Enter your Email Address to subscribe to our newsletters
एके दिवशी तुम्हाला एखाद्या कस्टम अधिकार्याचा, पोलिसांचा, अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) किंवा तत्सम शासकीय अधिकार्याचा व्हिडीओ कॉल येऊ शकतो. तुम्ही परदेशात ड्रग किंवा तत्सम बंदी असलेली वस्तू पाठवली आहे किंवा कर बुडवला किंवा सोशल मीडियावर चुकीची माहिती पोस्ट केली आहे किंवा अन्य कोणतेही कारण सांगितले जाऊ शकते. तुमचा आधार कार्ड क्रमांक आणि अन्य खासगी माहिती अचूकपणे सांगून तुमची खात्री पटवली जाऊ शकते. आणखी खात्री करण्यासाठी एखाद्या पोलीस स्थानकात येण्याबाबतही कळवले जाऊ शकते. दरम्यान कॉल सुरू असतानाच हे प्रकरण
यंदाचे सातवे नुक्कड साहित्य संमेलन आणि तिसरे बाल साहित्य संमेलन 4 आणि 5 जानेवारी 2025 रोजी संपन्न झाले. ‘अभिजात मराठी भाषा’ हा विषय या संमेलनाच्या केंद्रस्थानी ठेवून साहित्य क्षेत्रात कार्यरत असणार्या अनेक मान्यवरांचा संमेलनात सहभाग होता. तसेच साहित्य संमेलनात सर्व वयोगटांतील मराठी भाषकांनी सहभाग नोंदविल्यामुळे कार्यक्रम सर्वसमावेशक झाला.
भारतातील अनेक मोठ्या शहरांसाठी हवा प्रदूषण धोकादायक पातळीच्याही वरपर्यंत वाढण्याचा काळ म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरचा कालखंड. गेल्या काही वर्षांपासून देशातील अनेक महानगरं त्याच दिशेनं वाटचाल करू लागली आहेत! दिल्ली हे या आपत्तीचं प्रातिनिधिक शहर म्हणून जगभरात याआधीच प्रसिद्धी पावलं आहे. दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांच्या हवेत साचणारे धूर आणि धुळीचे कण अभिशाप बनून लक्षावधी लोकांसमोर आरोग्याचं मोठं संकट उभं करीत आहेत.
दिनांक 2 जानेवारी 1940 या दिवशी कराडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस भेट दिली होती. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून ज्या ठिकाणास डॉ. आंबेडकरांनी भेट दिली त्या श्री भवानी संघस्थानावर बंधुता परिषद या वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन कराड येथे लोककल्याण मंडळ ट्रस्टद्वारे करण्यात आले.
ब्रह्मपुत्रेवरील नव्या धरणामुळे भारतापुढे मोठ्या समस्या उभ्या राहणार असतील तर भारत काय करणार आहे, हा मोठा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय नद्यांसंबंधीचे जे काही कायदे आहेत, ते चीन पाळणार नाही हे उघड आहे. त्यामुळे भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर हा प्रश्न उपस्थित करून काहीही हाती लागणार नाही हे स्पष्ट आहे. हे धरण म्हणजे चीनच्या हातातले एक शस्त्र आहे, त्यामुळे ‘शस्त्राघाता शस्त्रच उत्तर’ या न्यायाने भारताने अरुणाचल प्रदेशातील सिआंग येथे ब्रह्मपुत्रेवर एक धरण बांधण्याचा तत्त्वत: निर्णय घेतला आहे.
वास्तविक कुंभमेळा ही हिंदूंची प्राचीन परंपरा आहे. ज्या वेळी भारतातच काय, पण जगाच्या पाठीवर कुठेही इस्लाम अस्तित्वातही नव्हता तेव्हापासून भारतात फक्त चारच तीर्थक्षेत्री कुंभमेळा होतो आहे. तेव्हा ही जमीन वक्फची आहे, असा दावा करणे हे किती बिनबुडाचे आहे हे यावरून लक्षात यावे.
विषयजनित सुखांच्या मागे धावल्याने कोणीही सुखी होणार नाही. शाश्वत रामाच्या ठिकाणी जो श्रद्धा ठेवून त्याची भक्ती करतो, त्याचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन तो सुखीसमाधानी होतो. याव्यतिरिक्त अशाश्वत गोष्टींच्या मागे धावत राहिल्याने कसलाच लाभ होत नाही, हित साधले जात नाही. म्हणून ते सर्व व्यर्थ आहे. याचाच अर्थ रघुनाथाशिवाय सर्व व्यर्थ आहे.
जंगल संवर्धनाचे काम हे सबसिडी-बेस्ड काम नाही, अशी स्पष्ट भूमिका घेऊन ‘अप्लाइड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च फाऊंडेशन’ जगभर वावरत आहे. या संस्थेने तीन दशकांच्या कार्यपूर्ततेच्या पार्श्वभूमीवर नुकताच कोकणातील देवरुख कार्यक्षेत्रात दोन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित केला होता. यातून संस्थेच्या कामाची पद्धत, त्यांनी आजवर केलेेले जंगल संवर्धनाचे काम याचा आढावा घेणारा लेख...
नववर्षारंभ काळात फुललेल्या ‘दुर्मीळ’ झुंबर वेलीनं आम्हाला आकर्षित केलं. हिवाळ्याच्या दिवसांत बहरणं आम्हाला सवयीचं झालेलं होतं; पण यंदाही बहरलेल्या ‘झुंबर’ वेलीचं प्रभावशाली सौंदर्य अधिक लोभस वाटलं. पुरेशा प्रकाशात फुलणार्या आणि फारसे दस्तऐवजीकरण न झालेल्या झुंबर वेलीची दुर्मीळता आमच्या ध्यानात आली. ही ‘झुंबर वेल’ पाहाणं हे खरोखरच सुंदरतेचं प्रतीक आहे...
HMPV व्हायरसची बातमी चीनच्या कोणा एका व्यक्तीने ट्वीट केली, ही एवढी एकच बाब सर्व मीडियाच्या ओव्हर रिअॅक्शनला कारणीभूत ठरली. HMPV च्या बातम्या सर्वच मीडियाने उलटसुलट रंगवल्या. या बातम्यांमुळे भीतीचे सावट निर्माण झाले. खरं तर HMPV या विषाणूमुळे कोणताही धोका नाही. गरज आहे ती काळजी घेण्याची.
केवळ रोग, आजार, विकार नव्हे, तर आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटकदेखील आरोग्यावर परिणाम करतात. त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये केवळ वैद्यकीय सेवा न पुरवता सामाजिक प्रश्नांची उकल लक्षात घेऊन श्री गुरुजी रुग्णालयामार्फत सामाजिक कार्य करण्यात येते. एक सुदृढ, निरामय समाज घडावा यासाठी ही चळवळ सुरू आहे. म्हणूनच नाशिक जिल्हा व परिसरात अल्प दरात उत्तम, दर्जेदार आरोग्यसेवा मिळविण्यासाठी श्री गुरुजी रुग्णालयाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. सर्वसामान्य जनतेला आधार व दिलासा देण्याचे काम येथे सातत्याने करण्यात येते.
कमल ग्रुप्सअंतर्गत जनजागृती ‘पे बॅक टू सोसायटी’ या संकल्पनेतून मुलींना आरोग्य आणि मासिक पाळी याविषयी शाळा-शाळांतून मार्गदर्शन करणार्या डॉ. उन्नती शिंदे हिच्या निःस्वार्थी वृत्तीचा आणि समाज निरोगी ठेवण्याच्या कार्याचा घेतलेला आढावा.
डॉ. अजय हौदे हे सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील दुधनी खेड्यातील अतिशय सामान्य कुटुंबातील होते. अजय यांनी पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये एम.एस्सी. केले. काही रिसर्च प्रकाशने आणि तीन पेटंट्स मिळाल्यावर आज त्यांच्या नावे 68 पेटंट्स आहेत, ज्याचा उपयोग विविध प्रॉडक्ट्स तयार करण्यात केला गेला. आरोग्य क्षेत्रात ही ‘अजय’ यात्रा निरंतर चालू आहे.
महाराष्ट्रात नानाविध सणांची मोठी परंपरा आहे. त्यातील एक सण म्हणजे ‘येळवस’ अर्थात ‘दर्श वेळ अमावस्या’. ग्रामीण व कृषी संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा सण लातूर, बीड, धाराशिव, नांदेड व सोलापूर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी शेतकरी आपल्या काळ्या आईची मनोभावे पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतो. आहार, विहार, आरोग्य आणि सांस्कृतिक मूल्य जपणार्या या सणाविषयी माहिती सांगणारा हा लेख.
धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथील चौधरी बंधूंनी तीन एकरांवर ड्रॅगन फ्रुटची यशस्वी लागवड केली आहे. हा जळगाव जिल्ह्यातला पहिला प्रयोग मानला जात आहे. जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा व अत्याधुनिक ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून वर्षाला एकरी तीन लाख रुपयांचे उत्पादन ते घेत आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या उत्तर कोकण किनारपट्टीच्या भागात वैविध्यपूर्ण शेती केली जाते. त्यामध्ये पानवेलीच्या शेतीला मोठा इतिहास आहे. ही शेती पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. एके काळी वसईच्या काळी पानाची निर्यात केली जात असे. माहिम केळव्याच्या पानाला बाजारपेठेत स्थान होते. पालघर जिल्ह्यातील पानवेलीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे कृषिभूषण जयवंत चौधरी यांचे ‘बहुगुणी श्रीमंत पानवेल’ हे पुस्तक होय.
भविष्यात पिकाचे जमिनीतील बुडखे, तणाचे बुडखे जमिनीतच कुजविणे यावर कृषी शिक्षण व संशोधनात प्रथम प्राधान्य द्यावे लागेल तरच जमीन, जमिनीतील जिवाणू आणि जमिनीतील हवेचे व्यवस्थापन या पायाभूत घटकांचे सशक्तीकरण होईल आणि शेतकर्यांचा उत्पादन खर्च 40 टक्क्यांपर्यंत कमी होण्यास मदत होईल.
यंदाची 24 वी राष्ट्रीय वनवासी खेलकूद प्रतियोगिता छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत संपन्न झाली. या स्पर्धा म्हणजे प्रचंड ऊर्जेने भारलेला क्रीडा महोत्सव असतो. तिरंदाजी आणि फुटबॉल या दोन प्रकारांमध्ये यंदाची स्पर्धा झाली. यानिमित्त वनवासी क्षेत्रातील युवकांची खेळामधील प्रतिभा शोधतानाच त्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणे आणि खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता दृढ करणे हे वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख उद्दिष्ट साकार होत आहे.
12 डिसेंबर 2024. भारताच्या बुद्धिबळ इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी असा दिवस. 11 वर्षांनी भारताला पुन्हा एकदा बुद्धिबळाचा जगज्जेता मिळाला. अठरा वर्षांच्या गुकेशने हा पराक्रम केला. जगज्जेतेपदापर्यंतचा गुकेशच्या प्रवासाचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
हंगेरीतील बुडापेस्ट येथे नुकत्याच पार पडलेल्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. दोन सांघिक आणि चार वैयक्तिक सुवर्णपदकांची कमाई भारताने या स्पर्धेत केली. या लेखात आपण जाणून घेणार आहोत या स्पर्धेबद्दल तसेच भारताच्या बुद्धिबळातील यशस्वी वाटचालीबद्दल.
पॅरालिम्पिक स्पर्धांमधील गेल्या चार वर्षांच्या कामगिरीकडे पाहिले तर लक्षात येईल, की भारताच्या प्रगतीचा आलेख कायम चढता राहिला आहे. भारताने पॅरिसमध्ये 29 पदके मिळवली. सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि तेरा कांस्यपदकांचा यामध्ये समावेश आहे. स्पर्धेची पात्रता मिळवणार्या खेळाडूंची संख्याही वाढत आहे. पॅरिसमधील भारताचे हे यश या सर्व सकारात्मक बदलांची नांदी ठरेल, हीच अपेक्षा आहे. तसेच पदकांची आकडेवारी पाहता 2028 च्या लॉस एंजिलिस पॅरालिम्पिकमध्ये आपण पदकांच्या अर्धशतकापर्यंत मजल मारली तरीही आश्चर्य वाटणार नाही.
ज्येष्ठ कथाकार, कादंबरीकार सुप्रिया अय्यर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची ग्रंथसंपदा बरीच मोठी आहे. ‘खुळी बोगनवेल’, ‘सोन्याचे दरवाजे’, ‘किनखापी मोर’; वर्हाडीत ‘सनान्र्ेऽऽ बोंद्य्रा’ हे कथासंग्रह गाजले होते. ‘चांदणचुरा’ आणि ‘काही शुभ्र कमळें’ ही ललित-स्तंभलेखनाची पुस्तके आहेत. ‘सा. विवेक’च्या दिवाळी अंकात त्यांनी लेखन केले होते. अनेक वाङ्मयीन पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. त्यांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख..
बुजुर्ग व्यक्तिमत्त्वांसमोर आपला सर्व बहुमान आणि प्रतिष्ठा विसरून क्षणार्धात झुकणारे झाकीरभाई. वलयांकितांपासून वलय नसलेल्या कलाकारांना आपल्या संगतीने वलय प्राप्त करून देणारे झाकीरभाई. सूक्ष्मातील सूक्ष्म मात्रांच्या अवघड हिशोबाला हसत हसत कलेचे परिमाण देणारे झाकीरभाई. जुन्या काळातील पांडित्यपूर्ण तबला सुगम करून जगभरातील संगीत श्रोत्यांना तालाचा आणि लयीचा आनंद देणारे असामान्य तबलावादक. तरुणाईला आपल्या अद्भुत वादनाने सदैव प्रेरित करणारे, वादन आणि वादकांना आधुनिकतेचा साज चढवणारे, एकमेवाद्वितीय, अजातशत्रू झाकीरभ
भल्याभल्यांना संपूर्ण हयात घालवूनदेखील न येणारी संगीताची समज झाकीरभाईंना तरुण वयातच आलेली होती. त्यात दुग्धशर्करा योग म्हणजे त्यांच्या अलौकिक गुणांना आकर्षक व्यक्तिमत्त्वाचीदेखील जोड होती. सर्व योग व्यवस्थित जुळून आले होते. अल्पावधीत झाकीरभाई आसेतुहिमाचल प्रसिद्ध झाले. संपूर्ण भारतवर्षातील तालवेड्या तरुणाईला त्यांनी वेड लावले. तबलावादनात त्यांचे स्थान ध्रुवतार्यासम अढळ आहे.
मिलिंद आणि माझे स्वभाव तसे विरुद्ध तरीदेखील आमची मैत्री अभंग राहिली. कॉलेजजीवनात असल्यापासूनच जेव्हा जेव्हा आम्ही भेटत असू, पूर्ण कपभर चहा न पिता अर्धा कप चहा घेत असू.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संस्था हा संघकामाचाच एक भाग आहे, याचे भान नानांनी कधी सोडले नाही. म्हणून मीपणाचा लोभ, सामूहिक निर्णय प्रक्रिया, राष्ट्रभक्तीचा भाव असे सगळे विषय त्यांनी प्रत्येक संस्थेत रुजविले. नानांनी जो उपक्रम हाती घेतला, तो सक्षम कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला आणि दुसर्या उपक्रमात रममाण झाले.
विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक… साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…
पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
‘वसुधैव कुटुंबकम’ हाच भारतीय संस्कृतीचा संदेश आहे. कुंभ आपल्या देशाची विविधता आणि समृद्ध संस्कृती समजावून घेण्याचे उत्तम साधन आहे. 2025 च्या महाकुंभाच्या निमित्ताने इथे भाविक आणि पर्यटकांना अनेक प्रदेशांच्या विविध कला पाहावयास मिळतील. या कुंभाचा शुभारंभ मकरसंक्रांतीपासून होत आहे. यानिमित्त भारताच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन इथे घडणार आहे.
‘विवेक व्यासपीठ’ आणि ‘श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ’ यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले राष्ट्रसाधक शिबिर दि. 20 डिसेंबर 2024 ते दि. 22 डिसेंबर 2024 या कालावधीत श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज ग्रंथालय, श्री क्षेत्र आळंदी (देवाची) पुणे येथे तीन दिवसांचे निवासी शिबिर संपन्न झाले. ‘आत्मविकासापासून राष्ट्रभक्तीपर्यंतचा प्रवास’ हा या शिबिराचा मुख्य उद्देश डोळ्यांसमोर होता. ‘आत्मोन्नतीबरोबर राष्ट्रसाधना करणारा तो राष्ट्रसाधक’ अशा भूमिकेतून सर्व सत्रांची मांडणी करण्यात आली. यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील 26 शिबिर
मनुष्यप्राण्यांचे समूहीकरण म्हणजे समाज होय. समाजाची स्वतःची अशी मूल्ये आणि विचार असतात. समाजाच्या या मौलिक गोष्टींचे जर विस्मरण झाले, तर समाजाची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही आणि समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः आपलीदेखील अधोगतीकडे वाटचाल सुरू होते. व्यक्तीला जसे मन असते तसे समाजालादेखील मन असते. त्याला समाजाची सदसद्विवेकबुद्धी असे म्हणतात. ही सदसद्विवेकबुद्धी समाज जेव्हा हरवून बसतो तेव्हा त्याची अवस्था अत्यंत वाईट होते. ही अवस्था म्हणजे आजचा हरवलेला महाराष्ट्र आहे. आजचा महाराष्ट्र हा वारसा हरवलेला महाराष्ट्र
श्रीराम मंदिराची उभारणी व घटनेतील 370 कलम रद्द करणे अशा एके काळी अशक्यप्राय वाटणार्या गोष्टी या सरकारने साध्य करून दाखविल्या, जिहादी दहशतवादावर नियंत्रण मिळविले, डाव्या व समाजवादी विचारप्रणालीमुळे दडपल्या गेलेल्या हिंदू इतिहास, परंपरा आणि गौरवस्थाने यांना महत्त्व प्राप्त करून दिले. तसेच गेल्या दहा वर्षांत कोणत्याही अन्य पक्षांनी केली नसतील एवढी विकासकामे या भाजप सरकारच्या काळात झाली. व्यावसायिक सर्वेक्षणापासून बूथ नियोजनापर्यंत सर्वत्र व्यावसायिकता आणली. या सर्व गोष्टी असतानाही व विरोधात पर्याय देण्यासाठी
आजच्या युगात कॉम्प्युटर सिस्टम्सशिवाय उद्योग चालवायची कल्पनाही अशक्य आहे. गेल्या दोन वर्षांत प्रचंड चर्चेत असलेलं एआय तंत्रज्ञान ही ह्याच बिझनेस सिस्टम्स वापराची पुढची पायरी आहे. दुर्दैवाने सगळ्या चर्चेचा रोख हा आता हे तंत्रज्ञान सगळ्या नोकर्या खाणार आणि प्रलय येणार असाच आहे. आज एआयचा उदोउदो बरोबर औद्योगिक उत्पादकता वाढवण्यासाठी ऑटोमेशनने आधीच आणि जास्त जोरात मुसंडी मारली आहे. खरं तर एआय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या सर्वांच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो. भीतीपोटी विरोध करण्यात किंवा ‘मला काय त्याच
माणसं निघून जातात आयुष्यातून. त्यांची आत्मचरित्रं अमर होतात. पुनःपुन्हा लोक वाचत राहतात. हरवलेलं शोधतात. कधी सापडतं, कधी नाही. प्रकाशाचे कवडसे दिलासादायक असतात. जिथून गोफ विणायला सुरुवात करतात तिथेच तो सुटावा म्हणून एक गाठ असते. ती सोडवता आली की गुंतागुंत होत नाही. आठवणींचा गोफ नक्षीदार असतो, त्यात रमावं.
Vivek saptahik - साप्ताहिक विवेक
लोकमान्यांनी बसवलेल्या गणपतीची नावे कशी बदलत गेली ?
‘हा’ गणपती आहे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
…आणि लोकमान्य भावूक झाले
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये