न्यायमूर्ती पी.के. मिश्रा आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने धर्मांतरित व्यक्तीच्या अनुसूचित जाती (SC) दर्जाबाबत हा निकाल दिलेला नाही तर एका मोठ्या षड्यंंत्रातून हा देश वाचविला आहे. समस्त हिंदू समाजाने त्यांचे सदैव ऋणी राहिले पाहिजे.
केंद्र सरकारने प्रभावीपणे राबविलेल्या ‘नक्षलमुक्त भारत अभियाना‘ची आता पूर्णाहुती होत आहे. 2014मध्ये 126 असलेले नक्षल प्रभावित जिल्हे आज अत्यल्प उरले आहेत. 2024 ते मार्च 2026 या काळात 706 नक्षलवादी ठार झाले, 2,218 जणांना अटक करण्यात आली आणि 4,839 जणांनी आत्मसमर्पण केले. ही आकडेवारी केवळ यशाची नाही, तर एका दीर्घकालीन संघर्षाच्या समाप्तीची स्पष्ट चिन्हे आहेत.
अनेक वेळा ऊर्जासंकटाचा सामना करावा लागूनदेखील तत्कालीन भारतीय नेतृत्वाने पाश्चात्य शक्तींसमोर शरणागती पत्करणे पसंत केले; मात्र त्यावरचे मूलभूत उपाय शोधण्याचा प्रयत्नच केला नाही. यासाठीची सुरूवात मुख्यत्वे 2014नंतर सुरू झाली. त्यामुळे भारताला ती पातळी गाठण्यासाठी फार मोठी मजल गाठावी लागणार आहे. 2047पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या उद्दिष्टामध्ये भारताला तोपर्यंत ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या जवळपास नेण्याचा अतिशय महत्त्वाकांक्षी असा जो पण (निर्धार) आहे, तो करणारे आणि त्या दिशेने वाटचाल करणा
महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात बहुप्रतीक्षित ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम, 2026’ विधेयक पारित केले आहे. गैरमार्गाने होत असलेले धर्मांतर थांबवण्यासाठी व त्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी अशा प्रकारच्या कायद्याची नितांत गरज होती. हे महायुतीसरकारने लक्षात घेऊन विधेयक पारित केले. नक्की या विधेयकात काय तरतुदी आहेत? मुस्लिम, डाव्या संघटना व काँग्रेस याला एवढा विरोध का करीत आहेत याचे विश्लेषण करणारा लेख..
मध्यपूर्वेतील संघर्ष समजून घेण्यासाठी इस्रायल-पॅलेस्टाईन प्रश्न हा केंद्रस्थानी ठेवावा लागतो. हा संघर्ष फक्त भूभागाचा नाही, तर तो इतिहास, ओळख आणि अस्तित्वाचा आहे. इस्रायलच्या स्थापनेपासून पॅलेस्टिनींच्या हक्कांवरून सुरू झालेला हा संघर्ष आजही संपुष्टात आलेला नाही. गाझा पट्टीतील सततच्या लष्करी कारवाया, हवाई हल्ले आणि मानवी संकट यामुळे तेथील परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. हजारो नागरिकांची झालेली जीवितहानी, विस्थापन आणि मूलभूत सुविधांचा अभाव हे सर्व या संघर्षाचे कटू वास्तव आहे. या प्रश्नामुळे जागतिक राजकारणातह
नक्षलवाद कमी होऊ शकतो, त्याचं भारताच्या बर्याच मोठ्या भूभागाला लागलेलं ग्रहण सुटू शकतं यावर काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्वसामान्यांचाच काय, राजकीय नेत्यांचाही विश्वास बसला नसता. मात्र अशक्यही शक्य करून दाखवण्याची किमया मोदी सरकारने साधली आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे अभिनंदन करायला हवे.
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या 140व्या जयंतीचे औचित्य साधत, महाराष्ट्र राज्य शासन पर्यटन विभाग आणि विवेक व्यासपीठ (अमृतमहोत्सवी सा. विवेकचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने, 21 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीत वीरभूमी परिक्रमा ‘स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह’ पार पडला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वा. सावरकर विचारांच्या प्रेरणेने विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्या तेजोवीरांना स्वा. सावरकर ‘वीरता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या वीरता पुरस्कारार्थींपैकी एक पुरस्कारार्थी होते सोलापूरमधील आबासाह
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर 'विवेक' वाचक परिवारात सहभागी व्हा. यातून संघविचारांचा प्रसार व्हायला हातभार लागेल. यातून समविचारी लोकांचे वर्तुळ वाढेल. तुम्हीही त्या वर्तुळाचा एक बिंदू व्हावे यासाठी हा प्रेमाचा आग्रह.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या तसेच 100व्या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर कोणत्याही विशिष्ट विचारधारेचे वर्चस्व नसून वाचकवर्गाला केंद्रस्थानी ठेवून प्रभावीपणे मांडणी करणार्या प्रत्येकासाठी हे व्यासपीठ खुले असेल, अशी स्पष्ट भूमिका मसापचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण यांनी मांडली. या विशेष संवादात त्यांनी साहित्य, राजकारण आणि विचारधारा याबाबतचे आपले मत स्पष्ट केले.
बीड बायपास येथील हेडगेवार रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात श्रीराम नवमीच्या दिवशी विधिवत शिलान्यास कार्यक्रम संपन्न झाला. संभाजीनगर जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रात अल्पावधीत नावलौकिक प्राप्त केलेल्या श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या वैद्यकीय शिक्षण संकुलामध्ये डॉ. हेडगेवार रुग्णालयाने वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज आणि फिजियोथेरेपी कॉलेज सुरू झाले आहे.
मी आस्तिक आहे. देऊळ, चर्च, मशिद काही दिसलं की हात आपसून जोडले जातात. पण एक चांगली शक्ती म्हणजे परमेश्वर किंवा निर्गुण निराकार सत्याचे रूप म्हणजे परमेश्वर हे माझ्या छोट्या मेंदूला पुरत नाही, म्हणून भगवंतांची साजिरी गोजिरी रूपं आणि त्यांच्या सन्मार्गाने आयुष्य घालवण्याच्या कथा मला भुरळ घालतात. या सगळ्या वाटचालीत राम अगदी लहानपणापासून सतत भेटत राहिला आणि कणाकणाने मनात उतरत राहिला.
चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा! नव्या संवत्सराचे स्वागत. अशा साठ संवत्सराचे चक्र सांगितले गेले आहे. दरवर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदेला नवे संवत्सर सुरू होते. यावर्षी विश्वावसु नावाचे संवत्सर संपून सुरू होते आहे पराभव नावाचे नूतन संवत्सर!
वानप्रस्थाश्रम हा गृहापासून विरक्तीचा आणि वाढत्या एकांताचा काळ मनाला गेला. वानप्रस्थाश्रम म्हणजे एका कुटुंबकेंद्री व्यक्तीचा हळूहळू समाजकेंद्री व्यक्तीमध्ये विकास होणे. या संस्काराने स्वार्थसाधना करणारा मनुष्य आता समाजकल्याण करण्याकडे वळतो. समजाच्या हितासाठी निःस्वार्थ परोपकारी भावनेने जगण्याकडे झालेली ही उत्क्रांती आहे.
या वर्षीचा 101वा दत्तजयंती संगीत महोत्सव मराठवाड्याच्या राजधानीत म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरित झाल्यामुळे त्याची व्यापकता विस्तारली. दि. 5 ते 7 डिसेंबर दरम्यान ’एमजीएम’च्या रुक्मिणी सभागृहात संपन्न झालेल्या या स्वरोत्सवात आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंत सहभागी झाले होते. शहरातील अन्य कलासाधकांचा सहभाग, रसिकश्रोत्यांचा प्रतिसाद पाहता हा महोत्सव मराठवाड्यातील सवाई गंधर्व ठरू शकतो, ही आशा बाळगायला हरकत नाही.
आपल्याला दैनंदिन जीवनात लागणार्या कॅलरीजचा विचार करून जर आपला आहार आखला तर वाढलेले वजन नक्कीच आटोक्यात येते. वजन कमी करताना सातत्य आणि दीर्घदृष्टी ठेवावी. कारण आपण आहारयोजना नियमितपणे पाळत राहिलो तरच वजन हळूहळू कमी होत जाते आणि त्यानंतर कमी झालेले वजन काटेकोरपणे पाळून ताब्यात ठेवता येते. या संदर्भातील एक आदर्श आहारयोजना देत आहोत.
पुष्य नक्षत्राचा हा ‘पिंपळ’ मानवाला सतत ‘कार्यरत राहण्याची’ आणि ‘ज्ञानाची’ प्रेरणा देतो. हवा नसतानाही सळसळणारी पिंपळपाने आपल्याला शिकवतात की, परिस्थिती कशीही असली तरी आपले कर्म आणि हालचाल थांबता कामा नये. पिंपळ हा विशालतेचे आणि निःस्वार्थ पोषणाचे प्रतीक आहे.
मेडिटेरेनियन डाएट हा केवळ एक आहार नाही, तर एक संपूर्ण जीवनशैली आहे- ताजी भाजी, फळे, संपूर्ण धान्ये, नट्स, मासे, ऑलिव्ह ऑईल आणि हलके दुग्धजन्य पदार्थ यांचा संतुलित वापर असलेली एक आहारशैली आहे. संशोधकांनी सिद्ध केले आहे की, या आहारामुळे वजन कमी होते, हृदयविकाराचा धोका कमी होतो, मेंदूचे आरोग्य सुधारते आणि आयुर्मान वाढते.. या आहार पद्धतीचे भारतीय आहाराशी साम्य असल्यामुळे, ती दीर्घकाळ स्वीकारणे सोपे आहे.
बांबू हे पर्यावरणासाठी ‘हिरवे सोने’ आहे. हे झाड इतर वृक्षांच्या तुलनेत 35% जास्त ऑक्सिजन हवेत सोडते आणि प्रचंड प्रमाणात कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. याची मुळे मातीला घट्ट धरून ठेवतात, ज्यामुळे भूस्खलन आणि मातीची धूप थांबते.पुनर्वसू नक्षत्राचा हा ‘बांबू’ मानवाला ‘लवचीकता’ आणि ‘एकजूट’ शिकवतो. वादळ आल्यावर मोठे आणि ताठर वृक्ष उन्मळून पडतात, पण बांबू वादळात वाकतो आणि वादळ शमल्यावर पुन्हा ताठ उभा राहतो. संकटात नमते घेणे हा दुबळेपणा नसून ती टिकून राहण्याची कला आहे.
मुंबईत वाढल्या तरी कविता चांदोरकर यांना मातीची आणि निसर्गाची ओढ स्वस्थ बसू देईना. शहरातील यशस्वी जीवन मागे ठेवत त्यांनी कोकणातील केळशीच्या मातीत नवे स्वप्न रुजवले. शेती, गोधन आणि नैसर्गिक जीवनशैली स्वीकारत त्यांनी संघर्षातून उभा केलेला हा प्रेरणादायी प्रवास.
चीनने गेल्या 4-5 दशकांत बांबू (bamboo) लागवड आणि उद्योग क्षेत्रात केलेली झपाट्याने प्रगती जगासाठी अभ्यासाचा विषय ठरली आहे. सखोल संशोधन, योग्य प्रजातींची निवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकर्यांपर्यंत ज्ञान पोहोचवणारी प्रभावी यंत्रणा यांच्या बळावर चीनने बांबूला जागतिक औद्योगिक संपत्तीचे रूप दिले. या प्रक्रियेमागील वैज्ञानिक दृष्टीकोन, उत्पादन वाढ आणि विविध उद्योगनिर्मितीचा अभ्यासपूर्ण आढावा या लेखात मांडला आहे.
सांगली जिल्ह्याचे अस्सल वैभव आणि दुष्काळी तालुक्यात वरदान ठरलेली माडग्याळ मेंढी आता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कुतूहलाचा आणि अभिमानाचा विषय ठरली आहे. दिसायला अत्यंत देखणी, उंचीला माफक, शारीरिक आकाराने वेगळी असणारी ही मेंढी सांगली जिल्ह्याची ओळख म्हणून पुढे येत आहे.
शेतीत यश मिळवण्यासाठी अंदाजावर नव्हे तर शास्त्रीय आणि खात्रीशीर माहितीवर अवलंबून निर्णय घेणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने विकसित केलेले महाविस्तार-ए.आय. अॅप शेतकर्यांना अधिकृत, तज्ज्ञांनी पुष्टी केलेला सल्ला देणारे विश्वासार्ह डिजिटल साथीदार ठरत आहे.
क्रीडा समालोचक हा आवाज आणि ज्ञान यांचा सुंदर संगम आहे. जर योग्य शिक्षण, सातत्यपूर्ण सराव, खेळावरील प्रेम, शब्दांवर पकड आणि लोकांना गुंतवून ठेवण्याची कला असेल तर क्रीडा समालोचन हे तुमच्यासाठी रोमांचक आणि सन्मानाचे करिअर ठरू शकते आणि या क्षेत्रात नावलौकिक मिळू शकते.
आताच्या भारतीय संघाने हे विजेतेपद आपल्याकडे राखताना नवीनच आदर्श घालून दिला आहे. या संघाकडे विजयाचं सातत्य आहे, न डगमगणारं धैर्य आहे, समोरच्यावर पूर्ण वर्चस्व गाजवण्याची मर्दुमकी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निकालाभिमुख खेळण्याची कणखर मानसिकता आहे. युवा खेळाडूंचा हा संघ खर्या अर्थाने निडर आहे. पराभवाने ते विचलित होत नाही. त्यांना आस आहे मोठ्या कामगिरीची. भारतीय संघाने मिळवलेलं यश पाहिलं तर, वैयक्तिक मापदंडांनी नाही तर सांघिक कामगिरीने या संघाने हे यश खेचून आणलं आहे. हे यश मिरवताना जे वर्चस्व राखलं आहे
क्रीडा विश्लेषक हा मन आणि कामगिरी यांना जोडणारा वैज्ञानिक दुवा आहे. हे आपल्याला मागील लेखामधून लक्षात आलेच असेल. खेळामध्ये मनावर नियंत्रण ठेवायचे असेल तर मात्र एका मानसशास्त्रज्ञाचीच गरज भासते.
भारताचा एकोणीस वर्षांखालील संघ, जो देशाचं क्रिकेटमधील भविष्य आहे, त्यांनी विक्रमी सहाव्यांदा युवा विश्वचषक जिंकून भारताचं भविष्य किती सुरक्षित आहे हे दाखवून दिलं आहे. भारताच्या एकोणीस वर्षांखालील संघाने इंग्लंडवर 100 धावांनी मात करत सहाव्यांदा आयसीसी युवा विश्वचषक उंचावला. आयसीसीची एखादी स्पर्धा सर्वाधिक सहावेळा जिंकणारा भारत हा पहिला संघ आहे. त्यासाठी जे निर्विवाद वर्चस्व, जिगर, कठोर मानसिकता, आत्मविश्वास मैदानावर दाखवावा लागतो, तो या युवा संघाने दाखवला आहे.
1977 आणि 1980 मध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून येत त्यांनी राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवला. लोकसभेत त्यांची भाषणे नेहमी अभ्यासपूर्ण, संयत आणि प्रभावी असत. विरोधकांनाही ऐकून घेण्याची तयारी, तथ्यांवर आधारित युक्तिवाद आणि संसदीय परंपरांचा आदर यामुळे ते सर्वपक्षीय मान्यता मिळवणारे नेते ठरले. जनतेच्या दैनंदिन अडचणी-रोजगार, पाणीपुरवठा, नागरी सुविधा यांसोबतच देशहिताचे व्यापक मुद्दे त्यांनी मांडले. राजकारण हे केवळ सत्तेसाठी नव्हे, तर लोकसेवेसाठी असते, हा संदेश त्यांच्या कार्यात
‘वन्दे मातरम्’ विषयाचे पूर्ण वर्षभर कार्यक्रम करून हा विषय राष्ट्रीय पातळीवर पोहोचवून स्वतः प्रसिद्धीपासून दूर राहाणारे ’वन्दे मातरम्’ जागराचे प्रणेते मोहनराव अळवणी. पुण्याच्या संघसमर्पित व्यक्तींच्या नामावळीतील मोहनराव अळवणी यांचे 8 फेब्रुवारी 2026रोजी वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले.
जीवनाचा मूलार्थ सांगून कर्म-उपासना बळकट करण्याचा संदेश प.पू. सद्गुरुदास महाराज यांनी प्रत्यक्ष आचरणातून साधकांना दिला. आज जरी ते देहाने आपल्यात नसले, तरी त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यातील ‘शककर्ते शिवराय’ हा एक युगप्रवर्तक ग्रंथ ठरला आहे. त्यांनी स्थापन केलेली उपासना केंद्रे आणि त्यांनी दिलेले विचार हे येणार्या अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतील. ‘धर्मभास्कर’ ही विद्वत जनांनी दिलेली पदवी, त्यांनी आपल्या कार्यातून सार्थ ठरवली. महाराष्ट्राच्या मातीतील हा ‘सांस्कृतिक दीप’ सदैव तेवत राहील यात शंका नाही. या ध्येयन
डॉ. रा. श्री. मोरवंचीकर हे दिसायला अत्यंत साधे, पण विचारांनी अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. छत्रपती संभाजीनगरमधील त्यांच्या निवास्थानी ’ज्ञानेश्वरी’चे पारायण आणि इतिहासाचे संशोधन एकाच वेळी चालत असे. ते म्हणत की, इतिहास आपल्याला बदला घेण्यासाठी नाही, तर भविष्य सुधारण्यासाठी शिकायचा असतो. अलीकडच्या काळात इतिहासाचे जे काही ’रंजन’ केले जात आहे, त्याबद्दल त्यांनी नेहमीच नाराजी व्यक्त केली. पैठणच्या मातीतील सातवाहन, यादवांचे देवगिरी, मलिक अंबरची नहर पद्धत आणि संतांची मांदियाळी या सर्वांना आपल्या लेखनातून जोडण
गांधीजींची जडणघडण कशी झाली, महात्मा गांधींच्या चिंतनावर भगवद्गीता आणि उपनिषदे यांचा कसा प्रभाव होता...
साईबाबांची सम्यक ओळख करून देणारा आशयपूर्ण पुस्तक - साई माझा सांगाती
आपण आत्मचरित्रे, चरित्रे वाचलेली असतात. हे दोन्ही साहित्यप्रकार सर्वश्रुत आहेत. मात्र ”विचार-चरित्र” हा एक आगळावेगळा चरित्रप्रकार एका पुस्तकाच्या निमित्ताने समोर आला, ते पुस्तक म्हणजे रवींद्र गोळे लिखित ’गिरीश प्रभुणे-जसे कळले तसे’ हे होय!
भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये विशिष्ट विषयाचे ज्ञान पूर्वीपासून अस्तित्वात होते असे एखाद्या भारतीय अभ्यासकाने सांगितले तर त्यावर विश्वास बसत नाही, परंतु तीच गोष्ट एखाद्या पाश्चिमात्य विद्वानाकडून ऐकली की मग मात्र ती पटते, अशी अनेक भारतीयांची मानसिकता असते. आयआयटी कानपूर येथून डॉक्टरेट मिळवलेल्या भास्कर कांबळे यांच्या बाबतीतही असेच झाले.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संस्था हा संघकामाचाच एक भाग आहे, याचे भान नानांनी कधी सोडले नाही. म्हणून मीपणाचा लोभ, सामूहिक निर्णय प्रक्रिया, राष्ट्रभक्तीचा भाव असे सगळे विषय त्यांनी प्रत्येक संस्थेत रुजविले. नानांनी जो उपक्रम हाती घेतला, तो सक्षम कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला आणि दुसर्या उपक्रमात रममाण झाले.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
उद्योग, व्यवसाय उभा करणं हे तसं एकट्याचं काम नाही. ते टीमवर्क आहे. व्यवसाय उभा राहण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेकांचा हातभार, सहकार्य लागत असतं, तेव्हा व्यवसाय उभा राहतो, मोठा होतो. यासाठी एक इकोसिस्टिम तयार करणं गरजेचं असतं. हीच गरज ओळखून देशातली आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी 2013 मध्ये देआसरा फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली आणि कामाला सुरुवात झाली. देआसरा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे नवे उद्योजक निर्माण करणं, जे उद्योग करत आहेत त्यांना आणखी मोठं होण्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील उत्तेजानार्थ क्रमांक प्राप्त संतोष पाटील यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील तृतीय क्रमांक प्राप्त डॉ. अविनाश भोंडवे यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, 'सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील द्वितीय क्रमांक विजेती कथा..
Vivek saptahik - साप्ताहिक विवेक
लोकमान्यांनी बसवलेल्या गणपतीची नावे कशी बदलत गेली ?
‘हा’ गणपती आहे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
…आणि लोकमान्य भावूक झाले
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये