जग एका नव्या संकटाच्या उंबरठ्यावर उभे आहे. इस्रायल इराण संघर्ष शिगेला पोचला आहे. याचे पर्यवसान युद्धात झाले तर त्याचे परिणाम जगभर जाणवतील. पुरवठा साखळ्या बाधित होण्यापासून प्रादेशिक समतोल बिघडण्यापर्यंत अनेक उलथापालथी घडू शकतील. रशिया-युक्रेन युद्धाचे सावट कायम असताना इस्रायल-इराण हा धुमसणारा संघर्ष म्हणजे नव्या युद्धाची नांदी तर नाही ना ही भीती म्हणूनच अनाठायी नाही.
जम्मू-काश्मीर हा जनसंघापासूनच भाजपाचा भावनिक मुद्दा असला तरी केवळ भावनिक अंगाने या पक्षाने त्याकडे कधी पाहिले नाही. विकास, प्रगती हेच जम्मू-काश्मीरच्या समस्येवरील स्थायी तोडगे आहेत याची कल्पना भाजपाला कायम होती. 2014 साली केंद्रात मोदी यांच्या नेतृत्वात भाजपाचे सरकार आल्यानंतर त्या प्रयत्नांना वेग आला. राजकीय इच्छाशक्ती यांच्या बळावर जम्मू काश्मीरमध्ये विकासाचे नवनवीन प्रकल्प आकार घेत गेले. त्यामुळे जम्मू-काश्मीरला खर्या अर्थाने पुन्हा एकदा नंदनवन म्हणून प्रस्थापित करायचे तर तो मार्ग विकासाच्या मैदानातूनच
राजकीय इच्छाशक्तीचा योग्य वापर केला, तर किती जबरदस्त काम होऊ शकते याचं हे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. अनेक जिल्ह्यांचा भूगोल व अर्थकारण यामुळे बदलेलं आहे. स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातल्या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्णत्वाकडे जाणं हा देवेंद्र फडणवीस यांच्या विकासदृष्टीचा विजय आहे.
लाल दहशतवादाच्या विळख्यात अडकलेले आपले वनबंधू कधीही देशाच्या विरोधात नव्हते. जे दशकांपूर्वी सरकारच्या आधी त्यांच्यापर्यंत पोहोचले त्या नक्षलवाद्यांनी त्यांची दिशाभूल केली. सत्ता परिवर्तनानंतर राष्ट्रीय विचारांच्या सरकारने या आपल्या वनबंधूना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक विकासाची कामे केली. हळुहळू त्यांच्या मनात सरकारप्रती प्रगाढ विश्वासाची आणि सन्मानाची भावना निर्माण होत आहे.
जगाने दहशवादाविरोधात एकजूट दाखविणे अपरिहार्य. भारताच्या शिष्टमंडळांनी तोच मुद्दा अधोरेखित केला आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताच्या भूमिकेचे समर्थन केले. पाकिस्तान किंवा पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद याला कोणीही पाठबळ दिले नाही किंवा भारताला संयम, सहिष्णुता याबद्दलचे चार शब्द अकारण सुनावले नाहीत. ही या शिष्टमंडळाच्या शिष्टाईची फलश्रुती म्हटली पाहिजे!
एखादा जबाबदार राष्ट्रप्रमुख असता तर अन्य देशांच्या प्रश्नात अनावश्यक ढवळाढवळ करण्याऐवजी त्याने आपल्याविरोधात देशांतर्गत वाढत चाललेली बंडाळी मोडून काढण्याला प्राधान्य दिले असते. दहशतवादाचा जगाला पडलेला विळखा आणि त्याचे होणारे गंभीर परिणाम लक्षात घेऊन त्या विरोधात लढण्यासाठी भारताबरोबर सर्वसामर्थ्यानिशी उभा राहिला असता. पण स्वत:च्या मर्जीचे गुलाम असलेले ट्रम्प यापैकी काही गांभीर्याने घेत नाहीत.
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर 'विवेक' वाचक परिवारात सहभागी व्हा. यातून संघविचारांचा प्रसार व्हायला हातभार लागेल. यातून समविचारी लोकांचे वर्तुळ वाढेल. तुम्हीही त्या वर्तुळाचा एक बिंदू व्हावे यासाठी हा प्रेमाचा आग्रह.
आपमतलबी, स्वार्थी, अहंकारी वृत्ती सर्वत्र दिसते, हे स्वामीचे निरीक्षण महत्त्वाचे आहे. तेव्हा अशा देहबुद्धीधारी अहंकारी, स्वार्थी माणसांना जिवलग कसे म्हणता येईल? ही तर स्वार्थामुळे एकत्र आलेली माणसे आहेत. अत्यंत बिकट प्रतिकूल काळ आला तर कुणी कुणाला विचारत नाही. ते वाईट परिस्थितीत सापडलेल्या जिवलगालाही सोडून देतात, अगदी घट्ट नाती (माळी) असली तरी विषमकाळात सर्व सोडून देतात. तथापि रघुवीर तुम्हाला अंतकाळी एकटा सोडून देत नाही. तुम्ही शरणागत भावनेने रामाची माफी मागत असाल तर मृत्यूसमयी राम तुम्हाला सर्व यातनांतून स
गंगा दशहराच्या दिवशी आयोजित या समारंभात राम जन्मभूमी संकुलात तीन दिवसांच्या विधीचा समारोप झाला. वैदिक मंत्र, शंख आणि आचार्यांच्या सुमधुर स्वरात उच्चारलेल्या मंगल मंत्रांनी संपूर्ण शहरात एक अतीव पवित्र वातावरण निर्माण झाले होते. अगदी खरोखरच इतक्या वर्षांनंतर जणू प्रभू रामचंद्रांचा पुनश्च राजाभिषेक झाला, असे वातावरण अयोध्यानगरीत होते. त्यामुळे आता राम दरबारात येणार्या भाविकांना प्रभू श्रीराम यांच्यासह माता सीता, हनुमान, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्नन यांचे दर्शन घेता येईल.
कोविड आता आपल्यासोबत राहाणारा विषाणू आहे आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळणार तेव्हा तेव्हा तो डोकं वर काढणार. ज्यावेळी कोविड वाढतोय अशा बातम्या दिसतील तेव्हा घाबरून न जाता सावध होणे गरजेचे आहे. या आजाराच्या कटू आठवणी मागे टाकून मनातल्या भीतीवर मात केली पाहिजे. कोविडला आता घाबरण्याची गरज नाही, कारण आता हा नूतन विषाणू नाही.
लातूर येथील विवेकानंद रुग्णालय सर्वपरिचित आहे. स्थानिक वैद्यकीय गरजा ओळखून त्यांची पूर्तता करण्यासाठी रुग्णालय सदैव तत्पर असते. बारा-तेरा वर्षांपूर्वी रुग्णालयाला कर्करोग चिकित्सा व उपचार हा नवा आयाम जोडला गेला आणि त्या कामातून आणखी एका आयामाचा जन्म झाला. तो आयाम म्हणजे रुग्णसेवा सदन. ग्रामीण भागातील कर्करोगाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांना उपयुक्त ठरलेला हा आयाम आहे.
HMPV या आजाराची भिती ओसरत असतानाच GBS म्हणजे गिलान बार या आजाराचा उद्रेक झाला आहे. याविषयी सर्वात महत्त्वाची म्हणजे, वैद्यकीय क्षेत्राला गेली अनेक दशके या आजाराविषयी माहिती आहे. मात्र हा आजार संसर्गजन्य नसल्याने तसेच हा दुर्मिळ आजार असल्याने या आजाराचा उद्रेक होणे ही घटना नवी आहे. यानिमित्त अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, मात्र एकजुटीने आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याचा प्रतिकार करायला हवा.
HMPV व्हायरसची बातमी चीनच्या कोणा एका व्यक्तीने ट्वीट केली, ही एवढी एकच बाब सर्व मीडियाच्या ओव्हर रिअॅक्शनला कारणीभूत ठरली. HMPV च्या बातम्या सर्वच मीडियाने उलटसुलट रंगवल्या. या बातम्यांमुळे भीतीचे सावट निर्माण झाले. खरं तर HMPV या विषाणूमुळे कोणताही धोका नाही. गरज आहे ती काळजी घेण्याची.
खरीप हंगाम हा महाराष्ट्रात जून ते ऑक्टोबर या कालावधीत येणारा मुख्य शेती हंगाम आहे. यामध्ये संपूर्ण राज्यात पावसावर आधारित पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु हवामानातील अनिश्चितता, पाऊस कमी-अधिक होणे यामुळे पिकांची हानी होते. या पार्श्वभूमीवर मिश्र पीक पद्धत (चळुशव उीेिळिपस) ही एक शाश्वत, सुरक्षित व नफा देणारी शेती पद्धत ठरू शकते.
महाराष्ट्रात खरीप हंगामात जी पीके घेतली जातात, त्या प्रत्येक पिकावर मान्सूनचे जे वर्तन असेल त्यानुसार सकारात्मक वा नकारात्मक परिणाम होत असतो. या संदर्भात कानोसा घेणारा हा लेख.
यंदा महाराष्ट्रात मान्सून खूपच लवकर आला. मान्सूनपूर्व आणि मान्सून पाऊस पाठोपाठ आल्याने शेतकर्यांची चिंता वाढली असली तरी शासन सर्व पातळ्यांवर तयार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील पाऊस, त्याची स्थिती, शेतकर्यांना आवश्यक असलेली खते, बियाण्यांचा पुरवठा, त्यात होणारी शेतकर्यांची फसवणूक यावर लक्ष ठेवून आहेत. खतांचे लिकींग कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही आणि असे करणार्यांवर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेशच त्यांनी दिले आहेत. कृषी विभागाकडून येणार्या सूचना आणि सल्ल्यांकडे शेतकर्यांनी लक्ष द
महायुती सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानाने जलसंधारणाच्या पुढे जाऊन, जलव्यवस्थापन आणि मृद संधारणाच्या रूपाने व्यापक अशा चळवळीचे रूप घेतले आहे. अवघ्या काही वर्षांत राज्याच्या जलव्यवस्थापनाची क्रांती झाली असे म्हटले तर वावगे ठरू नये असे या अभियानाचे यश आहे. शिवाय हे जलयुक्त शिवार अभियान लोकसहभागामुळे एक लोकचळवळ म्हणून उदयास आले आहे.
ऑस्ट्रेलियातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाने मिळवलेलं हे यश आहे. या दोन अपयश आणि यशांमध्ये तुलना नाही होऊ शकणार. ऑस्ट्रेलियातील कामगिरीनंतर झालेली चर्चा एकदम थांबणार आहे. रोहित आणि विराट आणखी किती काळ भारतीय संघात खेळणार? विराट जून महिन्यांत इंग्लंड दौर्यावर जाणार हे जवळ जवळ नक्की आहे. पण, रोहितला ती संधी मिळणार का? ही चॅम्पियन्स करंडकानंतर तो निवृत्तीचा निर्णय जाहीर करणार? रोहितनंतर संघाचं एकदिवसीय आणि कसोटीतील नेतृत्व नेमकं कुणाकडे जाणार? मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांच्या कामगिरीचं मूल्यमाप
यंदाची 24 वी राष्ट्रीय वनवासी खेलकूद प्रतियोगिता छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत संपन्न झाली. या स्पर्धा म्हणजे प्रचंड ऊर्जेने भारलेला क्रीडा महोत्सव असतो. तिरंदाजी आणि फुटबॉल या दोन प्रकारांमध्ये यंदाची स्पर्धा झाली. यानिमित्त वनवासी क्षेत्रातील युवकांची खेळामधील प्रतिभा शोधतानाच त्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणे आणि खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता दृढ करणे हे वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख उद्दिष्ट साकार होत आहे.
12 डिसेंबर 2024. भारताच्या बुद्धिबळ इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करावी असा दिवस. 11 वर्षांनी भारताला पुन्हा एकदा बुद्धिबळाचा जगज्जेता मिळाला. अठरा वर्षांच्या गुकेशने हा पराक्रम केला. जगज्जेतेपदापर्यंतचा गुकेशच्या प्रवासाचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.
हंगेरीतील बुडापेस्ट येथे नुकत्याच पार पडलेल्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. दोन सांघिक आणि चार वैयक्तिक सुवर्णपदकांची कमाई भारताने या स्पर्धेत केली. या लेखात आपण जाणून घेणार आहोत या स्पर्धेबद्दल तसेच भारताच्या बुद्धिबळातील यशस्वी वाटचालीबद्दल.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुस्थानच्या इतिहासातील सुवर्णयुग आहे पण दुर्दैवाने आपल्या देशातल्या गाजरपारखी काँग्रेसवासी आणि डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना त्याची जाणीव नाही. हिरे आणि गारा एकाच ठिकाणी असतील तर हिरा टाकून गारा गोळा करणार्या विद्वानांना समजावणे अशक्य आहे. अशा परिस्थितीतही अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांनी हिंदुत्वाची गीता सातत्याने हिंदू समाजाला सांगण्याचा आपला वसा टाकला नाही. म्हणूनच, वीर सावरकरांच्या विरक्त, विरागी आणि उत्कट देशभक्तीने नटलेल्या जीवनाविषयी नितांत आदरभाव बाळगणारे ज्येष्ठ पत्रकार आण
दाजी पणशीकर यांच्या उत्कट विचाराबरोबरच त्यांची चिकित्सक अभ्यास वृत्ती, तसेच ते लोकांपर्यंत पोहोचवायची वृत्ती, त्यांना सर्वसामान्य विचार करणार्या लोकांपर्यंत घेऊन गेली. चांगली माणसे जोडून देणे आणि मग स्वतः त्यातून बाजूला होणे हे दाजींचे स्वभाववैशिष्ट्य.
रा. स्व. संघाचे स्वयंंसेवक, शास्त्रज्ञ सुधाकरराव असोलकर यांचे 26 मे 2025 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन संपूर्ण परिवाराचा त्यांनी नावलौकीक केला. त्यांचा जीवनपट उलगडून दाखवणारा लेख..
थोर खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे 20 मे 2025 रोजी पुणे येथे निधन झाले. आर्यभट व वराह मिहीर यांच्यानंतर बव्हंशी खंडित झालेल्या भारतीय खगोल संशोधनाचे पुनरूज्जीवन मागच्या शतकामध्ये मेघना दसाहा, वैनूबापू, नोबेल पारितोषिक विजेते सुब्रमण्यन चंद्रशेखर आणि जयंत नारळीकर यांनी केले असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. अशा ऋषितुल्य नारळीकरांना श्रद्धांजली अर्पण करणारा लेख...
आपण आत्मचरित्रे, चरित्रे वाचलेली असतात. हे दोन्ही साहित्यप्रकार सर्वश्रुत आहेत. मात्र ”विचार-चरित्र” हा एक आगळावेगळा चरित्रप्रकार एका पुस्तकाच्या निमित्ताने समोर आला, ते पुस्तक म्हणजे रवींद्र गोळे लिखित ’गिरीश प्रभुणे-जसे कळले तसे’ हे होय!
भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये विशिष्ट विषयाचे ज्ञान पूर्वीपासून अस्तित्वात होते असे एखाद्या भारतीय अभ्यासकाने सांगितले तर त्यावर विश्वास बसत नाही, परंतु तीच गोष्ट एखाद्या पाश्चिमात्य विद्वानाकडून ऐकली की मग मात्र ती पटते, अशी अनेक भारतीयांची मानसिकता असते. आयआयटी कानपूर येथून डॉक्टरेट मिळवलेल्या भास्कर कांबळे यांच्या बाबतीतही असेच झाले.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संस्था हा संघकामाचाच एक भाग आहे, याचे भान नानांनी कधी सोडले नाही. म्हणून मीपणाचा लोभ, सामूहिक निर्णय प्रक्रिया, राष्ट्रभक्तीचा भाव असे सगळे विषय त्यांनी प्रत्येक संस्थेत रुजविले. नानांनी जो उपक्रम हाती घेतला, तो सक्षम कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला आणि दुसर्या उपक्रमात रममाण झाले.
विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक… साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…
पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
प्रयागराज कुंभमेळ्यात सर्व काही अद्भुत आहे. डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. त्यातून विराट हिंदू राष्ट्राचे दर्शन घडत आहे. मराठीत एक म्हण आहे, ‘मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही’, त्याचप्रमाणे महाकुंभात गेल्याशिवाय आणि डुबकी मारल्याशिवाय आनंद कळणार नाही! त्यामुळे मनात किंतुपरंतु न ठेवता महाकुंभात अवश्य जा! त्रिवेणी संगमात डुबकी मारा. प्रत्यक्ष कुंभमेळ्याचा अनुभव कथन करणारा लेख...
हिंदू समाज सेवा हाच धर्म मानणारा आणि प्रसिद्धीपराङ्मुख होऊन कृती करणारा आहे. भारताच्या समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन आणि त्या माध्यमातून अखंड सेवाकार्य करणार्या संस्कृतीचे दर्शन नुकत्याच पार पडलेल्या ’हिंदू आध्यात्मिक सेवा फाऊंडेशन’ मेळाव्यात झाले. राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर मैदान, गोरेगाव येथे सलग चार दिवस दि. 9 ते 12 जानेवारीपर्यंत हा मेळावा संपन्न झाला.
मनुष्यप्राण्यांचे समूहीकरण म्हणजे समाज होय. समाजाची स्वतःची अशी मूल्ये आणि विचार असतात. समाजाच्या या मौलिक गोष्टींचे जर विस्मरण झाले, तर समाजाची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही आणि समाजाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः आपलीदेखील अधोगतीकडे वाटचाल सुरू होते. व्यक्तीला जसे मन असते तसे समाजालादेखील मन असते. त्याला समाजाची सदसद्विवेकबुद्धी असे म्हणतात. ही सदसद्विवेकबुद्धी समाज जेव्हा हरवून बसतो तेव्हा त्याची अवस्था अत्यंत वाईट होते. ही अवस्था म्हणजे आजचा हरवलेला महाराष्ट्र आहे. आजचा महाराष्ट्र हा वारसा हरवलेला महाराष्ट्र
श्रीराम मंदिराची उभारणी व घटनेतील 370 कलम रद्द करणे अशा एके काळी अशक्यप्राय वाटणार्या गोष्टी या सरकारने साध्य करून दाखविल्या, जिहादी दहशतवादावर नियंत्रण मिळविले, डाव्या व समाजवादी विचारप्रणालीमुळे दडपल्या गेलेल्या हिंदू इतिहास, परंपरा आणि गौरवस्थाने यांना महत्त्व प्राप्त करून दिले. तसेच गेल्या दहा वर्षांत कोणत्याही अन्य पक्षांनी केली नसतील एवढी विकासकामे या भाजप सरकारच्या काळात झाली. व्यावसायिक सर्वेक्षणापासून बूथ नियोजनापर्यंत सर्वत्र व्यावसायिकता आणली. या सर्व गोष्टी असतानाही व विरोधात पर्याय देण्यासाठी
आजच्या युगात कॉम्प्युटर सिस्टम्सशिवाय उद्योग चालवायची कल्पनाही अशक्य आहे. गेल्या दोन वर्षांत प्रचंड चर्चेत असलेलं एआय तंत्रज्ञान ही ह्याच बिझनेस सिस्टम्स वापराची पुढची पायरी आहे. दुर्दैवाने सगळ्या चर्चेचा रोख हा आता हे तंत्रज्ञान सगळ्या नोकर्या खाणार आणि प्रलय येणार असाच आहे. आज एआयचा उदोउदो बरोबर औद्योगिक उत्पादकता वाढवण्यासाठी ऑटोमेशनने आधीच आणि जास्त जोरात मुसंडी मारली आहे. खरं तर एआय प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या सर्वांच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकतो. भीतीपोटी विरोध करण्यात किंवा ‘मला काय त्याच
माणसं निघून जातात आयुष्यातून. त्यांची आत्मचरित्रं अमर होतात. पुनःपुन्हा लोक वाचत राहतात. हरवलेलं शोधतात. कधी सापडतं, कधी नाही. प्रकाशाचे कवडसे दिलासादायक असतात. जिथून गोफ विणायला सुरुवात करतात तिथेच तो सुटावा म्हणून एक गाठ असते. ती सोडवता आली की गुंतागुंत होत नाही. आठवणींचा गोफ नक्षीदार असतो, त्यात रमावं.
Vivek saptahik - साप्ताहिक विवेक
लोकमान्यांनी बसवलेल्या गणपतीची नावे कशी बदलत गेली ?
‘हा’ गणपती आहे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
…आणि लोकमान्य भावूक झाले
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये