Enter your Email Address to subscribe to our newsletters
दि. 19 जुलै रोजी मायक्रोसॉफ्टमध्ये बिघाड झाल्याने संगणकीकृत यंत्रणा ठप्प झाल्याची माहिती येऊ लागली. याचा फटका ऑफिस, हॉस्पिटल, विमानतळ अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बसला. यावर उपाय म्हणून मायक्रोसॉफ्टने झालेली चूक दुरुस्त करून नवीन अपडेट विंडोजकरिता सुरू केले. त्याच्या इंस्टॉलेशननंतर सर्व अडचणी दूर झाल्या; पण यामुळे एक अब्ज डॉलर म्हणजेच 8000 कोटी रुपयांच्या घरात नुकसान झाले असण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. घडल्या प्रकारामुळे विंडोज या मायक्रोसॉफ्टच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर जगाचे अवलंबित्व किती आ
कारगिलचं युद्ध सदैव विजयाचं प्रतीक म्हणून येणार्या अनेक पिढ्यांना प्रेरित करत राहील. असंख्य भारतीय सैनिकांनी आपल्या शौर्यानं जिथे आकाशाला गवसणी घातली आणि सर्वोच्च बलिदान दिलं त्या टोलोलिंगच्या पायथ्याशी कारगिल युद्धस्मारक बांधण्यात आलं आहे. या विजयाच्या स्मरणार्थ 26 जुलै हा ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून आपण साजरा करतो. कारगिल विजयाचं हे रजतमहोत्सवी वर्ष! कारगिलच्या युद्धस्मारकात रोवलेल्या त्या स्मरणशिलांमागची एकेक कथा शौर्याची चिरंतन गाथा सांगणारी आहे.
राजकारणात 'रेलेव्हंट’ राहावे लागते, असे देवेंद्र फडणवीस अनेकदा म्हणाले आहेत. त्यांनी राज्याच्या राजकारणात ’रेलेव्हंट’ राहणे, ही केवळ त्यांची गरज नाही, तर त्यांच्या पक्षाची आणि महाराष्ट्र राज्याचीही गरज आहे. या नाजूक व अवघड राजकीय स्थितीत योद्धा-राजनेता असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्तृत्व आणखी उजळून निघावे आणि यातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक निश्चित दिशा मिळावी, हीच देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!
संन्याशाच्या वेशात अविमुक्तेश्वरानंद पाखंड करत आहेत. दुसरीकडे प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा पक्ष, अशी थाप मारत उद्धव ठाकरे राजकीय पाखंड करत आहेत. त्यांना उद्धव ठाकरे जवळचे वाटले असल्यास नवल नाही. त्यांना आपल्या मित्रपक्षांची आणि महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक करणारे व्यक्ती निर्दोष वाटणारच. एकावर साक्षात आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या धर्मपीठाची फसवणूक करण्याचा आरोप आहे, दुसर्याने वडिलांच्या विचारसरणीशी प्रतारणा केली आहे. एकाने भगवी वस्त्रे घालून श्रद्धेचा खेळ मांडला आहे, दुसर्याने भगव्याची झूल पा
राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नावाच्या संस्थेशी संबंधित काही महत्त्वाचे प्रश्न आज महाराष्ट्रात उभे राहिले आहेत ज्यांची उत्तरे शोधणे भविष्यातील आव्हानांचा विचार करता हिंदुत्व चळवळीसाठी नितांत आवश्यक बनले आहे. या प्रश्नांपैकी सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा ‘कार्यकर्ता आज कुठे आहे?’ आणि विशेष म्हणजे हा प्रश्न खुद्द कार्यकर्त्यांनीच विचारलेला वा उपस्थित केलेला आहे की, वर्तमान राजकीय परिस्थितीमध्ये, प्रक्रियेमध्ये आम्ही कुठे आहोत? याच प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘साप्ताहिक विवेक’च्या निमेश वहाळकर यांनी राज्याच्
फडणवीसांवर कितीही राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले तरी त्यांचा सामना करायला ते समर्थ आहेत, हेही आपण जाणतो. तरीदेखील येथे आधी उल्लेखलेला प्रश्न अनुत्तरितच राहतो की, मुळात हे असे बेछूट आरोप करणारे श्याम मानव कोण? त्यांचा यात संबंध काय आणि ते आताच हे सारे का बरळत आहेत?
भारतीय मजदूर संघ केवळ विशुद्ध कामगार संघटना नसून ती जबाबदार सामाजिक संघटनादेखील आहे. त्यामुळे सत्तराव्या वर्षात विविध उपक्रम भारतीय मजदूर संघाने हाती घेतले आहेत. येणार्या काळात संपर्क अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्रात सुमारे दहा लाख कामगारांशी संपर्क करून मजदूर संघ पोहोचवण्यात येणार आहे. तसेच भारतीय मजदूर संघाचे काम तळागाळात सर्वदूर पोहोचावे यासाठी महाराष्ट्रात सुमारे शंभरपेक्षा जास्त विस्तारक निघणार असून ते विविध क्षेत्रांत काम वाढवण्यास आणि नवीन संघटना निर्माण करण्यासाठी काम करणार आहेत.
‘तळकोकण’ म्हणजे साधारणतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दक्षिण भाग. या तळकोकणाला एक वेगळी ‘आपली’ अशी संस्कृती आहे. पर्यटनवाढीला कोकणात प्रचंड वाव आहे. काय बघायचं, या प्रश्नाची अनेक आकर्षक उत्तरं निर्माण करायला कोकणी माणसाने शिकायला हवं. परिसर भरपूर फिरून पर्यटनमूल्य असलेली ठिकाणं हुडकायला हवीत. परिसराचं वर्णन, त्याची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक माहिती ही आपण जेवढी जास्तीत जास्त मिळवू तेवढं कोकणातल्या सामान्य जागांनाही पर्यटनमूल्य येईल. परिसराचा जेवढ्या सूक्ष्म पातळीवर अभ्यास होईल तेवढी पर्यटनाची क्षितिजं विस्तारतील आणि
महाराष्ट्राच्या संदर्भात आपल्याकडे प्रागैतिहासिक कालखंडात सावळदा संस्कृती, जोर्वे संस्कृती, मावळा संस्कृती अशा भिन्नभिन्न नावांनी प्रसिद्ध झालेल्या संस्कृती आढळतात. त्यांचा कालखंड ठरवताना त्या त्या काळात निर्माण झालेली मातीची भांडी, त्यांची आकारवैशिष्ट्ये, पोत इत्यादींच्या आधारे पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी ही नावे दिलेली आहेत. त्या त्या स्थानांवर सापडलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या शैलींच्या भांड्यांवरून व कुंभारांच्या कलाकृतींवरून संस्कृतींना मिळालेली ही नावे वैशिष्ट्यपूर्ण ठरतात.
कमल ग्रुप्सअंतर्गत जनजागृती ‘पे बॅक टू सोसायटी’ या संकल्पनेतून मुलींना आरोग्य आणि मासिक पाळी याविषयी शाळा-शाळांतून मार्गदर्शन करणार्या डॉ. उन्नती शिंदे हिच्या निःस्वार्थी वृत्तीचा आणि समाज निरोगी ठेवण्याच्या कार्याचा घेतलेला आढावा.
डॉ. अजय हौदे हे सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील दुधनी खेड्यातील अतिशय सामान्य कुटुंबातील होते. अजय यांनी पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये एम.एस्सी. केले. काही रिसर्च प्रकाशने आणि तीन पेटंट्स मिळाल्यावर आज त्यांच्या नावे 68 पेटंट्स आहेत, ज्याचा उपयोग विविध प्रॉडक्ट्स तयार करण्यात केला गेला. आरोग्य क्षेत्रात ही ‘अजय’ यात्रा निरंतर चालू आहे.
नुकताच मी तीनशे तरुण-तरुणींसोबत हिमालयामधील खेड्यांमध्ये सेवाकुंरच्या माध्यमातून एका सेवा प्रकल्पासाठी प्रवास केला त्या वेळी जाणवले की, भारत अजून जागा आहे. आपल्याला ज्या भारतीय मूल्यांचा अभिमान वाटतो, या काळातही टिकून आहेत. विशेष म्हणजे सेवांकुर हा सेवा उपक्रम गेली आठ वर्षे यशस्वीपणे चालू आहे. त्याचे हे अनुभवकथन मांडताना मला विलक्षण संतोष होत आहे.
लातूर येथील ख्यातकीर्त विवेकानंद रुग्णालयाच्या कर्करोग व सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या, व्यापक विस्ताराचा ‘लोकार्पण’ कार्यक्रम दि. 20 फेब्रुवारी रोजी पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुखभाई मांडविया व टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. राजेंद्र बडवे (प्रो. एमिरिट्स) हेही उपस्थित होते. अत्यंत भव्य, हृद्य व नेटक्या सोहळ्याचा वृत्तान्त आमचे प्रतिनिधी विलास आराध्ये यांनी दिला आहे.
लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ (ता. अहमदपूर) येथील छोटासा डोंगर संजीवनी बेट (औषधी वनस्पती) म्हणून ओळखला जातो. या बेटावर सुमारे 177 दुर्मीळ औषधी वनस्पती आढळतात. याखेरीज हे ठिकाण ‘टोमॅटोचे गाव’ म्हणून प्रसिद्ध आहे. टोमॅटो खरेदीसाठी दिल्ली, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील व्यापारी या ठिकाणी ठाण मांडून असतात.
आजच्या काळात शाश्वत पर्यावरणाबरोबरच शाश्वत शेतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेतकर्यांना शाश्वत उत्पन्न मिळवायचं असेल तर शाश्वत फायदेशीर वृक्ष लागवडीची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर पितांबरीने बांबू, चंदन, मिलिया डुबिया, रक्तचंदन आदी झाडांची लागवड केली आहे.
उद्योजक होण्यासाठी उद्योजकाच्याच घरात जन्मावे लागते असे नाही, तर स्वतःची जिद्द व मेहनत करण्याची तयारी असेल, तर एक सर्वसामान्य घरातील मुलगादेखील उद्योग क्षेत्रात स्वतःचे नाव कोरून ठेवू शकतो, हे लातूर येथील अनिल वारद यांनी नर्सरी उद्योगातून सिद्ध केले आहे.
चाकूर तालुक्यातील तीवटघाळ या छोट्या गावात शिवाजी पाटील यांची 40 एकर शेती आहे. शिवाजी यांनी लहानपणापासून शेतीची आवड जोपासली आहे.
टी-20 विश्वचषकात भारतीय संघाने केलेल्या सांघिक कामगिरीमुळे भारताला तब्बल 13 वर्षांनी टी-20 विश्वचषक जिंकता आला. प्रत्येक खेळाडूने आपापला वाटा चोख उचलला तर अंतिम विजय साध्य होतो याचेच दर्शन टी-20 विश्वचषकात दिसून आले. भारतीय संघ या स्पर्धेत विजेत्याच्या थाटात खेळला आणि विजेत्यासारखाच जिंकला. भारतीय संघ आता फक्त क्रमवारीतील अव्वल संघ नाहीए, तर तो चॅम्पियन संघही झाला आहे.
डिसेंबर 2023 मध्ये गुकेश कॅन्डिडेट्स 2024 स्पर्धेसाठी पात्र ठरला आणि पुन्हा एकदा आणखी एक विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. ही स्पर्धा खेळणारा तो सर्वात लहान खेळाडू आहे. कमी वयाचा जगज्जेता होण्याचं दोम्माराजू गुकेश याचं स्वप्न आहे. आता चाहतेही त्याच्या स्वप्नपूर्तीची वाट बघू लागले आहेत. ह्या लेखात जाणून घेऊ या, जागतिक बुद्धिबळात भारताचा झेंडा अभिमानाने उंचावलेल्या डी. गुकेशचा आत्तापर्यंतचा प्रवास.
बुद्धिबळातील नवीन विश्वविजेता होण्यासाठी कोण आव्हान देणार, हे ठरवणाऱ्या कँडीडेट स्पर्धेत भारताचे ग्रँडमास्टर, चेन्नईचे सुपुत्र डी. गुकेश यांनी विजय संपादित केला. ही स्पर्धा जिंकणारे ते जगातील सर्वात तरुण बुद्धिबळपटू आहेत. ते २०२५ साली होणाऱ्या जागतिक बुद्धिबळ विश्वविजेता स्पर्धेत विद्यमान बुद्धिबळ विश्वविजेता चीनच्या ग्रँडमास्टर डींग लिरेन याला विश्वविजेता पदासाठी आव्हान देतील.
क्रिकेटचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 10व्या वर्षी उत्तर प्रदेशच्या खेड्यातून मुंबईत आलेला आणि इथे एकटं राहून आपलं आयुष्य घडवणारा मुलगा म्हणजेच सध्याचा भारतीय क्रिकेटचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल! आक्रमक, कुठलेही आव्हानात्मक फटके खेळताना न बिचकणारा, पण तरीही सातत्यपूर्ण धावा करणारा यशस्वी सध्या क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलाय. अशा या यशस्वी जयस्वालच्या उत्तर प्रदेश ते मुंबई प्रवासाचा आणि आझाद मैदानातील तंबू ते कसोटी क्रिकेटमधील दोन द्विशतकं या उत्तुंग कामगिरीचा आढावा घेणारा लेख...
भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंतराव कळंबेळकर यांचे 16 जून 2024 रोजी सकाळी मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.
संघ संस्काराचे बीज व्रतासारखे जोपासलेले माधव जोशी यांनी आर्थिक कमाईसाठी जी माध्यमे निवडली ती ही राष्ट्रीय वृत्तीच्या जोपासनेला आणि राष्ट्रहिताच्या कार्यविस्ताराला पूरक ठरावी अशी. मुळातच नोकरी करावी ही मानसिकता नसल्यामुळे त्याने ’आपला परममित्र’ नावाचे द्वैमासिक सुरू केले आणि त्यातूनच पुढे ’परममित्र पब्लिकेशन्स’ ही प्रकाशन संस्था सुरू केली. परममित्र पब्लिकेशन्सलाही आता 25 वर्षे पूर्ण होत आली आहेत. ’पॉप्युलिस्ट आणि पेइंग’ पुस्तक प्रकाशनाच्या दिशेने न वळण्याचा कटाक्ष माधवने बाळगला. राष्ट्रीय-सामाजिकदृष्ट्या महत
रामोजी राव अतिशय कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व. 1998 साली भारतातलं पहिलं सॅटेलाइट अपलिंकिंग स्टेशन फिल्म सिटीमध्ये उभारून टेलिकास्ट त्यांनीच सुरू केलं. त्यांना गाठायला इतरांना बरीच वर्षे लागली. त्यांचं सगळं करणं म्हणजे प्रचंड... भव्य... डझनात! नक्षली अतिरेक्यांनी व्यापलेल्या क्षेत्राचा विचार करणे हीच गोष्ट दुरापास्त अशा ठिकाणी ‘रामोजी फिल्म सिटी’ हे 2000 एकरांचं भव्य पार्क निर्माण केले. आज लाखोे पर्यटकांचे पसंतीचे पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जातं.
1995 मध्ये अमरावतीला विदर्भ व नागपूर अशा दोन प्रांतांचे एकत्रित ‘कार्यकर्ता शिबीर’ झाले. याच वेळी दोन्ही प्रांतांचे एकीकरण झाले. शिरीषजी या सुमारास अमरावती जिल्हा प्रचारक म्हणून काम बघत होते. इथे त्यांचा अधिक सहवास लाभल्याने त्यांची स्वभावगुणवैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवली. शिरीषजींनी स्वतःला कराव्या लागणार्या परिश्रमाची कधी पर्वा केली नाही. एकाएकी साथ सोडून गेलेल्या सहकार्यास भावपूर्ण श्रद्धांजली.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संस्था हा संघकामाचाच एक भाग आहे, याचे भान नानांनी कधी सोडले नाही. म्हणून मीपणाचा लोभ, सामूहिक निर्णय प्रक्रिया, राष्ट्रभक्तीचा भाव असे सगळे विषय त्यांनी प्रत्येक संस्थेत रुजविले. नानांनी जो उपक्रम हाती घेतला, तो सक्षम कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला आणि दुसर्या उपक्रमात रममाण झाले.
विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक… साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…
पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
75 वर्षे हा मोठा कालखंड! विवेकपूर्वी सुरू झालेली आणि विवेकनंतर सुरू झालेली कितीतरी साप्ताहिके काळाच्या ओघात लुप्त झाली. पण विवेक अजूनही ऐन उमेदीत आहे. कालानुरूप आपल्यात बदल करण्यात ज्यांना यश येते, तेच कालप्रवाहात टिकून राहतात. विवेकमध्ये कालानुरूप काही बदल अवश्य झालेले आहेत. मात्र काही बाबतीत विवेक अजिबात बदललेला नाही. कारण विवेक कशासाठी चालवायचा हे आमच्यासमोर स्पष्ट आहे. हिंदू समाजाशी संबंधित अनेक विषयांत न थकता, न कंटाळता, आळस न करता सतत जागृती करावी लागते. हे विवेकने स्वीकारलेले व्रत आहे. घेतला वसा टाकू
या शतायुषी कार्याच्या इथवरच्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आणि वर्तमानाचा विवेकच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने घेतलेला वेध...
इजिप्तमधील कार्नाक मंदिर त्याच्या भव्यतेने भारून टाकते. भव्यता हा इजिप्तमधील मंदिरांचा स्थायिभाव आहे. कार्नाक मंदिरही याला अपवाद नाही. इजिप्तमधील छोट्यात छोट्या पुरातन मंदिरांची उंची कमीत कमी सात मजली तरी असतेच! अवाढव्य ’हायपोस्टाइल हॉल’ हे कार्नाक मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे. याला ’हॉल’ कसे म्हणावे इतका तो अजस्र आहे. भारतातील कोणार्क मंदिर सूक्ष्म तपशिलांनी आकर्षित करते. दगडामध्ये एवढे सूक्ष्म तपशील कोरणे त्या काळात कसे साध्य केले असेल, याचे आश्चर्य वाटते. एका दृष्टीने कोणार्क मंदिर हे विज्ञान आणि सौंदर्य य
‘बंगलोर डेज’ या चित्रपटात तीन भावंडांची गोष्ट आहे. लग्नसंस्थेचा आणि कुटुंबसंस्थेचा अनुभव ह्यातील तिन्ही मुलांसाठी वेगवेगळा आहे, परंतु तरीही आयुष्यभरासाठी साथ देणारा सोबती शोधायची इच्छा तिघांचीही आहे. त्यासाठी स्वत: बदलण्याचीसुद्धा त्यांची तयारी आहे. प्रत्येक कुटुंबात ऊन आणि चांदण्याचा पाठशिवणीचा खेळ चालूच असतो. एकमेकांसाठी आपण आहोत एवढी जाणीव त्यातून बाहेर यायला मदत करते, हा संदेश हा चित्रपट देतो.
Vivek saptahik - साप्ताहिक विवेक
लोकमान्यांनी बसवलेल्या गणपतीची नावे कशी बदलत गेली ?
‘हा’ गणपती आहे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
…आणि लोकमान्य भावूक झाले
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये