Enter your Email Address to subscribe to our newsletters
‘भारत ः विरासत आणि संस्कृती’ या व्याख्यानाचे नुकतेच पुणे संवाद, डेक्कन कॉलेज आणि भांडारकर संस्थेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद होते. त्यांनी आपल्या व्याख्यानात त्यांच्या दोन मोठ्या कार्यांची माहिती दिली - एक अयोध्येच्या रामजन्मभूमी मंदिराचे उत्खनन आणि दुसरे बटेश्वर येथील मंदिरांचा जीर्णोद्धार.
आपल्या देशाच्या जडणघडणीसाठी अनेक महापुरुषांनी समर्थ आणि विकसित भारताचे स्वप्न पाहिलेले आहे. त्यासाठी त्यांचा वैचारिक वारसा जतन करत देशाने प्रगतिपथावर वाटचाल केली, तर त्यांच्या स्वप्नातील भारत नक्कीच साकार होऊ शकतो. भारतरत्न प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करीत असताना त्यांच्या स्वप्नातील भारत साकारण्याची सुचिन्हे दिसत आहेत, हे निश्चित!
मजबूत लोकशाहीसाठी आवश्यक असणार्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे तिच्या महत्त्वाच्या तीन घटकांमध्ये असलेला परस्परसंबंध आणि स्वतंत्रता. ते तीन अंगभूत घटक म्हणजे संसद (कायदेमंडळ) अर्थात Legislature, कार्यकारी मंडळ (Executive) आणि न्यायपालिका (Judiciary), यातील कुठलाही एक घटक अशक्त झाला किंवा मुजोर झाला तर समतोल बिघडतो. हा समतोल राखण्याची तरतूद जरी भारतीय राज्यघटनेत असली तरी जबाबदारी मात्र या तीन संस्थांमध्ये काम करणार्या अर्थात कर्तव्याचे निर्वहन करणार्या व्यक्तींवरच सर्वस्वी अवलंबून असते. व्यक्ती जर आपल्या कर
हिंदुस्थानातून राष्ट्रशक्तीचे उच्चाटन करू इच्छिणारे गठबंधन म्हणजे इंडिया आघाडी. सनातन धर्माच्या परिभाषेत सांगायचे तर या सर्व आसुरी शक्ती आहेत. या आसुरी शक्ती हिंदू दहशतवादाचा बंद पडलेला दवाखाना पुन्हा उघडतील. तेव्हा लोकसभेच्या निवडणूक रिंगणात अशा आसुरी शक्तींशी आपल्याला लढायचे आहे आणि राष्ट्रीय विचारधारेला विजयी करायचे आहे.
निवडणुकीचे पडघम वाजायला लागले की विरोधक ईव्हीएमच्या नावाने शिमगा घालायला लागतात. नागरिकांमध्ये ईव्हीएमवर आणि पर्यायाने निवडणुकीच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेवर अविश्वास निर्माण करण्याचे काम विरोधक करीत राहतात. त्यासाठी नागरिकांनी भारतीय निवडणूक आयोग वेळोवेळी आपल्या वेबसाइटवर सादर करत असलेली माहिती वाचली पाहिजे, जेणेकरून निवडणूक प्रक्रियेवरचा तुमचा विश्वास दृढ होईल. मग लोक हेतुपुररसर किती का गोंधळ घालेनात, तुम्ही विश्वासाने मतदान करून लोकशाहीचा रथ पुढे न्या.
विरोधकांचा खोटारडेपणा उघड करणारी. ‘खोटे बोल, पण रेटून बोल’ हे त्यांच्यात किती खोलवर रुजले आहे हे यातून लक्षात यावे. दोन्ही वेळेस मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिल्यावरही विरोधकांच्या खोटारडेपणाचा कैफ काही केल्या जात नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर ‘मोदी हे हुकूमशहा आहेत,’ हा ढोल बडवणे जोरजोरात चालू केले आहे.
लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या गोड दिवसांनंतर सुरू होणार्या छोट्या छोट्या कुरबुरींपासून घटस्फोट घेण्याची वेळ येईपर्यंत निर्माण झालेल्या गंभीर कलहांच्या मुळाशी काही ठरावीक कारणं असतात. त्याचा शोध घेणे, त्यावर तोडगा काढणे हे करणं सोडून टोकाचा निर्णय घेण्याकडेच कल दिसतो. अशा 500 हून अधिक जोडप्यांचा वैवाहिक प्रवास कायमचा पालटून टाकणारा एक उत्कृष्ट उपक्रम म्हणजे ‘मॅजिक ऑफ मॅरेज’ हे चारदिवसीय निवासी शिबिर.
मार्च महिन्यात विविध कल्याणकारी योजना राबविण्याचे निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतले. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणार्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे उद्घाटनही करण्यात आले; परंतु मार्च महिन्यात ‘वर्ल्ड ओरल हेल्थ डे’ साजरा करण्यात आला. शेतकर्यांच्या कल्याणासाठी विविध योजना, विविध विकास प्रकल्प राबवणार्या देवेंद्र फडणवीस यांनी ओरल हेल्थ संदर्भातही अत्यंत महत्त्वाचे कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्र आज ओरल हेल्थ पॉलिसी असणारे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. यानिमित्ताने दे
आपण, आपले आई-वडील, आपलं कुटुंब आणि एकूणच आपलं अनुभवविश्व याबाहेरही बरंच मोठं जग आहे. जोडीदार म्हणून आपल्या आयुष्यात येणारी व्यक्ती ही याच विश्वातून येणार आहे. ती आपल्याच चौकटीत बसते आहे का हे बघणं म्हणजे झापडं लावून चालण्यासारखं आहे. विशेषतः अरेंज्ड मॅरेजच्या प्रक्रियेमध्ये, जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीला भेटतो, तेव्हा डोळ्यावर आपल्याच अपेक्षा/मागण्यांच्या चष्म्यातून न बघता समोरच्या व्यक्तीकडे एक स्वतंत्र माणूस म्हणून बघत जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
नुकताच मी तीनशे तरुण-तरुणींसोबत हिमालयामधील खेड्यांमध्ये सेवाकुंरच्या माध्यमातून एका सेवा प्रकल्पासाठी प्रवास केला त्या वेळी जाणवले की, भारत अजून जागा आहे. आपल्याला ज्या भारतीय मूल्यांचा अभिमान वाटतो, या काळातही टिकून आहेत. विशेष म्हणजे सेवांकुर हा सेवा उपक्रम गेली आठ वर्षे यशस्वीपणे चालू आहे. त्याचे हे अनुभवकथन मांडताना मला विलक्षण संतोष होत आहे.
लातूर येथील ख्यातकीर्त विवेकानंद रुग्णालयाच्या कर्करोग व सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या, व्यापक विस्ताराचा ‘लोकार्पण’ कार्यक्रम दि. 20 फेब्रुवारी रोजी पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या हस्ते झाला. या प्रसंगी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुखभाई मांडविया व टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. राजेंद्र बडवे (प्रो. एमिरिट्स) हेही उपस्थित होते. अत्यंत भव्य, हृद्य व नेटक्या सोहळ्याचा वृत्तान्त आमचे प्रतिनिधी विलास आराध्ये यांनी दिला आहे.
‘आम्ही केलेल्या त्यागाची किंमत पुढच्या पिढीला कळेल काय? आपल्या देशाकरिता ते काही करतील काय?’ हा क्रांतिकारक दामोदर चापेकरांनी मृत्युवेदीवर जाताना विचारलेला प्रश्न... या प्रश्नाने टिटवाळ्यातील विक्रांत बापट या तरुणाला प्रेरित केलं आणि आपणही देशाकरिता काहीतरी केलं पाहिजे या विचाराने तो झपाटला. आपल्यासारख्याच सेवाव्रती मित्रांना सोबत घेऊन, प्रदीर्घ संघर्ष करत मांडा गावात एक भव्य हॉस्पिटल उभं केलं. त्याच्या या धडपडीची आणि टिटवाळावासीयांना अविरत सेवा देणार्या श्री महागणपती हॉस्पिटलची ही कहाणी.
निसर्गसंवर्धनाची संकल्पना काळाच्या ओघात मागे पडत चालली आहे. याकरिता ‘देवराई’च्या माध्यमातून पितांबरीने निसर्गसंवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘पितांबरी अॅग्रीकेअर डिव्हिजन’ने रत्नागिरी जिल्ह्यातील तळवडे येथे अद्ययावत पद्धतीचा अवलंब करत सुमारे 25 एकरावर तुल्डा जातीच्या बांबूचे बेट व दापोली येथे मियावाकी (मानवनिर्मित उद्यान) विकसित करून ‘देवराई’ निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त (11 मार्च) घेतलेला हा वेध.
मलकापूर (जि. बुलढाणा) येथे लघु कृषक व्यापार संघ (डऋअउ)च्या माध्यमातून व कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्थेच्या सहकार्याने 1 एप्रिल 2021 रोजी ज्योत्स्ना प्रशांत तळोले यांच्या अध्यक्षतेखाली मलकापूर तालुका कृषी विकास फार्मर प्रोड्यूसर कंपनी लि.ची स्थापना करण्यात आली. त्या माध्यमातून परिसरातील 750 शेतकरी बांधवांना एकत्रित करून कामाला सुरुवात केली. कंपनीने खाद्यतेलात भरीव असे कार्य केले आहे. तेलनिर्मितीला सुरुवात करण्यापूर्वी कंपनीच्या अध्यक्षा ज्योत्स्नाताईंचे पती प्रशांत तळोले यांनी लातूर येथे पाच दिवसांचे
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील प्रसिद्ध उद्योजक व स्वातंत्र्यसैनिक विष्णू सावजी यांनी 1902 साली जिनिंग फॅक्टरी सुरू केली. हा बुलढाणा जिल्ह्यातला पहिला कापूस उद्योग मानला जातो. तब्बल सव्वाशे वर्षांची वस्त्रोद्योगाची (जिनिंग मिलची) परंपरा लाभलेल्या या सावजी (महाजन) कुटुंबाने तीन पिढ्या औद्योगिक वारसा जपला आहे, इतकेच नव्हे, तर त्याचा विस्तार करून त्याला अनेक उद्योगांचे आयाम जोडून तो समृद्ध केला आहे.
मलकापूर तालुका हा समृद्ध आणि अत्यंत सुपीक काळ्या मातीचा आहे. कापूस, सोयाबीन, मका या पिकांत अग्रेसर तालुका म्हणून मलकापूरची ओळख आहे. शिवाय डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनअंतर्गत तालुक्याला 10 शेतकरी गटाचा 50 हेक्टर प्रतिगटप्रमाणे उद्दिष्ट असून गटनिर्मिती पूर्तता झाली आहे. येत्या काळात या तालुक्यात सोयाबीन, मका व कापसावर उद्योग उभा राहिला, तर शेतकर्यांची आणखीन उन्नती होण्यास वाव आहे.
क्रिकेटचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 10व्या वर्षी उत्तर प्रदेशच्या खेड्यातून मुंबईत आलेला आणि इथे एकटं राहून आपलं आयुष्य घडवणारा मुलगा म्हणजेच सध्याचा भारतीय क्रिकेटचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल! आक्रमक, कुठलेही आव्हानात्मक फटके खेळताना न बिचकणारा, पण तरीही सातत्यपूर्ण धावा करणारा यशस्वी सध्या क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलाय. अशा या यशस्वी जयस्वालच्या उत्तर प्रदेश ते मुंबई प्रवासाचा आणि आझाद मैदानातील तंबू ते कसोटी क्रिकेटमधील दोन द्विशतकं या उत्तुंग कामगिरीचा आढावा घेणारा लेख...
भारतीय बुद्धिबळ विश्व गेल्या दोन वर्षांत पूर्णपणे बदलल्याचं जाणवतंय आणि ह्याला कारणीभूत आहेत आपले नव्या दमाचे तरुण खेळाडू. भारताकडे अगदी आत्तापर्यंत 83 ग्रँडमास्टर होते, त्यात आता एकने भर पडली आहे. हे 84वं नाव अनेक कारणांनी महत्त्वाचं आहे, कारण तब्बल एका तपानंतर भारताला एक महिला ग्रँडमास्टर मिळाली आहे आणि ग्रँडमास्टर मानांकन मिळवणारी तिसरी महिला खेळाडू ठरली आहे. वैशालीला मिळालेले ग्रँडमास्टर हे मानांकन तिला आणखी चांगली कामगिरी करण्यास प्रेरित करेल हे नक्की.
पहिले 10 सामने या स्पर्धेत भारतीय संघासाठी फारसं काही चुकलंच नव्हतं. पण एका सामन्याने घात केला. यालाच क्रिकेट म्हणतात, कारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे. रोहित आणि त्याच्या संघाने मागचा दीड महिना क्रिकेट चाहत्यांचं निखळ मनोरंजन केलं आहे आणि त्यासाठी हा संघ कौतुकास पात्र आहे. एक सामना गमावला म्हणून हे कौतुक कमी होणार नाही.
आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये हळूहळू भारत आपला ठसा उमटवत आहे. ‘खेलो इंडिया’सारख्या स्पर्धांचाही ह्या यशात नक्कीच काही प्रमाणात वाटा आहे आणि भविष्यात तो वाढणार आहे. देशात अशा प्रकारे खेळाडूंना प्रोत्साहन मिळू लागलं, तर भविष्यात भारत खेळात अव्वल ठरेल. आशियाई खेळांमधील 107 पदकं भारताच्या भविष्यातील ऑलिम्पिक यशाची नांदी आहे. ह्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांना उत्तरोत्तर यश मिळत राहो आणि भारताचा तिरंगा खेळाच्या मैदानात सतत फडकत राहो, ही सदिच्छा!
संघ हेच रामभाऊ बोंडाळे यांचे जीवन होते. त्यांनी स्वत:ला संघकार्याला समर्पित केले होते. आयुष्यभर प्रचारक म्हणून काम करता करता ते पूर्णपणे संघमय झाले होते. त्यांना स्वत:चे वेगळे अस्तित्व राहिले नव्हते. ‘असु अम्ही सुखाने पत्थर पायातील’ हा त्यांचा मनोमन भाव होता आणि इदं न ममं ही जाणीव होती. अशा रामभाऊंना विनम्र श्रद्धांजली.
संघऋषी रामभाऊ बोंडाळे केशवचरणी अर्पित झाले. संघ कसा जाणून घ्यायचा आणि जाणून घेतलेला संघ कसा जगायचा, हे त्यांनी जगून दाखविले. येणार्या असंख्य पिढ्यांना प्रेरणा मिळेल असे जीवन रामभाऊ जगले. ही शब्दसमिधा मी त्यांच्या जीवनयज्ञास अर्पण करतो.
महाराष्ट्र प्रांताचे सेवा कार्य प्रमुख म्हणून आणि प्रचारक म्हणूनही काही वर्षे कार्य करणारे व कार्यमग्न कार्यकर्ता कसा असावा याचे आदर्श प्रतीक असलेले डॉ. वसंतराव कुंटे यांचे शनिवार दि. 27 जानेवारी 2024 रोजी दु:खद निधन झाले. मृत्युसमयी ते पुण्यात मुलाच्या घरी वास्तव्यास होते. त्यांच्या संदर्भातील जुन्या आठवणींना उजाळा देणारा लेख.
भाऊंच्या जीवनाचे प्रयोजन केवळ ‘स्वान्तसुखाय’ नव्हतेच. ज्या समाजात मी वाढलो, त्या समाजाचे मी काही देणे लागतो आणि त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काहीतरी करणे ही माझी जबाबदारी आहे, नव्हे, ते माझे नैतिक कर्तव्य आहे या संघसंस्काराचा परीसस्पर्श त्यांच्या जीवनाला झाला होता. त्यांनी आपल्या जीवनात संघकार्याला महत्त्वपूर्ण स्थान दिले.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संस्था हा संघकामाचाच एक भाग आहे, याचे भान नानांनी कधी सोडले नाही. म्हणून मीपणाचा लोभ, सामूहिक निर्णय प्रक्रिया, राष्ट्रभक्तीचा भाव असे सगळे विषय त्यांनी प्रत्येक संस्थेत रुजविले. नानांनी जो उपक्रम हाती घेतला, तो सक्षम कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला आणि दुसर्या उपक्रमात रममाण झाले.
विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक… साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…
पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
75 वर्षे हा मोठा कालखंड! विवेकपूर्वी सुरू झालेली आणि विवेकनंतर सुरू झालेली कितीतरी साप्ताहिके काळाच्या ओघात लुप्त झाली. पण विवेक अजूनही ऐन उमेदीत आहे. कालानुरूप आपल्यात बदल करण्यात ज्यांना यश येते, तेच कालप्रवाहात टिकून राहतात. विवेकमध्ये कालानुरूप काही बदल अवश्य झालेले आहेत. मात्र काही बाबतीत विवेक अजिबात बदललेला नाही. कारण विवेक कशासाठी चालवायचा हे आमच्यासमोर स्पष्ट आहे. हिंदू समाजाशी संबंधित अनेक विषयांत न थकता, न कंटाळता, आळस न करता सतत जागृती करावी लागते. हे विवेकने स्वीकारलेले व्रत आहे. घेतला वसा टाकू
या शतायुषी कार्याच्या इथवरच्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांचा आणि वर्तमानाचा विवेकच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने घेतलेला वेध...
इजिप्तमधील कार्नाक मंदिर त्याच्या भव्यतेने भारून टाकते. भव्यता हा इजिप्तमधील मंदिरांचा स्थायिभाव आहे. कार्नाक मंदिरही याला अपवाद नाही. इजिप्तमधील छोट्यात छोट्या पुरातन मंदिरांची उंची कमीत कमी सात मजली तरी असतेच! अवाढव्य ’हायपोस्टाइल हॉल’ हे कार्नाक मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे. याला ’हॉल’ कसे म्हणावे इतका तो अजस्र आहे. भारतातील कोणार्क मंदिर सूक्ष्म तपशिलांनी आकर्षित करते. दगडामध्ये एवढे सूक्ष्म तपशील कोरणे त्या काळात कसे साध्य केले असेल, याचे आश्चर्य वाटते. एका दृष्टीने कोणार्क मंदिर हे विज्ञान आणि सौंदर्य य
‘बंगलोर डेज’ या चित्रपटात तीन भावंडांची गोष्ट आहे. लग्नसंस्थेचा आणि कुटुंबसंस्थेचा अनुभव ह्यातील तिन्ही मुलांसाठी वेगवेगळा आहे, परंतु तरीही आयुष्यभरासाठी साथ देणारा सोबती शोधायची इच्छा तिघांचीही आहे. त्यासाठी स्वत: बदलण्याचीसुद्धा त्यांची तयारी आहे. प्रत्येक कुटुंबात ऊन आणि चांदण्याचा पाठशिवणीचा खेळ चालूच असतो. एकमेकांसाठी आपण आहोत एवढी जाणीव त्यातून बाहेर यायला मदत करते, हा संदेश हा चित्रपट देतो.
Vivek saptahik - साप्ताहिक विवेक
लोकमान्यांनी बसवलेल्या गणपतीची नावे कशी बदलत गेली ?
‘हा’ गणपती आहे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
…आणि लोकमान्य भावूक झाले
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये