'पारतंत्र्याच्या श्रृंखला तुडल्यावर येणारा स्वर हा सर्वात मधूर असतो,' असे सांगणारे, क्रंातीचा जयजयकार करणारे आणि सागरालादेखील त्याच्या पामरपणाची जाणीव करून देणाऱ्या कुसुमाग्रजांचे हे जन्मशताब्दी वर्ष. आजच्या संक्रमणाच्या काळात कुसुमाग्रजांच्या स्मृतींना उजाळा देण्याची, त्यांच्या साहित्याचा जागर करण्याची आवश्यकता आहे. तरुण पिढीला उर्जा देणारी त्यांची कविता, समाजाचे अचूक चित्रण करणारी त्यांची नाटके या सर्वांना पुन्हा आठवण्याची आणि नव्या पिढीला या श्रेष्ठ साहित्यिकाची ओळख करून देण्याची गरज आहे.