छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकताच वंचित बहुजन आघाडीने संघाच्या विरोधात एक मोर्चा काढून संघावर बंदी घालण्याची मागणी करत जुनेच आरोप पुन्हा नव्याने गिरविण्याचा प्रयत्न केला. कथ्य सर्वदूर पोहचाताना तथ्य जाणणेही महत्त्वाचे. डॉ. आंबेडकरांना अपेक्षित सामाजिक समतेचे, बंधुतेचे विचार व्यवहारात आणण्यासाठी रा.स्व.संघाने अनेक कार्यक्रम-उपक्रम हाती घेतले, व्यापक प्रबोधन करण्याचे कार्य केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे संबंध नेमके कसे होते? याबाबत जे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत ते या लेखात
दिवाळी 2025 मध्ये भारतीय बाजारपेठेने अभूतपूर्व इतिहास रचला. देशभरात सणकाळातील किरकोळ विक्री तब्बल 6 ट्रिलियन रुपयांपर्यंत पोहोचली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वोकल फॉर लोकल’च्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि ग्राहकांनी विदेशी उत्पादनांकडे पाठ फिरवत भारतीय वस्तूंना प्राधान्य दिले. अर्थव्यवस्थेतील हा ‘उत्सवमय आत्मविश्वास’ आत्मनिर्भरतेकडे झेप घेणार्या नवभारताचे प्रतीक ठरला आहे.
बगराम विमानतळावर भारतीय विमाने उतरू शकतात. तसे झाल्यास तो पाकिस्तानसाठी खूप मोठा धक्का असेल. याला ‘ऑपरेशन सिंदूर- भाग दुसरा’ म्हणता येईल. ज्या पाकिस्तानने पहलगाममध्ये 26 निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी घेतला आणि आजवर हजारो दहशतवादी हल्ले करुन भारताला रक्तबंबाळ केले, त्या पाकिस्तानविरोधात ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ या युद्धशास्रातील सुप्रसिद्ध सिद्धांताच्या आधारे भारत एक मोठा गेम प्लॅन आखण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पूर्वेकडील संघर्षाचा सामना करताना जराजर्जर झालेल्या पाकिस्तानला आता पश्चिमेकडील सीमेव
कोल्डरिफ सिरप ही दुर्घटना म्हणजे भारताच्या आरोग्य व्यवस्थेला एक धोक्याचा संकेत आहे. औषधनिर्मितीतल्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रण आणि नियामक यंत्रणांची दक्षता काटेकोरपणे पाळली जाण्याची गरज आहे. लहान मुलांना औषधे देताना पालकांनीही सजग राहण्याची आवश्यकता आहे. केवळ औषध देणे, म्हणजे आजाराचा उपचार नसतो. कोणतेही औषध, जेव्हा आवश्यक असते, तेव्हाच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात, योग्य वेळेस आणि योग्य मार्गाने दिले गेले, तरच तो उपचार असतो. अन्यथा ते घातक ठरू शकते.
महाराष्ट्रात 30 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे 17 लाख 85 हजार 714 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. हेक्टरी 50 हजार रुपये मदत आणि कर्जमाफीची तसेच, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी आणि विरोधी पक्ष करत आहेत. या मागण्या मान्य करायच्या झाल्यास राज्याच्या तिजोरीवर येणारा भार कल्पनेपलीकडचा आहे. शेतकर्याच्यासाठी सर्वस्व अशी जरी राजकीय भूमिका असली तरी त्याची व्यवहार्यता राजकीय भूमिकेच्या पलीकडे तपासायला हवी. पूर, दुष्काळ अशा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी स्थायी निधीची तरतूद गरजेची झाली आहे.
बिहारमध्ये जातीवर आधारित समीकरणे, ग्रामीण मतदार, स्थानिक नेतृत्वाचा प्रभाव असे अनेक निर्णायक घटक आहेत. मतदान नोव्हेंबर 2025 मध्ये दोन टप्प्यांत होणार आहे. निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल, तेव्हा हे कुतूहल शमलेले असेल. तूर्तास ठगबंधनाला जरी सत्तासंपादनाचे वेध लागलेले असले तरी हे तेजस्वी ग्रहण राज्याला लावून घ्यावे का? याचा विचार बिहारी जनतेनेच करायचा आहे.
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर 'विवेक' वाचक परिवारात सहभागी व्हा. यातून संघविचारांचा प्रसार व्हायला हातभार लागेल. यातून समविचारी लोकांचे वर्तुळ वाढेल. तुम्हीही त्या वर्तुळाचा एक बिंदू व्हावे यासाठी हा प्रेमाचा आग्रह.
कुटुंबातील प्रत्येकाची आपली भूमिका आहे. त्या भूमिकेतूनच व्यक्तीची जडणघडण होते. आई म्हणजे कुटुंबातील कोमलता, प्रेम आणि पहिली गुरू. तर वडील म्हणजे शिस्त, जबाबदारी आणि संरक्षण. आजोबा-आजी म्हणजे गोष्टी, परंपरा आणि अनुभव. आणि भावंडं म्हणजे सामायिकीकरण, सहकार्य आणि स्पर्धा. प्रत्येक नातं व्यक्तीच्या वेगळ्या पैलूला आकार देतं.
विवेक विसरल्याने आम्हाला तुझ्या विरहाच्या वेदना सहन कराव्या लागत आहेत. आम्ही तुझ्यापासून दूर गेलो. पण तरीही हे रामा, तूच आता आम्हाला दुर्जनांपासून सोडवून जवळ घे. हे सर्वगुणांनी श्रेष्ठ असलेल्या रामा, तू मला केव्हा भेट देशील? केव्हा तुझे दर्शन होईल? असे साधक कळकळीने विचारत आहे, सर्वोत्तमा कैं मज भेटि देसी.’
संघाची प्रारंभापासूनच हीच भूमिका राहिली आहे की भारतात राहणार्या सर्व लोकांचे धर्म किंवा उपासना पद्धती भिन्न असल्या तरी पूर्वज, संस्कृती आणि मातृभूमी सर्वांची एकच आहे. त्यामुळे सर्वांची ओळख ही भारतीय किंवा हिंदुस्तानी म्हणून आहे. संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यापासून डॉ. मोहन भागवत यांच्यापर्यंत सर्व सरसंघचालकांनी हीच भूमिका वारंवार मांडली आहे. मुस्लीम राष्ट्रीय मंचाने 2002 मध्ये स्थापनेपासूनच याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. सातत्याने हे मांडले जात असल्याने अलीकडे मुस्लीम समाजातही हा विचार रू
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. ही शैक्षणिक बाजू अगदी सक्षमपणे सांभाळताना बदलत्या काळात आणि सामाजिक परिस्थितीत भारतीय मूल्ये आणि विचारधारा यांची आजच्या शिक्षणाशी सांगड घालण्याची नितांत गरजही प्रकर्षाने जाणवते. याच गरजेतून भारतीय ज्ञानपरंपरेच्या सहाय्याने समाजाला आकार देण्याच्या हेतूने संस्थेने 129 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत ‘आकार’ या नवीन शाखेची स्थापना केली. त्यानिमित्त हा लेखन प्रपंच.
भारतीय अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात आता भरारी घेत आहे आणि भारताच्या अनेक अवकाश मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. तसेच इस्रोकडून भविष्यातील चांद्रयान 5 आणि गगनयान मोहिमांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे यापुढे अनेक साहसी मोहिमा इस्रोकडून यशस्वी पूर्ण होतीलच. नक्की या मोहिमा कशा असतील, त्याचबरोबर यापूर्वी ंयशस्वी झालेल्या मोहिमांबद्दल माहिती देणारा लेख...
पुणे : हिंदू धर्मात ’गोदान’ करण्याचे फार मोठे महत्त्व सांगितले आहे. सवत्स धेनूचे दान अधिक पुण्यकारक समजले जाते. हिंदुस्थान प्राचीन काळापासून कृषीप्रधान देश असल्याने शेती आणि शेतकरी यांच्याशी निगडित उपक्रम आपल्या संस्कृतीची सुंदर सामाजिक वीण अधोरेखित करतो. काळाच्या ओघात या संस्काराकडे दुर्लक्ष झालेले दिसते. तथापि सध्याच्या स्थितीतही दुर्मीळ झालेला ’गोदान’ संस्कार कधीकधी घडतो. हा गोदानाचा संस्कार पुण्याजवळ, हिंगणघाट (उरळीकांचन) ता. हवेली येथे नुकताच पार पडला.
पुण्यमयी गोदावरी माईच्या पवित्र तीरावर जेव्हा सायंकाळच्या पावन आरतीच्या मंगलघंटा निनादू लागतात, तेव्हा निसर्गही थांबून त्या क्षणाचा साक्षीदार होतो. मात्र यंदाच्या आरतीत एक वेगळंच तेज, वेगळीच अनुभूती होती; जेव्हा शीख समुदायाच्या भाविकांच्या भावपूर्ण घोषणा त्या मंत्रगजरात मिसळल्या...
नामकरण हा विधी नवीन बाळाला त्याची ओळख देतो. तसेच बाळाला दिलेले नाव त्याला आपल्या भूमीशी, आकाशाशी, संस्कृतीशी, भाषेशी, देवाशी, धर्माशी आणि भारतीय विज्ञानाशी जोडते. आपल्या नावाविषयी आपल्याला आणि जवळच्यांना आस्था उत्पन्न होते. म्हणून नाव ‘आपले’ असावे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव आणि शिमगोत्सव हे दोन महत्त्वाचे उत्सव. पण त्याबरोबर दशावतार ही लोककला म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्राण आणि अविभाज्य भाग आहे. त्यातूनही गणेशोत्सव आणि दशावतार यांचे थेट नाते आहे. याच दशावताराच्या पंरपरेविषयी आपण जाणून घेणार आहोत.
कोविड आता आपल्यासोबत राहाणारा विषाणू आहे आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळणार तेव्हा तेव्हा तो डोकं वर काढणार. ज्यावेळी कोविड वाढतोय अशा बातम्या दिसतील तेव्हा घाबरून न जाता सावध होणे गरजेचे आहे. या आजाराच्या कटू आठवणी मागे टाकून मनातल्या भीतीवर मात केली पाहिजे. कोविडला आता घाबरण्याची गरज नाही, कारण आता हा नूतन विषाणू नाही.
लातूर येथील विवेकानंद रुग्णालय सर्वपरिचित आहे. स्थानिक वैद्यकीय गरजा ओळखून त्यांची पूर्तता करण्यासाठी रुग्णालय सदैव तत्पर असते. बारा-तेरा वर्षांपूर्वी रुग्णालयाला कर्करोग चिकित्सा व उपचार हा नवा आयाम जोडला गेला आणि त्या कामातून आणखी एका आयामाचा जन्म झाला. तो आयाम म्हणजे रुग्णसेवा सदन. ग्रामीण भागातील कर्करोगाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांना उपयुक्त ठरलेला हा आयाम आहे.
HMPV या आजाराची भिती ओसरत असतानाच GBS म्हणजे गिलान बार या आजाराचा उद्रेक झाला आहे. याविषयी सर्वात महत्त्वाची म्हणजे, वैद्यकीय क्षेत्राला गेली अनेक दशके या आजाराविषयी माहिती आहे. मात्र हा आजार संसर्गजन्य नसल्याने तसेच हा दुर्मिळ आजार असल्याने या आजाराचा उद्रेक होणे ही घटना नवी आहे. यानिमित्त अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, मात्र एकजुटीने आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याचा प्रतिकार करायला हवा.
HMPV व्हायरसची बातमी चीनच्या कोणा एका व्यक्तीने ट्वीट केली, ही एवढी एकच बाब सर्व मीडियाच्या ओव्हर रिअॅक्शनला कारणीभूत ठरली. HMPV च्या बातम्या सर्वच मीडियाने उलटसुलट रंगवल्या. या बातम्यांमुळे भीतीचे सावट निर्माण झाले. खरं तर HMPV या विषाणूमुळे कोणताही धोका नाही. गरज आहे ती काळजी घेण्याची.
नांदेड जिल्ह्यातील सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाचे संस्थापक, कर्मयोगी के.ना. तथा बाबासाहेब देशमुख यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. देशमुख यांनी संस्कृती संवर्धन मंडळाच्या माध्यमातून कृषी, ग्रामविकास, शिक्षण, कौशल्य विकास या क्षेत्रांत बहुमोल योगदान दिले. कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांच्या विचार व कार्याला उजाळा देणारा लेख.
पुणे जिल्ह्यातील कचरवाडी (ता. इंदापूर) येथील बरळ कुटुंबियांनी पारंपरिक शेतीला फाटा देत डाळिंब, जांभूळ, सीताफळ, पेरू व पॅशन फ्रुट आदी फळपीकांचे यशस्वी उत्पादन घेऊन आर्थिक उन्नती साधली आहे. गेल्या तीन दशकांत त्यांनी आपल्या वडिलोपार्जित 18 गुंठे शेतीपासून सुरू केलेला प्रवास आज 18 एकर शेतीपर्यंत पोहोचला आहे.
शेवग्याचे झाड बहुगुणी, बहुपयोगी आहे. शेवग्याचे मूळ, फूल, पाने व साल यांचा वापर आयुर्वेदिक औषध निर्मितीत केला जातो. म्हणून हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेवगा पीक ओळखले जाते. बहुपयोगी असलेल्या शेवग्याच्या झाडाची ओळख करून देणारा हा लेख.
पीकांवर कीटकनाशक फवारणी करण्यापूर्वी किडींची ओळख करून घेणे गरजेचे असते. कारण पिकावर आढळणार्या काही किडी अपायकारक असतात तर काही किडी शेतीसाठी वरदान असतात. अशाच काही कीटकांची ओळख आपण करून घेणार आहोत जे शेतामध्ये सैनिक म्हणून आपली भूमिका पार पाडत आहेत. त्यांना आपण शेतीतले खरे साथीदार असेही म्हणू शकतो.
भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याने त्यांना बर्याच वर्षांच्या संघर्षानंतर स्वत:ची ओळख मिळालीय. खरं तर त्यांची मागच्या दहा वर्षांतील कामगिरी बघितली तर विश्वचषकातील विजय हा कधी ना कधी त्यांच्या पदरात पडलाच असता. पण तो प्रत्यक्ष पडला की, भोवतालची परिस्थिती कशी बदलते याचा अनुभव आता महिला क्रिकेटपटूंना येईल. विराट आणि रोहितसारखे त्यांना लक्षावधी चाहते नसतील. पण, नवीन चाहता वर्ग आणखी वाढेल एवढं नक्की.
जॉर्जियातील बटुमी येथे 5 ते 29 जुलै या दरम्यान फिडे महिला विश्वचषक खेळला गेला. गेल्या 3-4 वर्षांत बुद्धिबळ खेळात भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, मात्र त्यात प्रामुख्याने गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुन अशा पुरुष खेळाडूंची नावे सातत्याने ऐकायला मिळत होती. पण ह्यावेळी महिलांनीही तोडीस तोड कामगिरी करून दाखवली आणि एकीकडे तेंडुलकर - अँडरसन कसोटी क्रिकेट मालिका उत्कंठावर्धक स्थितीत असतानाही समाजमाध्यमांना आपली नोंद घ्यायला भाग पाडलं. महिलांचा हा विश्वचषक भारतीय खेळाडूंनीच गाजवला आणि थेट जेतेपदाला गवसणी घात
ऑस्ट्रेलियातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाने मिळवलेलं हे यश आहे. या दोन अपयश आणि यशांमध्ये तुलना नाही होऊ शकणार. ऑस्ट्रेलियातील कामगिरीनंतर झालेली चर्चा एकदम थांबणार आहे. रोहित आणि विराट आणखी किती काळ भारतीय संघात खेळणार? विराट जून महिन्यांत इंग्लंड दौर्यावर जाणार हे जवळ जवळ नक्की आहे. पण, रोहितला ती संधी मिळणार का? ही चॅम्पियन्स करंडकानंतर तो निवृत्तीचा निर्णय जाहीर करणार? रोहितनंतर संघाचं एकदिवसीय आणि कसोटीतील नेतृत्व नेमकं कुणाकडे जाणार? मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांच्या कामगिरीचं मूल्यमाप
यंदाची 24 वी राष्ट्रीय वनवासी खेलकूद प्रतियोगिता छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत संपन्न झाली. या स्पर्धा म्हणजे प्रचंड ऊर्जेने भारलेला क्रीडा महोत्सव असतो. तिरंदाजी आणि फुटबॉल या दोन प्रकारांमध्ये यंदाची स्पर्धा झाली. यानिमित्त वनवासी क्षेत्रातील युवकांची खेळामधील प्रतिभा शोधतानाच त्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणे आणि खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता दृढ करणे हे वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख उद्दिष्ट साकार होत आहे.
संघकार्याच्या इतिहासात काही व्यक्तिमत्वे अशी असतात, ज्यांनी आपल्या कृतीतून आपला प्रभाव निर्माण केला. त्यांचे आयुष्य म्हणजे निष्ठा, शिस्त, साधेपणा आणि समर्पण यांचे जिवंत उदाहरण असत. अशीच एक व्यक्ती होती, बाबाजी देसाई. त्यांचे 30 सप्टेंबर 2025 रोजी त्यांच्या राहत्या घरी खारघरला निधन झाले.
जाहिरातींच्या ’इंग्रजी’ जगामध्ये हिंदी जाहिरातींना मानाचे स्थान मिळवून देणारे विश्वविख्यात जाहिरात महर्षी पियुष पांडे यांचे 24 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या सत्तराव्या वर्षी निधन झाले आहे. दिवाळीत भेटवस्तू मिळालेले कॅडबरी चॉकलेटने घराचा एक कोपरा व्यापलेला असताना कोट्यवधी लोकांचं तोंड गोड करणारा हा अवलिया दिवाळी संपल्याच्या दुसर्या दिवशी काळाच्या पडद्याआड गेला. मात्र त्यांचं काम कालातीत आहे, त्यामुळे काळ कितीही पुढे गेला तरी ते विसरता येणार नाही. त्यांना श्रद्धांजली अर्पण करणारा लेख..
मधुभाईंनी बी. एड. म्हणजे शिक्षणशास्त्राचे औपचारिक शिक्षण जरी घेतले असले तरी त्यांचा भर अनौपचारिक शिक्षणावर असायचा. छोट्या छोट्या वाक्यातून हे काम ते सहजपणे करीत असत.
संघकामात अनेक संकेतांचे पालन करावे लागते. काही संकेत हे तर अलिखितच असतात. त्यांचे कार्यकर्त्याला भान असावे लागते. याची प्रचिती मधुभाईंच्या सहवासात आली. तसेच आपल्यावर जी जबाबदारी आहे ती पार पाडण्याविषयी किती जागरूक असले पाहिजे हे संस्कार नकळतपणे माझ्यावर त्यांच्यामुळे घडले.
आपण आत्मचरित्रे, चरित्रे वाचलेली असतात. हे दोन्ही साहित्यप्रकार सर्वश्रुत आहेत. मात्र ”विचार-चरित्र” हा एक आगळावेगळा चरित्रप्रकार एका पुस्तकाच्या निमित्ताने समोर आला, ते पुस्तक म्हणजे रवींद्र गोळे लिखित ’गिरीश प्रभुणे-जसे कळले तसे’ हे होय!
भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये विशिष्ट विषयाचे ज्ञान पूर्वीपासून अस्तित्वात होते असे एखाद्या भारतीय अभ्यासकाने सांगितले तर त्यावर विश्वास बसत नाही, परंतु तीच गोष्ट एखाद्या पाश्चिमात्य विद्वानाकडून ऐकली की मग मात्र ती पटते, अशी अनेक भारतीयांची मानसिकता असते. आयआयटी कानपूर येथून डॉक्टरेट मिळवलेल्या भास्कर कांबळे यांच्या बाबतीतही असेच झाले.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संस्था हा संघकामाचाच एक भाग आहे, याचे भान नानांनी कधी सोडले नाही. म्हणून मीपणाचा लोभ, सामूहिक निर्णय प्रक्रिया, राष्ट्रभक्तीचा भाव असे सगळे विषय त्यांनी प्रत्येक संस्थेत रुजविले. नानांनी जो उपक्रम हाती घेतला, तो सक्षम कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला आणि दुसर्या उपक्रमात रममाण झाले.
विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक… साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…
पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील तृतीय क्रमांक प्राप्त डॉ. अविनाश भोंडवे यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, 'सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील द्वितीय क्रमांक विजेती कथा..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील प्रथम क्रमांक विजेती कथा..
जग आधुनिक होत चाललं, तसं संवादाची माध्यमही बदलली. पूर्वी पोस्टकार्ड, आंतरदेशीय किंवा पाकिटातून येणारी, कागदावर शाईने आणि स्व-हस्ताक्षरात लिहिलेली पत्रांची जागा ईमेल, मेसेज, व्हॉटसअॅप सारख्या तात्काळ संदेश देणार्या आधुनिक माध्यमांनी घेतली आहे. पूर्वीच्या पत्रांना नात्यांच्या आस्थेचा वास असे, प्रेमाचा स्पर्श असे आणि मायेचा ओलावा असे. ईमेलला यातलं काही एक नाही. कोणीही, कोणालाही, कधीही, कशीही पाठवली तरी एकच छाप! यंत्राचा स्पर्श, मानवी स्पर्श गायब.
Vivek saptahik - साप्ताहिक विवेक
लोकमान्यांनी बसवलेल्या गणपतीची नावे कशी बदलत गेली ?
‘हा’ गणपती आहे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
…आणि लोकमान्य भावूक झाले
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये