2024 च्या निवडणुकीत मर्यादित यश मिळूनही राष्ट्रीय विचारांना, पर्यायाने भाजपाला सत्तेपासून रोखण्यात अपयश आले, त्यावेळी या संघटनांनी आपल्या योजनेवर पुनर्विचार केला. दक्षिण आशियात इतर ठिकाणी झालेल्या प्रयोगांच्या आधारावर त्यांनी दोन कालावधी निवडले होते. पहिला 2027 ते2029चा कालखंड आणि दुसरा 2030-2034. परंतु छएएढ पेपरफुटीने त्यांना एक संधी आयतीच उपलब्ध करून दिली. त्यातूनच विद्यार्थी आणि पालकांच्या असंतोषाला क्रांतीचे खतपाणी घालण्याचा प्रयोग सुरू झाला.
विद्यार्थ्यांचा विषय हातात घेऊन आणि त्यांच्या भावनांचा बाजार करून सरकार उलथून पाडण्याचे मनसुबे मोदींशी खेळत नसून राज्यघटनेशीच खेळत आहेत, याचे आकलन होणे फार गरजेचे आहे. आणि हे काम राज्यघटना बचावचे ढोंगी आंदोलन करणारे करतात, हा त्यातील जबरदस्त विरोधाभास आहे.
कॉक्रोेच आंदोलन आणि तथाकथित आंबेडकरवादी यांची युती ही पण या वैचारिक गोंधळाचाच एक भाग. जेथे शिव्या, द्वेष, बीभत्स वर्तन व अराजक वृत्ती असेल तिथे बाबासाहेबांचा विचार असू शकत नाही. खर्या आंबेडकरवादी जनतेने अशा नेत्यांपासून लांब रहायला हवे.
सीजेपी नेमके कशासाठी लढत असल्याचा दावा करतात आणि प्रत्यक्षात काय मागण्या करत आहेत, यातील तफावत पाहणे गरजेचेे आहे. भारतातील तरुणांची मुख्य समस्या जर NEET परीक्षेतील गैरप्रकार आणि अत्यंत जीवघेणी स्पर्धा ही असेल तर त्यांच्या मागण्या या केवळ शैक्षणिक पायाभूत सुविधा आणि परीक्षा पद्धतीतील पारदर्शकतेवर केंद्रित असणे अपेक्षित होते. मात्र, त्याऐवजीच्या मागण्यांमध्ये प्रामुख्याने राजकीय मागण्यांचा समावेश आहे. ते शैक्षणिक समानतेसाठी लढत नसून,NEET परीक्षार्थींच्या खर्याखुर्या निराशेशी खेळत स्वतःच्या राजकीय फायद्यासाठ
भारताचे पहिले खाजगी ऑर्बिटल रॉकेट म्हणजे ‘विक्रम-1’ होय. या आकाशात झेपावलेल्या रॉकेटने आपल्या देशाला थेट अंतराळ क्षेत्रात फक्त एक महासत्ता बनवले नाही, तर जागतिक कमर्शियल स्पेस मार्केटचा नवा केंद्रबिंदू बनवले आहे. विशेष म्हणजे ’विक्रम-1’चे सगळे तंत्रज्ञान हे स्वदेशी आहे. या कामगिरीने भारतातील खासगी अंतराळ उद्योगाला जागतिक स्तरावर पोहोचवणार्या नव्या युगाची सुरुवात होते आहे.
शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो असे म्हणतात. पण डोळ्यांवर झापडे लावलेल्या नि कानात वारे शिरलेल्या अतिशहाण्यांचे काय? जंतरमंतरचे आंदोलन, त्यात सहभागी सर्वांचेच मुखवटे गळून पडताहेत.
स्वा. विनायक दामोदर सावरकर यांच्या 140व्या जयंतीचे औचित्य साधत, महाराष्ट्र राज्य शासन पर्यटन विभाग आणि विवेक व्यासपीठ (अमृतमहोत्सवी सा. विवेकचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने, 21 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीत वीरभूमी परिक्रमा ‘स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह’ पार पडला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वा. सावरकर विचारांच्या प्रेरणेने विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्या तेजोवीरांना स्वा. सावरकर ‘वीरता पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या वीरता पुरस्कारार्थींपैकी एक पुरस्कारार्थी होते सोलापूरमधील आबासाह
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर 'विवेक' वाचक परिवारात सहभागी व्हा. यातून संघविचारांचा प्रसार व्हायला हातभार लागेल. यातून समविचारी लोकांचे वर्तुळ वाढेल. तुम्हीही त्या वर्तुळाचा एक बिंदू व्हावे यासाठी हा प्रेमाचा आग्रह.
मंदिर हे केवळ तीर्थस्थान नसून मंदिर म्हणजे सार्वभौम व स्वतंत्र सामाजिक-विधीपूर्ण संस्था होय. या वैचारिक मांडणीच्या केंद्रस्थानी ‘अस्वामिज’ किंवा ‘अस्वामिक’ संपत्ती ही संकल्पना आहे. याच आधारे ‘मंदिर संपत्ती’ या संस्थात्मक रचनेचा दैव-निरपेक्ष विचार करण्याची मोठी परंपरा आपल्याकडे आहे. कदाचित त्याचमुळे आजचे आणि भविष्यातीलही असे अनेक विवाद वैधानिक मार्गानेच सुटणार आणि ते आपणच सोडवणार असा मूलभूत व ठाम विश्वास हिंदूंमध्ये दिसतो.
ज्ञानदेवांनी अत्यंत विचारपूर्वक भगवद्गीतेची निवड करून त्यातील सुसेव्य धर्मविचारांवर मराठीत अत्यंत सुलभ व रसाळ असा भाष्यग्रंथ लिहिला. तो भाष्यग्रंथ, ती गीता टीका म्हणजेच ज्ञानदेवांची ‘भावार्थ दीपिका’ तथा ‘ज्ञानेश्वरी’ होय. ज्ञानेश्वरी हा विठ्ठलभक्त-वारकरी संप्रदायाचा धर्मग्रंथ म्हणून लोकप्रिय असला तरी तो संप्रदायापुरता, मराठीपुरता, देशापुरता मर्यादित, संकुचित नाही. ज्ञानेदवांच्या विश्वकल्याणार्थ समर्पित विश्वमनाचे ‘ज्ञानेश्वरी’ हे विश्वात्मक दर्शन आहे. ज्ञानेश्वरी हा भक्ती संप्रदायाचा धर्मग्रंथ असला तरी ही भ
अलिकडच्या काळात काही लोक देवभक्ती, समाजभक्ती व देशभक्ती यामध्ये भिंत उभी करतात. संत रविदासांच्या जीवनातून व विचारातून वरील तिन्ही गोष्टी कशा परस्परपूरक आहेत हे लक्षात येते. भक्तीमुळे मनुष्याचे मन व्यापक होते. सर्वत्र परमेश्वर आहे ही भावना समाजरूपी परमेश्वराची भक्ती (सेवा) करायला लावते. संस्कृतिरक्षण हेच राष्ट्ररक्षण आहे हा बोध होतो व समाज परकीय सत्तेला नाकारतो.
मध्ययुगीन भारतातील जुलमी राजवट आणि कर्मठ जातिव्यवस्थेच्या अंधकारात संत रविदासांनी समतेचा आणि निर्गुण भक्तीचा प्रकाश पसरवला. त्यांच्या क्रांतिकारी तत्त्वज्ञानातील ‘बे गमपुरा’ ही शोषणमुक्त, दुःखमुक्त आणि जातीविहीन आदर्श राज्याची संकल्पना मानवी हक्कांचा पाया ठरली. या विचारांचे साधर्म्य ओळखून शीख परंपरेने त्यांच्या 41 सबदांना ‘श्री गुरू ग्रंथ साहिब’ या सर्वोच्च ग्रंथात सामावून घेत त्यांना गुरुसमान दर्जा दिला. आजच्या आधुनिक काळातही संत रविदास (भगत रविदास जी) आणि शीख परंपरेचा हा वैचारिक संगम संपूर्ण मानवजातीला सम
मध्ययुगीन भक्ती चळवळीतील थोर प्रबोधनकार संत रविदास यांनी सामाजिक विषमता आणि अन्यायाविरुद्ध आपल्या साहित्यातून प्रखर आवाज उठवला. त्यांच्या विचारधारेचा कळस असलेल्या ‘बे गमपुरा’ संकल्पनेतून त्यांनी एका वर्गविहीन, जातीविहीन आणि दुःखमुक्त आदर्श समाजाचे स्वप्न मांडले. पाश्चात्य जगातील थॉमस मोर यांच्या ‘युटोपिया’ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संवैधानिक मूल्यांशी नाते सांगणारी ही संकल्पना मानवी कल्याणाचा खरा मार्ग दाखवते.
मध्ययुगीन भारतातील परकीय आक्रमणे आणि जातिभेदाच्या अंधकारात महाराष्ट्रातील संतपरंपरेने सामाजिक समता व समरसतेचा विचार प्रत्यक्ष जगून दाखवला. या संतपरंपरेने केवळ मायबोली मराठीतच नव्हे, तर हिंदीसारख्या लोकभाषांचा स्वीकार करून संपूर्ण देशाला भाषिक व सांस्कृतिकदृष्ट्या एकसंध ठेवले. संत नामदेव, संत सेना महाराज आणि संत रविदास यांच्या याच व्यापक, अहिंदी रचनांचा गौरवशाली समावेश पुढे शीख धर्माच्या ‘श्रीगुरुग्रंथसाहिब’मध्ये करण्यात आला. प्रस्तुत लेखात या द्वैभाषिक संतपरंपरेचा व त्यांच्या राष्ट्रउभारणीतील योगदानाचा वेध
स्वाती नक्षत्राची देवता वायू ही प्राण, गती आणि स्वातंत्र्याची देवता आहे. अर्जुन वृक्ष मानवाला हाच महान संदेश देतो की, ज्याप्रमाणे हा वृक्ष स्वतःचे बाह्य आवरण (साल) टाकून देऊन आतून कायम शुद्ध आणि नवीन राहतो, त्याचप्रमाणे माणसानेही आपला अहंकार आणि जुने वाईट विचार सोडून देऊन आतून कायम शुद्ध राहावे.
महादेवाची पूजा म्हटली की, आपल्याला बेलाची पाने आठवतात. बेलाची पाने फक्त पूजेसाठी उपयोगाची नाहीत; तर त्या पानांमध्ये आणि वृक्षामध्ये आरोग्याचा मोठा खजिना आहे. चित्रा नक्षत्राचा आराध्य वृक्ष असलेल्या बेलाच्या पानात, मुळात आणि फळात अफाट औषधी शक्ती दडलेली आहे. आयुर्वेदातील अनेक महत्त्वाच्या औषधांमध्ये मुख्य घटक असलेला बेल हा पोटाचे जुने आजार, मधुमेह आणि सांधेदुखीवर रामबाण ठरतो. आता आधुनिक विज्ञानानेही बेलाच्या कॅन्सरविरोधी आणि जंतुनाशक गुणधर्मांवर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. कडक उन्हाळा आणि कोरड्या हवामानातही
‘हस्त नक्षत्राचा’ आराध्य वृक्ष म्हणून ‘अम्बष्ठतरु’ ओळखला जातो. या अम्बष्ठतरुवरून अभ्यासकांमध्ये ‘जाई’ आणि ‘रिठा’ असे दोन मतप्रवाह आहेत. या लेखामध्ये जाई आणि रिठा या दोन्ही वनस्पतींचे धार्मिक महत्त्व, आयुर्वेदातील औषधी गुणधर्म आणि आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेले फायदे सांगितलेे आहेत. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी या वनस्पती कशा आरोग्यदायी ठरू शकतात, याचा वेध घेणारा लेख.
सर्व आजारांच्या उपचारांमध्ये व्यायाम करणे अतिशय गरजेचे असते आणि या व्यायामांमध्ये, सर्वात सोपा आणि परवडणारा एकच व्यायाम; तो म्हणजे चालणे! बिनपैशांचा हा व्यायाम (चालणे) अतिशय लाभदायी आहे. त्याची अगदी नेमकी माहिती आपण या लेखात बघूया.
कल्याणी मुरदारे यांचा मृद्गंध फार्म हा केवळ एक शेती प्रकल्प नाही, तर जिद्द, अभ्यास, निसर्गावरील विश्वास आणि शाश्वत शेतीचा एक प्रेरणादायी आदर्श बनला आहे. शेतीमध्ये शाश्वततेचा महत्त्वाचा धडा त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला आहे. शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील अंतर कमी करण्याचा हा प्रयत्न आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
आज शेती केवळ उत्पादनापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर मूल्यवर्धनाच्या दिशेने वाटचाल करत आहे. शेतकर्यांनी उत्पादित केलेल्या कृषिमालावर प्रक्रिया करून त्याची बाजारात विक्री केल्यास अधिक उत्पन्न मिळू शकते. मात्र भांडवल, तंत्रज्ञान, ब्रँडिंग आणि विपणनाच्या मर्यादांमुळे अनेक सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग विकसित होऊ शकत नाहीत. हीच गरज लक्षात घेऊन केंद्र शासनाने ’प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग उन्नयन योजना’ (PMFME) सुरू केली आहे.
रानभाज्या म्हणजे निसर्गाने उधळलेला पोषणाचा अमूल्य खजिना. पावसाच्या सरींसोबत महाराष्ट्रातील रानावन, डोंगरउतार आणि शेतांचे बांध हिरव्यागार रानभाज्यांनी बहरून जातात. एकेकाळी आदिवासी आणि ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या या भाज्या आज पुन्हा आरोग्यदायी आहार, जैवविविधतेचे संवर्धन आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे प्रतीक म्हणून नव्याने चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या पोषणमूल्यांपासून औषधी गुणधर्मांपर्यंत आणि थेट शेतकरी-ग्राहक उपक्रमापर्यंतचा हा समृद्ध प्रवास म्हणजे ‘रानभाज्यांचे वैभव’ उलगडणारी एक प्रेरणादायी कहाणी आहे
जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाला पर्याय ठरलेल्या चीनच्या बांबू उद्योगाच्या यशानंतर, आता भारतातील बांबू क्षेत्राचा वेध घेणे गरजेचे आहे. सर्वाधिक बांबू क्षेत्र आणि सांस्कृतिक वारसा असूनही, पारंपरिक कायदे व व्यापारी दृष्टीकोनाच्या अभावामुळे आपण उत्पादनात मागे आहोत. प्रस्तुत लेखात भारतातील बांबू उद्योगाची सद्यस्थिती, नवीन सरकारी धोरणे आणि या क्षेत्रातील आर्थिक संधींचा नेमका घेतलेला हा आढावा.
भारतामध्ये खेळांची सध्याची परिस्थिती खूप उत्साहवर्धक आणि विकसित होत आहे. विविध क्रीडा प्रकारांमध्ये भारतीय खेळाडूंची कामगिरी जागतिक स्तरावर उठून दिसत आहे आणि खेळांबद्दल लोकांमध्येही वाढती आवड दिसून येत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंची कामगिरी आणि विविध क्रीडा उपक्रमांत गुंतवणूक वाढल्यामुळे. देशातल्या युवा खेळाडूंना जागतिक पातळीवर खेळण्याच्या संधी मिळत आहेत.
राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा भारतासाठी नेहमीच खास राहिल्या आहेत. ही स्पर्धा खरं तर ऑलिम्पिक, जागतिक स्पर्धा आणि आशियाई खेळांच्याही खालची. पण, जागतिक स्तरावर भारताची पहिली ओळख या स्पर्धांमुळे झाली. अंजली भागवत, सीमा शिरुर आणि दीपाली देशपांडे यांचा नेमबाजीतील उदय या स्पर्धेतून झाला. तिथून नेमबाजांना ओळख मिळाली. मुष्टीयुद्धातील भारतीय हुकूमत इथेच पहिल्यांदा प्रस्थापित झाली. आणि पुढे या दोन्ही खेळांत भारताने ऑलिम्पिक पदकांपर्यंत मजल मारली. यावेळी मात्र चित्र थोडं वेगळं होतं. राष्ट्रकूल स्पर्धेत नेमबाजी, कुस्ती हे
क्रीडा वकील करार बारकाईने तपासतो आणि पर्यायाने, आवश्यक बदलांसाठी योग्य वाटाघाटी करून खेळाडूसाठी अधिक सुरक्षिततेसाठी आणि फायदेशीर करार तयार करून देतो. परिणामी खेळाडूचा आर्थिक आणि व्यावसायिक फायदा तर होतोच, पण त्याच्या करिअरची सुरक्षितताही सुनिश्चित होते. त्यामुळे क्रीडा वकील म्हणजे केवळ वकील नाही, तर खेळाडूच्या करिअरचा खरा रक्षक आहे.
आजच्या डिजिटल युगात स्पोर्ट्स फोटोग्राफी हे फक्त फोटो काढण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. क्रीडा छायाचित्रणासाठी आज विविध माध्यमं उपलब्ध आहेत. योग्य माध्यम (Medium) निवडणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण प्रत्येक माध्यम वेगवेगळ्या प्रकारच्या संधी निर्माण करतं.
लक्ष्मणराव म्हणजेच ल.त्र्यं. जोशी हे मूल्याधिष्ठित पत्रकारितेचे प्रतीक होते. विकसनशील पत्रकारितेसोबत ध्येयवादिता हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग होता. जिथे खंबीर व्हायचे तिथे कोणत्याही परिणामांना घाबरायचे नाही पण मूळ तत्वांना चुकून जरी धक्का बसला तर त्याबद्दल मात्र विनयाने वागायचे, आदरपूर्वक वागायचे ही त्यांची भूमिका होती. ही पत्रकारितेसाठी आदर्श ठरणारी आहे.
‘मुस्लीम राष्ट्रीय मंच’ (MRM)चे राष्ट्रीय संयोजक, संघाचे स्वयंसेवक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि इस्लाम-ख्रिश्चन धर्माचे गाढे अभ्यासक विराग पाचपोर यांचे 18 जून 2026 रोजी निधन झाले. राष्ट्रीय मुस्लीम मंचाच्या कार्यात विरागजी यांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे. त्यांचा शांत स्वभाव, अभ्यासू वृत्ती आणि दूरदर्शी विचार यामुळे ते सर्वांना प्रिय होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख..
मराठी संगीत क्षेत्रातील स्वर शालीनतेचा आणि सुसंस्कृतपणाचा एक देखणा काळ म्हणजे सुमन कल्याणपूर... लतादीदींच्या युगातही त्यांनी आपल्या सात्विक गायकीनं रसिकांच्या मनात ‘आपल्याच घरातली मुलगी’ म्हणून हक्काची जागा मिळवली. दशरथ पुजारींपासून ते अशोक पत्कींपर्यंतच्या दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी मराठी गाण्यांना आपल्या स्वरांनी जी समृद्धी दिली, तिची जादू आजही कायम आहे. देवघरातल्या समईनं अचानक शांत व्हावं, अगदी तशाच निजधामाच्या प्रवसास निघालेल्या या लाडक्या गायिकेच्या आठवणींचा घेतलेला हा मागोवा.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर अहिल्यानगर जिल्हा कार्यवाह आणि निष्ठावान स्वयंसेवक लव शंकरराव शिंदे यांचे अचानक झालेले निधन हा संघ परिवारासाठी मोठा धक्का आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहणारा लेख..
विवेक पुस्तक प्रकाशनतर्फे 13 एप्रिल 2026ला म्हणजेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संवैधानिक चिंतन’ हे पुस्तक प्रकाशित होत आहे. पुस्तकातील एक प्रकरण विवेकच्या वाचकांसाठी...
गांधीजींची जडणघडण कशी झाली, महात्मा गांधींच्या चिंतनावर भगवद्गीता आणि उपनिषदे यांचा कसा प्रभाव होता...
साईबाबांची सम्यक ओळख करून देणारा आशयपूर्ण पुस्तक - साई माझा सांगाती
आपण आत्मचरित्रे, चरित्रे वाचलेली असतात. हे दोन्ही साहित्यप्रकार सर्वश्रुत आहेत. मात्र ”विचार-चरित्र” हा एक आगळावेगळा चरित्रप्रकार एका पुस्तकाच्या निमित्ताने समोर आला, ते पुस्तक म्हणजे रवींद्र गोळे लिखित ’गिरीश प्रभुणे-जसे कळले तसे’ हे होय!
भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये विशिष्ट विषयाचे ज्ञान पूर्वीपासून अस्तित्वात होते असे एखाद्या भारतीय अभ्यासकाने सांगितले तर त्यावर विश्वास बसत नाही, परंतु तीच गोष्ट एखाद्या पाश्चिमात्य विद्वानाकडून ऐकली की मग मात्र ती पटते, अशी अनेक भारतीयांची मानसिकता असते. आयआयटी कानपूर येथून डॉक्टरेट मिळवलेल्या भास्कर कांबळे यांच्या बाबतीतही असेच झाले.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
उद्योग, व्यवसाय उभा करणं हे तसं एकट्याचं काम नाही. ते टीमवर्क आहे. व्यवसाय उभा राहण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अनेकांचा हातभार, सहकार्य लागत असतं, तेव्हा व्यवसाय उभा राहतो, मोठा होतो. यासाठी एक इकोसिस्टिम तयार करणं गरजेचं असतं. हीच गरज ओळखून देशातली आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी असलेल्या पर्सिस्टंट सिस्टम्सचे संस्थापक डॉ. आनंद देशपांडे यांनी 2013 मध्ये देआसरा फाउंडेशनची मुहूर्तमेढ रोवली आणि कामाला सुरुवात झाली. देआसरा फाउंडेशनचा मुख्य उद्देश आहे नवे उद्योजक निर्माण करणं, जे उद्योग करत आहेत त्यांना आणखी मोठं होण्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील उत्तेजानार्थ क्रमांक प्राप्त संतोष पाटील यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील तृतीय क्रमांक प्राप्त डॉ. अविनाश भोंडवे यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, 'सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील द्वितीय क्रमांक विजेती कथा..
Vivek saptahik - साप्ताहिक विवेक
Indian Politics Changed After 2014: नवभारताची स्पंदने भाग १: २०१४ नंतर कसा बदलला राजकारणाचा सारीपाट?
नवभारताची स्पंदने भाग 2: हिंदुत्वाची नवी परिभाषाराष्ट्रवाद आणि विकास
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये