वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव रूजवणे आणि मूल्याधिष्ठित वैद्यकीय व्यवसायाचे संस्कार त्यांच्यावर करणे या उद्देशाने ‘सेवांकुर भारत’ ही संस्था भारतभरात कार्यरत आहे. वैद्यकीय शिक्षण घेणारे भारतभरातले सुमारे 16 हजार विद्यार्थी ‘सेवांकुर भारत’शी जोडलेले आहेत. या संस्थेचे ज्येष्ठ कार्यकर्ते, छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. अश्विनीकुमार तुपकरी यांनी नीट परीक्षाघोटाळ्यावर केलेले हे भाष्य.
दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर ‘जनजाती सुरक्षा मंच’ व ‘जनजाती विकास समिती’द्वारे रविवार, दिनांक 24 मे 2026 रोजी ‘जनजाति सांस्कृतिक समागम’ पार पडला. भारताची प्राचीन संस्कृती, सभ्यता व त्याचे मूळ रक्षक आणि वाहक असलेल्या अनुसूचित जनजाती समाजाच्या लोकसंस्कृती, परंपरा, स्वाभिमान, अस्तित्व आणि आस्थेच्या पुनर्जागरणाचा जाहीर आणि विराट उद्घोष म्हणजे हा समागम होता.
राजकीय उदासीनतेमुळे भारतासमोरील घुसखोरीचा प्रश्न आज अत्यंत गुंतागुंतीचा आणि गंभीर बनला आहे. सध्याचे गृहमंत्रालय हा विषय केवळ ‘स्थलांतर’ न मानता देशाच्या सार्वभौमत्वाशी जोडून पाहत आहे. सीमा सुरक्षा मजबूत करण्यासोबतच अंतर्गत यंत्रणा सुधारण्यावर आता विशेष भर दिला जात आहे. अनेक दशकांचा हा जुनाट रोग दूर करण्यासाठी गृहखात्याने आता ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
बांद्रा पूर्व येथील गरीब नगरमधील अवैध झोपड्यांवरील कारवाई ही रेल्वे वाहतुकीत सुधारणा करण्यासाठी उपयुक्त आहेच. पण त्यासोबत या कारवाईमुळे अनेक महत्त्वाचे संदेश गेले आहेत. सरकारी जमिनीवर अतिक्रमण करायचे आणि वोटबँकेच्या जोरावर कायदेशीर कारवाई रोखायची, हे प्रकार आता चालणार नाहीत. याबाबतीत यावेळी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेची स्पष्ट भूमिका असल्याचे दिसले. कोणीही बुलडोझरसमोर आडवा होऊन कारवाई थांबविण्याचा प्रयत्न केला तरी, आता सरकार थांबणार नाही...
अहिल्यादेवी या केवळ एक राणी नव्हत्या, तर त्या न्यायप्रिय, धर्मनिष्ठ आणि लोककल्याणकारी शासक होत्या. त्यांनी देशभरात अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा उभारल्या, प्रजेच्या कल्याणासाठी काम केले आणि प्रशासनात आदर्श निर्माण केला. मात्र, जोआना बैली ह्यांच्या कवितेमध्ये अहिल्यादेवींच्या व्यक्तिमत्त्वाचे जे चित्रण केले गेले आहे, ते बहुतेक ठिकाणी त्यांच्या वास्तविक कार्याशी विसंगत आहे. त्यांच्या महानतेची खरी झलक कवितेच्या शेवटच्या काही परिच्छेदांमध्ये दिसते, जिथे त्यांच्या कार्याचा थोडाफार योग्य उल्लेख केला आहे. पण त्याआधीच
बंडखोरीची सुरुवात प.बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरून झाली. याबाबतच्या प्रस्तावावर संदीपन साहा आणि ऋतब्रत बॅनर्जी यांच्या सह्या बनावट आहेत, अशी त्यांनी ममतांकडे तक्रार केल्यानंतर त्या प्रकरणाची चौकशी करण्याऐवजी तक्रार करणार्या दोघांना पक्षातून निलंबित करण्यात आलेे. या संदर्भात पक्षातल्या आमदारांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप केले असले तरी त्याकडे ममतांनी दुर्लक्ष केले. विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवरून उठलेले हे वादंग अभिषेक यांच्या विरोधातल्या नाराजीची शेवटची काडी ठरली आणि एकाच वेळी
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या 140व्या जयंतीचे औचित्य साधत, महाराष्ट्र राज्य शासन पर्यटन विभाग आणि विवेक व्यासपीठ (अमृतमहोत्सवी सा. विवेकचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने, 21 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीत वीरभूमी परिक्रमा ‘स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह’ पार पडला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वा. सावरकर विचारांच्या प्रेरणेने विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्या तेजोवीरांना स्वा. सावरकर ‘वीरता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या वीरता पुरस्कारार्थींपैकी एक पुरस्कारार्थी होते सोलापूरमधील आबासाह
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर 'विवेक' वाचक परिवारात सहभागी व्हा. यातून संघविचारांचा प्रसार व्हायला हातभार लागेल. यातून समविचारी लोकांचे वर्तुळ वाढेल. तुम्हीही त्या वर्तुळाचा एक बिंदू व्हावे यासाठी हा प्रेमाचा आग्रह.
अण्णासाहेबांची सावली बनून राहिलेली कर्व्यांची गृहलक्ष्मी अर्थात आनंदीबाई (बाया) धोंडो कर्वे. बायाचे स्वतःचे जीवन अत्यंत संघर्षमय तर होतेच परंतु त्या काळातील समाजप्रवाहाच्या विरूद्ध वाटणार्या अनेक गोष्टी बायाने हिमतीने केल्या. विधवेशी केलेला पुनर्विवाह म्हणून कर्वे दांम्पत्याला समाजाची अवहलेना सहन करावी लागली खरी. पण या दोघांनीही समाजपरिवर्तनासाठी आपले आयुष्य समर्पित केले. तिच्या स्मरणार्थ हिंगण्याच्या माळरानावरील तुळशी वृंदावन बायाची प्रेरकगाथा म्हणून आजही प्रेरणा देत आहे.
हिंदू संस्कार म्हणजे केवळ कर्मकांड नसून ती गर्भाधानापासून अंत्यविधीपर्यंत मानवी जीवन उन्नत करणारी एक सुसंगत जीवनप्रक्रिया आहे. इतर धर्मांतील विधींच्या तुलनेत हिंदू संस्कारांचे वेगळेपण नेमके कशात आहे आणि ते व्यक्तीची शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक घडण कशी करतात, याचा सखोल आढावा या लेखात घेतला आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर सकारात्मक ऊर्जा आणि जबाबदारीची जाणीव करून देणार्या या संस्कारमालेचे सार हा लेख मांडतो.
ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा त्रिवेणी संगम असलेले, अद्वैतवादाचे प्रणेते, मूर्तिपूजेचे पुरस्कर्ते, पंचायतन पूजेचे प्रर्वतक आणि संन्यास धर्माचे महत्त्व वाढणारे आद्य शंकराचार्य यांची आज जयंती. देव, देश आणि धर्मासाठी त्यांनी अलौकीक कार्य केले आहे. या भारतमातेच्या सुपुत्राला अभिवादन करणारा लेख..
अलिबागस्थित श्रीक्षेत्र कनकेश्वराच्या शिखरावर जून 1876 साली श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य ब्रह्मीभूत श्री लंबोदरानंद स्वामीजींनी श्री रामसिद्धिविनायक मंदिराची स्थापना केली. आध्यात्मिक साधनेसोबत समाजसेवेचे व्रत त्यांनी गणेशभक्तांना दिले. यंदाचे वर्ष हे श्री रामसिद्धिविनायक मंदिराचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.
बीड बायपास येथील हेडगेवार रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात श्रीराम नवमीच्या दिवशी विधिवत शिलान्यास कार्यक्रम संपन्न झाला. संभाजीनगर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात अल्पावधीत नावलौकिक प्राप्त केलेल्या श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या वैद्यकीय शिक्षण संकुलामध्ये डॉ. हेडगेवार रुग्णालयाने वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज आणि फिजियोथेरेपी कॉलेज सुरू झाले आहे.
मी आस्तिक आहे. देऊळ, चर्च, मशिद काही दिसलं की हात आपसून जोडले जातात. पण एक चांगली शक्ती म्हणजे परमेश्वर किंवा निर्गुण निराकार सत्याचे रूप म्हणजे परमेश्वर हे माझ्या छोट्या मेंदूला पुरत नाही, म्हणून भगवंतांची साजिरी गोजिरी रूपं आणि त्यांच्या सन्मार्गाने आयुष्य घालवण्याच्या कथा मला भुरळ घालतात. या सगळ्या वाटचालीत राम अगदी लहानपणापासून सतत भेटत राहिला आणि कणाकणाने मनात उतरत राहिला.
वटवृक्ष आणि पिंपळाच्या विस्तीर्ण कुळातला ‘प्लक्ष’ म्हणजेच पायरी हा निसर्गाचा एक दुर्लक्षित ठेवा आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राचा हा आराध्य वृक्ष आयुर्वेदातील प्रसिद्ध ‘पंचवल्कल’ सूत्राचा एक सुवर्णतारा आहे. आपल्या शीतल सावलीने सजीव सृष्टीला एकत्र आणणारा हा महावृक्ष केवळ पर्यावरणाचा रक्षक नाही, तर आरोग्याचा आणि परोपकाराचा एक अद्भुत वारसा आहे.
वसंत ऋतूत जंगलाला आपल्या रंगाने उजळवून टाकणार्या पळस वृक्षाचे औषधी रहस्य सांगणारी ही माहिती थक्क करणारी आहे. कठीण परिस्थितीतही आपले लाल-केशरी तेज टिकवून ठेवणारा, अशी ख्याती असणारा पळस हा ’पूर्वा फाल्गुनी’ नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य वाढवण्यासोबतच तो आरोग्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेले त्याचे औषधी महत्त्व वाचकांना एक नवी दृष्टी देणारे आहे.
वजन कमी करण्याचा निश्चय तर आपण उत्साहाने करतो, पण खरे अडखळतो ते रोजच्या जेवणाच्या ताटासमोर! नक्की काय खाल्ल्यावर वजन वाढते आणि कशाने घटते, या प्रश्नांच्या गुंत्यात आजचा सामान्य माणूस पुरता अडकला आहे. पोह्यांपासून ते चपातीपर्यंत आणि समोशापासून ते सॅलडपर्यंतच्या प्रत्येक घासाचे गणित मांडणारा हा लेख म्हणजे सुदृढ आयुष्याकडे नेणारा एक सोपा आणि व्यावहारिक मार्गदर्शक आहे.
वडाचे झाड केवळ श्रद्धेचा विषय नसून, ते आपल्या आरोग्यासाठी निसर्गाने दिलेले एक अक्षय्य वरदान आहे. मघा नक्षत्राचा आराध्य वृक्ष असलेला वटवृक्ष हा निसर्गातील स्थिरतेचे, विशालतेचे आणि दीर्घायुष्याचे सर्वोच्च प्रतीक आहे. या नक्षत्रावरील व्यक्तींनी आपल्या आयुष्यात स्थिरता, दीर्घायुष्य आणि पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी गावाबाहेर, मंदिराजवळ किंवा मोकळ्या परिसरात एक तरी वडाचे झाड नक्की लावावे.
एकेकाळी वसईच्या वाड्यांतून दरवळणारा नागवेलीच्या पानांचा सुगंध आजही माहीम-केळवेच्या मातीत जिवंत आहे. धार्मिक परंपरा, आयुर्वेद, व्यापार आणि शेतकर्यांच्या कष्टांनी समृद्ध झालेली ही पानसंस्कृती काळाच्या बदलत्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी झुंज देत आहे. हवामान बदल, वाढता खर्च आणि मजुरांची टंचाई अशा संकटांशी सामना करत ‘कालीपट्टी’ पान आता जागतिक ओळखीच्या ‘जीआय टॅग’कडे आशेने पाहत आहे.
निसर्गचक्र आणि मानवी अन्नाचा 80 टक्के वाटा सुरक्षित ठेवण्यात मधमाश्यांचे परागीकरणाचे कार्य मोलाचे आहे. याच इवल्याशा जिवाचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनातील त्याची भूमिका अधोरेखित करण्यासाठी 20 मे हा दिवस ‘जागतिक मधमाशी दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘मधमाशी संपली, तर मानवजात चारच वर्षांत संपेल’ हा आईन्स्टाईन यांचा इशारा या जिवाचे गांभीर्य स्पष्ट करतो.
यंदा ‘सुपर एल-निनो’चे संकट घोंगावत आहे. जून-जुलै महिन्यांत पावसाचा खंड पडेल असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे खरिपाच्या पेरणीवर मोठे संकट ओढावण्याची भीती शेतकर्यांच्या मनात घर करून बसली आहे. त्यामुळेच ‘एल-निनो’ची चर्चा सर्वत्र रंगते आहे; पण त्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल, तर आधी पावसाळ्याचे विज्ञान समजून घेणे अत्यावश्यक ठरते.
बांबू उद्योगाचा पाया मजबूत करायचा असेल, तर मुख्य कारखान्याआधी कच्च्या मालाच्या स्त्रोताजवळच ‘प्राथमिक प्रक्रिया केंद्र’ सक्षम असणे गरजेचे आहे; हे चीनने ओळखले. बांबूच्या शेंड्यापासून ते कंदापर्यंतच्या प्रत्येक भागाचा 100 टक्के वापर करून त्यांनी ग्रामीण रोजगार आणि पुरवठा साखळीचा समतोल कसा साधला? बांबू उद्योगातील चीनच्या कार्यक्षमता आणि शाश्वततेचा हा प्रेरणादायी प्रवास...
केवळ निसर्ग दर्शन किंवा देवदर्शन एवढ्यापुरतेच आता पर्यटन मर्यादित राहिलेले नाही. मैदानातला खेळ आणि प्रवासाची ओढ जेव्हा एकत्र येते, तेव्हा जन्म होतो तो ‘स्पार्टस् टुरिझम’चा! आयपीएलची मॅच असो किंवा साहसी ट्रेकिंग, आजचा तरुण या खेळांच्या निमित्ताने जग पालथे घालतोय. केवळ छंद म्हणून सुरू झालेला हा प्रवास आता भविष्यातील एक महाकाय अर्थव्यवस्था आणि करिअरची मोठी संधी म्हणून आकाराला येतोय. येत्या काळात क्रीडा पर्यटनामुळे रोजगाराची कोणती नवी दालने उघडणार आहेत? याचा हा वेध...
खेळ सुरळीत, न्याय्य आणि विश्वासार्ह राहण्यासाठी मैदानावर दिसणार्या खेळाडूंइतकाच महत्त्वाचा एक अदृश्य आधार म्हणजे अंपायर आणि रेफरी. त्यांच्या निर्णयक्षमतेवर संपूर्ण खेळाची दिशा, गती आणि अंतिम निकाल अवलंबून असतो. अंपायर आणि रेफरी ही भूमिका आज पूरक न राहता, स्वतंत्र ओळख आणि वाढत्या संधींसह एक सन्माननीय करिअर म्हणून उभी राहत आहे.
क्रीडा पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नाही, तर एक जबाबदारी आहे. खेळातील सत्य, भावना आणि प्रेरणा जगासमोर मांडण्याचे काम या क्षेत्रात केले जाते. जर तुम्हाला खेळाची आवड, लेखनाची ताकद आणि सत्य शोधण्याची जिद्द असेल, तर क्रीडा पत्रकारिता तुमच्यासाठी एक उत्तम, रोमांचक आणि प्रभावी करिअर ठरू शकते.
क्रीडा समालोचक हा आवाज आणि ज्ञान यांचा सुंदर संगम आहे. जर योग्य शिक्षण, सातत्यपूर्ण सराव, खेळावरील प्रेम, शब्दांवर पकड आणि लोकांना गुंतवून ठेवण्याची कला असेल तर क्रीडा समालोचन हे तुमच्यासाठी रोमांचक आणि सन्मानाचे करिअर ठरू शकते आणि या क्षेत्रात नावलौकिक मिळू शकते.
मराठी संगीत क्षेत्रातील स्वर शालीनतेचा आणि सुसंस्कृतपणाचा एक देखणा काळ म्हणजे सुमन कल्याणपूर... लतादीदींच्या युगातही त्यांनी आपल्या सात्विक गायकीनं रसिकांच्या मनात ‘आपल्याच घरातली मुलगी’ म्हणून हक्काची जागा मिळवली. दशरथ पुजारींपासून ते अशोक पत्कींपर्यंतच्या दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी मराठी गाण्यांना आपल्या स्वरांनी जी समृद्धी दिली, तिची जादू आजही कायम आहे. देवघरातल्या समईनं अचानक शांत व्हावं, अगदी तशाच निजधामाच्या प्रवसास निघालेल्या या लाडक्या गायिकेच्या आठवणींचा घेतलेला हा मागोवा.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर अहिल्यानगर जिल्हा कार्यवाह आणि निष्ठावान स्वयंसेवक लव शंकरराव शिंदे यांचे अचानक झालेले निधन हा संघ परिवारासाठी मोठा धक्का आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहणारा लेख..
पुण्यातील ज्येष्ठ संघ स्वयंसेवक आणि ‘गो विज्ञान संशोधन संस्थे’चे कार्यवाह बापूराव कुलकर्णी यांचे 11 मे 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या प्रेरक स्मृतींना आणि अलौकिक संघजीवनाला वाहिलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली.
मानसोपचार क्षेत्राला समाजाभिमुख करणारे द्रष्टे नेतृत्व डॉ. आनंद नाडकर्णी यांचे 15 मे 2026 रोजी निधन झाले. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आणि मनआरोग्य चळवळीतील भगीरथ कार्याचा आलेख मांडणारी ही स्मरणगाथा... त्यांच्याच एका मानसोपचारतज्ज्ञ शिष्याने वाहिलेली ही कृतज्ञतापूर्वक आदरांजली.
विवेक पुस्तक प्रकाशनतर्फे 13 एप्रिल 2026ला म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे. पुस्तकातील एक प्रकरण विवेकच्या वाचकांसाठी...
गांधीजींची जडणघडण कशी झाली, महात्मा गांधींच्या चिंतनावर भगवद्गीता आणि उपनिषदे यांचा कसा प्रभाव होता...
साईबाबांची सम्यक ओळख करून देणारा आशयपूर्ण पुस्तक - साई माझा सांगाती
आपण आत्मचरित्रे, चरित्रे वाचलेली असतात. हे दोन्ही साहित्यप्रकार सर्वश्रुत आहेत. मात्र ”विचार-चरित्र” हा एक आगळावेगळा चरित्रप्रकार एका पुस्तकाच्या निमित्ताने समोर आला, ते पुस्तक म्हणजे रवींद्र गोळे लिखित ’गिरीश प्रभुणे-जसे कळले तसे’ हे होय!
भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये विशिष्ट विषयाचे ज्ञान पूर्वीपासून अस्तित्वात होते असे एखाद्या भारतीय अभ्यासकाने सांगितले तर त्यावर विश्वास बसत नाही, परंतु तीच गोष्ट एखाद्या पाश्चिमात्य विद्वानाकडून ऐकली की मग मात्र ती पटते, अशी अनेक भारतीयांची मानसिकता असते. आयआयटी कानपूर येथून डॉक्टरेट मिळवलेल्या भास्कर कांबळे यांच्या बाबतीतही असेच झाले.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
उद्योग, व्यवसाय उभा करणं हे तसं एकट्याचं काम नाही. ते टीमवर्क आहे. व्यवसाय उभा राहण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेकांचा हातभार, सहकार्य लागत असतं, तेव्हा व्यवसाय उभा राहतो, मोठा होतो. यासाठी एक इकोसिस्टिम तयार करणं गरजेचं असतं. हीच गरज ओळखून देशातली आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी 2013 मध्ये देआसरा फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली आणि कामाला सुरुवात झाली. देआसरा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे नवे उद्योजक निर्माण करणं, जे उद्योग करत आहेत त्यांना आणखी मोठं होण्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील उत्तेजानार्थ क्रमांक प्राप्त संतोष पाटील यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील तृतीय क्रमांक प्राप्त डॉ. अविनाश भोंडवे यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, 'सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील द्वितीय क्रमांक विजेती कथा..
Vivek saptahik - साप्ताहिक विवेक
लोकमान्यांनी बसवलेल्या गणपतीची नावे कशी बदलत गेली ?
‘हा’ गणपती आहे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
…आणि लोकमान्य भावूक झाले
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये