठल आहे. तो ही माऊली. संस्काराची, संस्कृतीची, सांघिक देवकार्याची विलक्षण अनुभूती गाठीला आली. उगमापासून सागरापर्यंतची परिक्रमा नाही झाली तरी आपल्या ओंजळीत मावेल तितके अमृत प्राशन करता आले, जीव कृतार्थ झाला.
महाराष्ट्रातील पंढपूरला जाणार्या वारीला वर्षानुवर्षांची परंपरा आहे. लाखोंहून अधिक संख्येने वारकरी सहभागी होत असले तरी वारीला अजूनही गालबोट लागले नाही, याचे श्रेय कोणाला तर वारीच्या सूक्ष्म व्यवस्थापनाला. हा पालखी सोहोळा 18 दिवस चालणारा असला तरी याचे नियोजन त्याआधी सुमारे 2 -4 महिने चालू असते. हे व्यवस्थापन चालते ते आध्यात्मिक ज्ञान, जिज्ञासा, तृष्णा यांच्या पूर्तीसाठी.
त्रिभाषा धोरण जाहीर करण्याआधी पूर्वतयारी व पूर्ण तयारी नसल्याने, आगामी महापालिका निवडणुकीसाठी एका सनसनाटी विषयाच्या शोधात असलेल्या विरोधकांचे फावले. त्यांनी राजकीय डाव साधला. सर्वसामान्यांना भावनिक आवाहने करत, खरे तर भावना भडकावत भिन्न भाषकांमध्ये दुहीची बीजे पेरली.
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर 'विवेक' वाचक परिवारात सहभागी व्हा. यातून संघविचारांचा प्रसार व्हायला हातभार लागेल. यातून समविचारी लोकांचे वर्तुळ वाढेल. तुम्हीही त्या वर्तुळाचा एक बिंदू व्हावे यासाठी हा प्रेमाचा आग्रह.
दफन करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ढिगार्यांनी पिरॅमिडसारख्या रचना बनवल्या गेल्या आहेत त्यांना ’चराईदेव मैदाम्स’ म्हणून ओळखले जाते. याला ’युनेस्को जागतिक वारसा स्थळ’ म्हणून नामांकन मिळाल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवणार्या देशभरातील 52 स्थळांपैकी मैदाम्स हे एक ठरले आहे. त्यामुळे मैदाम्सला भेट देणार्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. हे मैदाम्स काय आहे, त्याचा इतिहास काय आहे याबद्दल माहिती सांगणारा लेख...
गुरुपौर्णिमा म्हणजे गुरू-शिष्य परंपरेचे जतन करण्याची सुसंधीच होय! गुरू-शिष्य अशा सुरेख संगमातून महान राष्ट्राच्या निर्मितीची अनेक उदाहरणे पुराणकाळापासून पाहायला मिळतात. आज गुरू-शिष्य परंपरेला पुनरुज्जीवित करण्याची वेळ आली आहे. यासाठी भारत पुनःश्च हिंदू राष्ट्र बनणे आवश्यक आहे.
कोविड आता आपल्यासोबत राहाणारा विषाणू आहे आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळणार तेव्हा तेव्हा तो डोकं वर काढणार. ज्यावेळी कोविड वाढतोय अशा बातम्या दिसतील तेव्हा घाबरून न जाता सावध होणे गरजेचे आहे. या आजाराच्या कटू आठवणी मागे टाकून मनातल्या भीतीवर मात केली पाहिजे. कोविडला आता घाबरण्याची गरज नाही, कारण आता हा नूतन विषाणू नाही.
लातूर येथील विवेकानंद रुग्णालय सर्वपरिचित आहे. स्थानिक वैद्यकीय गरजा ओळखून त्यांची पूर्तता करण्यासाठी रुग्णालय सदैव तत्पर असते. बारा-तेरा वर्षांपूर्वी रुग्णालयाला कर्करोग चिकित्सा व उपचार हा नवा आयाम जोडला गेला आणि त्या कामातून आणखी एका आयामाचा जन्म झाला. तो आयाम म्हणजे रुग्णसेवा सदन. ग्रामीण भागातील कर्करोगाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांना उपयुक्त ठरलेला हा आयाम आहे.
HMPV या आजाराची भिती ओसरत असतानाच GBS म्हणजे गिलान बार या आजाराचा उद्रेक झाला आहे. याविषयी सर्वात महत्त्वाची म्हणजे, वैद्यकीय क्षेत्राला गेली अनेक दशके या आजाराविषयी माहिती आहे. मात्र हा आजार संसर्गजन्य नसल्याने तसेच हा दुर्मिळ आजार असल्याने या आजाराचा उद्रेक होणे ही घटना नवी आहे. यानिमित्त अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, मात्र एकजुटीने आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याचा प्रतिकार करायला हवा.
HMPV व्हायरसची बातमी चीनच्या कोणा एका व्यक्तीने ट्वीट केली, ही एवढी एकच बाब सर्व मीडियाच्या ओव्हर रिअॅक्शनला कारणीभूत ठरली. HMPV च्या बातम्या सर्वच मीडियाने उलटसुलट रंगवल्या. या बातम्यांमुळे भीतीचे सावट निर्माण झाले. खरं तर HMPV या विषाणूमुळे कोणताही धोका नाही. गरज आहे ती काळजी घेण्याची.
भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण आणि शेतकरी कुटुंबांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली संस्था आहे. ही संस्था विविध प्रकल्प आणि प्रशिक्षणाद्वारे शेतकर्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी मदत करते. बायोगॅस, कुक्कुटपालन, शेळीपालन, महिला बचत गट, जल आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या या संस्थेचा परिचय करून देणारा हा लेख.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सातेवाडी येथील बाळासाहेब मुठे हे डांगी गो संवर्धनात महत्त्वाचे योगदान देत आहेत. त्यांच्याकडे सध्या 30-35 डांगींचा कळप आहे. डांगींचे आरोग्य जपण्यासाठी ते कार्य करतात. आजघडीला सातेवाडी पंचक्रोशीत ‘लाडका डांगी मित्र’ आणि ‘गरिबांचा डॉक्टर’ म्हणून त्यांनी ओळख निर्माण केली आहे.
महाराष्ट्र हे फलोत्पादन क्षेत्रात देशातील अग्रेसर राज्य आहे. राज्यातील द्राक्ष, केळी, डाळिंब, आंबा, काजू, संत्रा, मोसंबी आदी प्रत्येक फळपिकाचा संघ आहे. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी जागरूक ग्राहकांच्या मागणीनुसार जागतिक गुणवत्तेचा माल तयार करणे आवश्यक आहे. यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने राज्यात सन 2018-19च्या खरीप हंगामापासून स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येत आहे.
अमरावती जिल्ह्यातील नामदेव वैद्य या शेतकर्याने आपल्या कल्पकता व बुद्धिकौशल्याने आणि संशोधकवृत्तीतून टाकाऊ वस्तूंपासून अत्यंत कमी खर्चात पेरणी व खत यंत्र बनविण्याची शक्कल लढवली आहे. एका दिवसात एका शेतकर्याकडून सहा एकराची पेरणी होते. यामुळे वेळेची व श्रमाची बचत झाली आहे. शेतीच्या कार्यात महत्त्वाची ठरणारी ही संशोधने स्वतंत्रपणे पेटंट म्हणून नोंदविण्याच्या योग्यतेची आहेत.
ऑस्ट्रेलियातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाने मिळवलेलं हे यश आहे. या दोन अपयश आणि यशांमध्ये तुलना नाही होऊ शकणार. ऑस्ट्रेलियातील कामगिरीनंतर झालेली चर्चा एकदम थांबणार आहे. रोहित आणि विराट आणखी किती काळ भारतीय संघात खेळणार? विराट जून महिन्यांत इंग्लंड दौर्यावर जाणार हे जवळ जवळ नक्की आहे. पण, रोहितला ती संधी मिळणार का? ही चॅम्पियन्स करंडकानंतर तो निवृत्तीचा निर्णय जाहीर करणार? रोहितनंतर संघाचं एकदिवसीय आणि कसोटीतील नेतृत्व नेमकं कुणाकडे जाणार? मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांच्या कामगिरीचं मूल्यमाप
यंदाची 24 वी राष्ट्रीय वनवासी खेलकूद प्रतियोगिता छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत संपन्न झाली. या स्पर्धा म्हणजे प्रचंड ऊर्जेने भारलेला क्रीडा महोत्सव असतो. तिरंदाजी आणि फुटबॉल या दोन प्रकारांमध्ये यंदाची स्पर्धा झाली. यानिमित्त वनवासी क्षेत्रातील युवकांची खेळामधील प्रतिभा शोधतानाच त्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणे आणि खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता दृढ करणे हे वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख उद्दिष्ट साकार होत आहे.
12 डिसेंबर 2024. भारताच्या बुद्धिबळ इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी असा दिवस. 11 वर्षांनी भारताला पुन्हा एकदा बुद्धिबळाचा जगज्जेता मिळाला. अठरा वर्षांच्या गुकेशने हा पराक्रम केला. जगज्जेतेपदापर्यंतचा गुकेशच्या प्रवासाचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
हंगेरीतील बुडापेस्ट येथे नुकत्याच पार पडलेल्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. दोन सांघिक आणि चार वैयक्तिक सुवर्णपदकांची कमाई भारताने या स्पर्धेत केली. या लेखात आपण जाणून घेणार आहोत या स्पर्धेबद्दल तसेच भारताच्या बुद्धिबळातील यशस्वी वाटचालीबद्दल.
संघविचारांची स्पष्टता हे नवसुदादांचे आगळे असे वैशिष्ट्य. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या विचारात आणि कृतीतदेखील स्पष्टपणे दिसायचे. स्पष्ट आणि मोजक्या शब्दात ते संघ, कल्याण आश्रमाचा विषय मांडायचे. हिंदुत्वाचा विचार ठाणे जिल्ह्यातील दुर्गम अशा वनवासी भागात रुजवण्यासाठी, फुलवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपले आयुष्य समर्पित केले अशा मांदियाळीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे नवसुदादा वळवी.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ निसर्ग लेखक, अरण्यऋषी अशी बिरुदावली मिळालेले मारुती चितमपल्ली यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या साहित्यात वाचलेल्या आणि कल्पना केलेल्या अनेक गोष्टी, स्थळं आणि माणसं स्वतःच्या डोळ्यांनी भेटता आणि अनुभवता आली. वन्यजीवनाच्या अभ्यासाचे धडे देणारे ते माझे पहिले गुरू. अजूनही मध्य भारतातल्या जंगलांमध्ये भटकत असताना जी परिचयाची झाडं भेटतात तेव्हा चितमपल्ली यांनी करून दिलेला परिचय सुद्धा परत उजळून येतो. याच आठवणींना उजाळा देणारा लेख..
स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुस्थानच्या इतिहासातील सुवर्णयुग आहे पण दुर्दैवाने आपल्या देशातल्या गाजरपारखी काँग्रेसवासी आणि डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना त्याची जाणीव नाही. हिरे आणि गारा एकाच ठिकाणी असतील तर हिरा टाकून गारा गोळा करणार्या विद्वानांना समजावणे अशक्य आहे. अशा परिस्थितीतही अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी हिंदुत्वाची गीता सातत्याने हिंदू समाजाला सांगण्याचा आपला वसा टाकला नाही. म्हणूनच, वीर सावरकरांच्या विरक्त, विरागी आणि उत्कट देशभक्तीने नटलेल्या जीवनाविषयी नितांत आदरभाव बाळगणारे ज्येष्ठ पत्रकार आण
दाजी पणशीकर यांच्या उत्कट विचाराबरोबरच त्यांची चिकित्सक अभ्यास वृत्ती, तसेच ते लोकांपर्यंत पोहोचवायची वृत्ती, त्यांना सर्वसामान्य विचार करणार्या लोकांपर्यंत घेऊन गेली. चांगली माणसे जोडून देणे आणि मग स्वतः त्यातून बाजूला होणे हे दाजींचे स्वभाववैशिष्ट्य.
आपण आत्मचरित्रे, चरित्रे वाचलेली असतात. हे दोन्ही साहित्यप्रकार सर्वश्रुत आहेत. मात्र ”विचार-चरित्र” हा एक आगळावेगळा चरित्रप्रकार एका पुस्तकाच्या निमित्ताने समोर आला, ते पुस्तक म्हणजे रवींद्र गोळे लिखित ’गिरीश प्रभुणे-जसे कळले तसे’ हे होय!
भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये विशिष्ट विषयाचे ज्ञान पूर्वीपासून अस्तित्वात होते असे एखाद्या भारतीय अभ्यासकाने सांगितले तर त्यावर विश्वास बसत नाही, परंतु तीच गोष्ट एखाद्या पाश्चिमात्य विद्वानाकडून ऐकली की मग मात्र ती पटते, अशी अनेक भारतीयांची मानसिकता असते. आयआयटी कानपूर येथून डॉक्टरेट मिळवलेल्या भास्कर कांबळे यांच्या बाबतीतही असेच झाले.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संस्था हा संघकामाचाच एक भाग आहे, याचे भान नानांनी कधी सोडले नाही. म्हणून मीपणाचा लोभ, सामूहिक निर्णय प्रक्रिया, राष्ट्रभक्तीचा भाव असे सगळे विषय त्यांनी प्रत्येक संस्थेत रुजविले. नानांनी जो उपक्रम हाती घेतला, तो सक्षम कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला आणि दुसर्या उपक्रमात रममाण झाले.
विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक… साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…
पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
प्रयागराज कुंभमेळ्यात सर्व काही अद्भुत आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. त्यातून विराट हिंदू राष्ट्राचे दर्शन घडत आहे. मराठीत एक म्हण आहे, ‘मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’, त्याचप्रमाणे महाकुंभात गेल्याशिवाय आणि डुबकी मारल्याशिवाय आनंद कळणार नाही! त्यामुळे मनात किंतुपरंतु न ठेवता महाकुंभात अवश्य जा! त्रिवेणी संगमात डुबकी मारा. प्रत्यक्ष कुंभमेळ्याचा अनुभव कथन करणारा लेख...
हिंदू समाज सेवा हाच धर्म मानणारा आणि प्रसिद्धीपराङ्मुख होऊन कृती करणारा आहे. भारताच्या समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन आणि त्या माध्यमातून अखंड सेवाकार्य करणार्या संस्कृतीचे दर्शन नुकत्याच पार पडलेल्या ’हिंदू आध्यात्मिक सेवा फाऊंडेशन’ मेळाव्यात झाले. राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर मैदान, गोरेगाव येथे सलग चार दिवस दि. 9 ते 12 जानेवारीपर्यंत हा मेळावा संपन्न झाला.
मनुष्यप्राण्यांचे समूहीकरण म्हणजे समाज होय. समाजाची स्वतःची अशी मूल्ये आणि विचार असतात. समाजाच्या या मौलिक गोष्टींचे जर विस्मरण झाले, तर समाजाची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही आणि समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः आपलीदेखील अधोगतीकडे वाटचाल सुरू होते. व्यक्तीला जसे मन असते तसे समाजालादेखील मन असते. त्याला समाजाची सदसद्विवेकबुद्धी असे म्हणतात. ही सदसद्विवेकबुद्धी समाज जेव्हा हरवून बसतो तेव्हा त्याची अवस्था अत्यंत वाईट होते. ही अवस्था म्हणजे आजचा हरवलेला महाराष्ट्र आहे. आजचा महाराष्ट्र हा वारसा हरवलेला महाराष्ट्र
श्रीराम मंदिराची उभारणी व घटनेतील 370 कलम रद्द करणे अशा एके काळी अशक्यप्राय वाटणार्या गोष्टी या सरकारने साध्य करून दाखविल्या, जिहादी दहशतवादावर नियंत्रण मिळविले, डाव्या व समाजवादी विचारप्रणालीमुळे दडपल्या गेलेल्या हिंदू इतिहास, परंपरा आणि गौरवस्थाने यांना महत्त्व प्राप्त करून दिले. तसेच गेल्या दहा वर्षांत कोणत्याही अन्य पक्षांनी केली नसतील एवढी विकासकामे या भाजप सरकारच्या काळात झाली. व्यावसायिक सर्वेक्षणापासून बूथ नियोजनापर्यंत सर्वत्र व्यावसायिकता आणली. या सर्व गोष्टी असतानाही व विरोधात पर्याय देण्यासाठी
आजच्या युगात कॉम्प्युटर सिस्टम्सशिवाय उद्योग चालवायची कल्पनाही अशक्य आहे. गेल्या दोन वर्षांत प्रचंड चर्चेत असलेलं एआय तंत्रज्ञान ही ह्याच बिझनेस सिस्टम्स वापराची पुढची पायरी आहे. दुर्दैवाने सगळ्या चर्चेचा रोख हा आता हे तंत्रज्ञान सगळ्या नोकर्या खाणार आणि प्रलय येणार असाच आहे. आज एआयचा उदोउदो बरोबर औद्योगिक उत्पादकता वाढवण्यासाठी ऑटोमेशनने आधीच आणि जास्त जोरात मुसंडी मारली आहे. खरं तर एआय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या सर्वांच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो. भीतीपोटी विरोध करण्यात किंवा ‘मला काय त्याच
माणसं निघून जातात आयुष्यातून. त्यांची आत्मचरित्रं अमर होतात. पुनःपुन्हा लोक वाचत राहतात. हरवलेलं शोधतात. कधी सापडतं, कधी नाही. प्रकाशाचे कवडसे दिलासादायक असतात. जिथून गोफ विणायला सुरुवात करतात तिथेच तो सुटावा म्हणून एक गाठ असते. ती सोडवता आली की गुंतागुंत होत नाही. आठवणींचा गोफ नक्षीदार असतो, त्यात रमावं.
Vivek saptahik - साप्ताहिक विवेक
लोकमान्यांनी बसवलेल्या गणपतीची नावे कशी बदलत गेली ?
‘हा’ गणपती आहे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
…आणि लोकमान्य भावूक झाले
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये