पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील सर्वात उंच प्रभू श्रीरामांचा पुतळा ठरलेल्या काणकोण येथील 77 फुटी मूर्तीचे अनावरण केले आणि एक अध्यात्मिक केंद्र बनलेला गोव्यातील श्री गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ लोकांच्या चर्चेत आला. मठाचे विद्यमान स्वामीजी प.पू श्रीमद् विद्याधीश तीर्थ यांच्या शुभसंकल्पातून मठाच्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ही मूर्ती साकारली आहे. भावी काळातील एक आकर्षण आणि धार्मिक पर्यटन केंद्र ठरू पाहणार्या या मठाच्या प्रेरणादायी वाटचालीवर भाष्य करीत या भव्य मूर्ती निर्मितीचा प्रवास कथन
इस्लाममध्ये विकृत अशी तथाकथित धर्मतत्त्वे पिढ्यानपिढ्या जोपासली गेली. त्यामुळे सगळ्याच मुसलमानांच्या धारणा समान झाल्या आहेत. असे वातावरण दहशतवादासाठी पोषक आणि हे काम निर्वेध करण्यासाठी सुरक्षित जागा महत्त्वाची. आजच्या काळात ती जागा फक्त शैक्षणिक संस्थाच देऊ शकतात. किंबहुना शिक्षणसंस्था या पांढरपेशा दहशतवादाचे आगार झालेले आहे. समाजसेवेचा वा शैक्षणिक संस्थेचा मुखवटा घातला की सुरक्षा यंत्रणांना गाफील ठेवता येते. त्याशिवाय अनुदानातून करोडो रूपयांची देणगी आणि त्याहून महत्त्वाचे आपले कट्टरपंथी अतिरेकी विचार पुढी
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ध्वजारोहणाचा प्रसंग म्हणजे फक्त एका विशिष्ट ध्वजाचे आरोहण नव्हते. हा प्रसंग म्हणजे फक्त संकल्पसिद्धी सुद्धा नव्हती. या प्रसंगाचे महत्त्व, या सर्वांपेक्षा बरेच जास्त आहे. ही धर्मध्वजा फडकवण्याचा प्रसंग म्हणजे भारताच्या स्वतंत्र, सार्वभौमिक धोरणाची जाहीर ग्वाही आहे. हा प्रसंग म्हणजे देशासाठी सर्वार्थाने एक युगारंभ आहे. स्वाभिमानाचा, ‘स्व’बोध जागरणाचा, देशात निर्माण होत असलेल्या प्रचंड आत्मविश्वासाचा..!
क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांचा समन्वय होतो तेव्हा राष्ट्र स्वबोधजागृतीने उभे राहते, ही आपली परंपरा आहे. नरेंद्र मोदी हे क्षात्रतेजाचे प्रतीक आहेत आणि मोहनजी भागवत हे ब्राह्मतेजाचे प्रतीक आहेत. ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांच्या समन्वयातून राष्ट्रतेज प्रकट होते. या दोघांचा समन्वय म्हणजेच राष्ट्रीय अस्मिता.
सीपीआय (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेच्या केंद्रीय समितीचा सदस्य क्रूरकर्मा हिडमा याच्या खात्म्यामुळे भारतातील माओवादी दहशतवाद आता मरणासन्न अवस्थेत पोचला आहे. या घटनेने नक्षलवादी आणि आताच्या माओवादी तथाकथित चळवळीचे ’पशुपती ते तिरुपती रेड कॉरिडॉर’चे स्वप्न कायमचे ध्वस्त केले. राष्ट्रीय सुरक्षेबाबत सरकारने राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर काय घडू शकते हेच यातून स्पष्ट होते.
आपली राष्ट्रीय अस्मिता प्राण पणाला लावून कशी जपायची असते त्याचे जितेजागते उदाहरण म्हणजे हे मंदिर आहे. त्याला समोर ठेवत, आपल्या परंपरांचा डोळस अभिमान बाळगत देश म्हणून आपल्याला पुढे जायचे आहे असे पंतप्रधानांनी सांगितले. मात्र त्यासाठी गरज आहे ती मानसिक गुलामीतून बाहेर पडण्याची. ही भूमी 1947 साली ब्रिटिश जोखडातून मुक्त झाली असली तरी 190 वर्षांपूर्वी मेकॉलेने दिलेले मानसिक गुलामीचे जोखड अद्याप मानेवरून पूर्णपणे उतरलेले नाही, याचा स्पष्ट उच्चार त्यांनी केला. ‘आनेवाले दस वर्षों मे भारत को गुलामी की मानसिकता से मु
संघशताब्दीच्या सुमुहूर्तावर 'विवेक' वाचक परिवारात सहभागी व्हा. यातून संघविचारांचा प्रसार व्हायला हातभार लागेल. यातून समविचारी लोकांचे वर्तुळ वाढेल. तुम्हीही त्या वर्तुळाचा एक बिंदू व्हावे यासाठी हा प्रेमाचा आग्रह.
दरवर्षी 6 डिसेंबरला म्हणजे महापरिनिर्वाणदिनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण होते. हे स्मरण अर्थपूर्ण होण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी आपल्या राष्ट्रावर जे अनंत उपकार करून ठेवले आहेत त्याची जाणीव ताजी करणे हे आपले कर्तव्य आहे. गौरीशंकर शिखरासमान उंची लाभलेले महापुरुष फार दूरवरचे पाहू शकतात. पं. नेहरूंच्या ठरावातील दुर्बळ केंद्र सरकार नाकारून डॉ. बाबासाहेब ठामपणे म्हणाले की, मला मजबूत केंद्र सरकारच आवडते. त्यामुळे राज्यांना अमर्याद अधिकार त्यांनी दिले नाहीत. त्यांनी अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय लोकशाही नाकारली. पं
धर्म भारताचा आत्मा आहे आणि आपल्या संविधानाचा पाया प्राचीन भारतीय धर्मच आहे. आपल्या संविधान निर्माणकर्त्यांपैकी बहुतेकांना आपल्या प्राचीन धर्मविचारांचे चांगले ज्ञान होते. घटनासमितीत धर्माच्या सार्वभौमत्वावर चर्चा झालेली आहे. धर्माचे असे स्मरण करण्याचे कारण असे की, भारतीय आत्मतत्त्वाचे प्रतिबिंब राज्यघटनेत आलेले आहे, म्हणूनच 26 नोव्हेंबर या आपल्या संविधानदिनी आपली राज्यघटना काळानुसार धर्मचक्र फिरते ठेवणारी आहे, हे आपण जाणून घेतले पाहिजे
संघाची प्रारंभापासूनच हीच भूमिका राहिली आहे की भारतात राहणार्या सर्व लोकांचे धर्म किंवा उपासना पद्धती भिन्न असल्या तरी पूर्वज, संस्कृती आणि मातृभूमी सर्वांची एकच आहे. त्यामुळे सर्वांची ओळख ही भारतीय किंवा हिंदुस्तानी म्हणून आहे. संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यापासून डॉ. मोहन भागवत यांच्यापर्यंत सर्व सरसंघचालकांनी हीच भूमिका वारंवार मांडली आहे. मुस्लीम राष्ट्रीय मंचाने 2002 मध्ये स्थापनेपासूनच याच भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. सातत्याने हे मांडले जात असल्याने अलीकडे मुस्लीम समाजातही हा विचार रू
महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतील अनेक विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. ही शैक्षणिक बाजू अगदी सक्षमपणे सांभाळताना बदलत्या काळात आणि सामाजिक परिस्थितीत भारतीय मूल्ये आणि विचारधारा यांची आजच्या शिक्षणाशी सांगड घालण्याची नितांत गरजही प्रकर्षाने जाणवते. याच गरजेतून भारतीय ज्ञानपरंपरेच्या सहाय्याने समाजाला आकार देण्याच्या हेतूने संस्थेने 129 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत ‘आकार’ या नवीन शाखेची स्थापना केली. त्यानिमित्त हा लेखन प्रपंच.
भारतीय अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात आता भरारी घेत आहे आणि भारताच्या अनेक अवकाश मोहिमा यशस्वी झाल्या आहेत. तसेच इस्रोकडून भविष्यातील चांद्रयान 5 आणि गगनयान मोहिमांसाठी जोरदार तयारी सुरू आहे. त्यामुळे यापुढे अनेक साहसी मोहिमा इस्रोकडून यशस्वी पूर्ण होतीलच. नक्की या मोहिमा कशा असतील, त्याचबरोबर यापूर्वी ंयशस्वी झालेल्या मोहिमांबद्दल माहिती देणारा लेख...
नाशिकच्या ग्रमाविकासच्या कार्यकर्त्यांनी गारे काकांच्या पश्चात त्यांच्याकडून घेतलेल्या प्रेरणेने यंदाही वनवासी पाड्यात जाऊन भगिनींबरोबर भाऊबीज आणि स्नेहभोजन करून दिवाळी सण साजरा केला.
पुणे : हिंदू धर्मात ’गोदान’ करण्याचे फार मोठे महत्त्व सांगितले आहे. सवत्स धेनूचे दान अधिक पुण्यकारक समजले जाते. हिंदुस्थान प्राचीन काळापासून कृषीप्रधान देश असल्याने शेती आणि शेतकरी यांच्याशी निगडित उपक्रम आपल्या संस्कृतीची सुंदर सामाजिक वीण अधोरेखित करतो. काळाच्या ओघात या संस्काराकडे दुर्लक्ष झालेले दिसते. तथापि सध्याच्या स्थितीतही दुर्मीळ झालेला ’गोदान’ संस्कार कधीकधी घडतो. हा गोदानाचा संस्कार पुण्याजवळ, हिंगणघाट (उरळीकांचन) ता. हवेली येथे नुकताच पार पडला.
पुण्यमयी गोदावरी माईच्या पवित्र तीरावर जेव्हा सायंकाळच्या पावन आरतीच्या मंगलघंटा निनादू लागतात, तेव्हा निसर्गही थांबून त्या क्षणाचा साक्षीदार होतो. मात्र यंदाच्या आरतीत एक वेगळंच तेज, वेगळीच अनुभूती होती; जेव्हा शीख समुदायाच्या भाविकांच्या भावपूर्ण घोषणा त्या मंत्रगजरात मिसळल्या...
नामकरण हा विधी नवीन बाळाला त्याची ओळख देतो. तसेच बाळाला दिलेले नाव त्याला आपल्या भूमीशी, आकाशाशी, संस्कृतीशी, भाषेशी, देवाशी, धर्माशी आणि भारतीय विज्ञानाशी जोडते. आपल्या नावाविषयी आपल्याला आणि जवळच्यांना आस्था उत्पन्न होते. म्हणून नाव ‘आपले’ असावे.
ससून रूग्णालयात येणार्या रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांनाही आपल्या मूलभूत गरजांवर खचर्र् करणे क्रमप्राप्त असते. रूग्णांची औषधे आणि आपल्यावर होणार्या खर्चाकडे बघता रूग्ण हेच त्यांच्यासाठी अग्रक्रम असतात. पोटाला चिमटा काढून रूग्णांची सेवा काहीवेळेस करावी लागते. असे चित्र पाहून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून उत्कृष्ट दर्जाचे अन्नदान करावे हे अत्यंत स्तुत्य कार्य सुरेश भिकचंदजी डाकलिया आणि परिवाराच्या हातून घडत आहे.
कोविड आता आपल्यासोबत राहाणारा विषाणू आहे आणि जेव्हा जेव्हा त्याला संधी मिळणार तेव्हा तेव्हा तो डोकं वर काढणार. ज्यावेळी कोविड वाढतोय अशा बातम्या दिसतील तेव्हा घाबरून न जाता सावध होणे गरजेचे आहे. या आजाराच्या कटू आठवणी मागे टाकून मनातल्या भीतीवर मात केली पाहिजे. कोविडला आता घाबरण्याची गरज नाही, कारण आता हा नूतन विषाणू नाही.
लातूर येथील विवेकानंद रुग्णालय सर्वपरिचित आहे. स्थानिक वैद्यकीय गरजा ओळखून त्यांची पूर्तता करण्यासाठी रुग्णालय सदैव तत्पर असते. बारा-तेरा वर्षांपूर्वी रुग्णालयाला कर्करोग चिकित्सा व उपचार हा नवा आयाम जोडला गेला आणि त्या कामातून आणखी एका आयामाचा जन्म झाला. तो आयाम म्हणजे रुग्णसेवा सदन. ग्रामीण भागातील कर्करोगाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईक यांना उपयुक्त ठरलेला हा आयाम आहे.
HMPV या आजाराची भिती ओसरत असतानाच GBS म्हणजे गिलान बार या आजाराचा उद्रेक झाला आहे. याविषयी सर्वात महत्त्वाची म्हणजे, वैद्यकीय क्षेत्राला गेली अनेक दशके या आजाराविषयी माहिती आहे. मात्र हा आजार संसर्गजन्य नसल्याने तसेच हा दुर्मिळ आजार असल्याने या आजाराचा उद्रेक होणे ही घटना नवी आहे. यानिमित्त अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, मात्र एकजुटीने आणि वैज्ञानिक पद्धतीने त्याचा प्रतिकार करायला हवा.
रानभाज्यांपैकी विविध गुणवैशिष्ट्ये जपलेली भाजी म्हणजे करटुली. नांदेड जिल्ह्यातील सुमनबाई बोराळे यांनी यंदाच्या हंगामात अवघ्या दहा गुंठ्यांत नैसर्गिक पद्धतीने करटुले या रानभाजीची यशस्वी पैदास करत लाखोची कमाई केली आहे. आंतरपीक म्हणून टोमॅटोचे उत्पादन घेतले आहे. कमी खर्च व उत्पन्नात वाढ या सूत्राने त्यांनी सर्वांसमोर शेतीकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन ठेवला आहे.
भात पिकाचे अवशेष आणि त्यापैकी पळींज यामध्ये सर्वांत जास्त सिलिकाचे प्रमाण असते आणि बहुतेक सर्व शेतकरी या पळींजाकडे निरुपयोगी आहे म्हणून दुर्लक्ष करतात आणि टाकून देतात. खरेतर पळींज, भाताचा पेंढा, कोंडा आणि तांदूळ आदी महत्त्वाचे अवशेष आहेत. पिकांची कीड, रोग आणि निसर्गनिर्मित होणार्या प्रतिकूल घटकांशी सामना करण्याची क्षमता या अवशेषात असते.
हरभरा हे रब्बी हंगामातील महाराष्ट्रातील मुख्य कडधान्य पीक. शेतकरी बांधवांनी या पिकाची लागवड करताना मध्यम ते भारी तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी सुपीक जमीन निवडावी. चोपण व आम्लयुक्त जमिनीत हे पीक घेण्याचे टाळावे. कोरडवाहू परिस्थितीमध्ये जमिनीची कमीत कमी मशागत करावी जेणेकरून जमिनीतील ओल टिकवून राहण्यास मदत होईल.
महाराष्ट्रात गेल्या काही दशकांपासून मका पिकात वाढ दिसून येत आहे. बदलत्या हवामानात देखील शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी बांधव मका पिकाकडे वळले आहेत. तृणधान्य व चारा याव्यतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात व इथेनॉल निर्मितीत मक्याची मागणी वाढत आहे, याव्यतिरिक्त मानवी आहार व कुक्कुटपालनातील वापरामुळे मक्याला चांगला भाव मिळत आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याने त्यांना बर्याच वर्षांच्या संघर्षानंतर स्वत:ची ओळख मिळालीय. खरं तर त्यांची मागच्या दहा वर्षांतील कामगिरी बघितली तर विश्वचषकातील विजय हा कधी ना कधी त्यांच्या पदरात पडलाच असता. पण तो प्रत्यक्ष पडला की, भोवतालची परिस्थिती कशी बदलते याचा अनुभव आता महिला क्रिकेटपटूंना येईल. विराट आणि रोहितसारखे त्यांना लक्षावधी चाहते नसतील. पण, नवीन चाहता वर्ग आणखी वाढेल एवढं नक्की.
जॉर्जियातील बटुमी येथे 5 ते 29 जुलै या दरम्यान फिडे महिला विश्वचषक खेळला गेला. गेल्या 3-4 वर्षांत बुद्धिबळ खेळात भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे, मात्र त्यात प्रामुख्याने गुकेश, प्रज्ञानंद, अर्जुन अशा पुरुष खेळाडूंची नावे सातत्याने ऐकायला मिळत होती. पण ह्यावेळी महिलांनीही तोडीस तोड कामगिरी करून दाखवली आणि एकीकडे तेंडुलकर - अँडरसन कसोटी क्रिकेट मालिका उत्कंठावर्धक स्थितीत असतानाही समाजमाध्यमांना आपली नोंद घ्यायला भाग पाडलं. महिलांचा हा विश्वचषक भारतीय खेळाडूंनीच गाजवला आणि थेट जेतेपदाला गवसणी घात
ऑस्ट्रेलियातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघाने मिळवलेलं हे यश आहे. या दोन अपयश आणि यशांमध्ये तुलना नाही होऊ शकणार. ऑस्ट्रेलियातील कामगिरीनंतर झालेली चर्चा एकदम थांबणार आहे. रोहित आणि विराट आणखी किती काळ भारतीय संघात खेळणार? विराट जून महिन्यांत इंग्लंड दौर्यावर जाणार हे जवळ जवळ नक्की आहे. पण, रोहितला ती संधी मिळणार का? ही चॅम्पियन्स करंडकानंतर तो निवृत्तीचा निर्णय जाहीर करणार? रोहितनंतर संघाचं एकदिवसीय आणि कसोटीतील नेतृत्व नेमकं कुणाकडे जाणार? मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांच्या कामगिरीचं मूल्यमाप
यंदाची 24 वी राष्ट्रीय वनवासी खेलकूद प्रतियोगिता छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे 27 ते 31 डिसेंबर या कालावधीत संपन्न झाली. या स्पर्धा म्हणजे प्रचंड ऊर्जेने भारलेला क्रीडा महोत्सव असतो. तिरंदाजी आणि फुटबॉल या दोन प्रकारांमध्ये यंदाची स्पर्धा झाली. यानिमित्त वनवासी क्षेत्रातील युवकांची खेळामधील प्रतिभा शोधतानाच त्यांना राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडवणे आणि खेळाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता दृढ करणे हे वनवासी कल्याण आश्रमाचे प्रमुख उद्दिष्ट साकार होत आहे.
साखर उद्योग व प्रामुख्याने महाराष्ट्रातील खाजगी साखर उद्योगाचा भक्कम पाया उभा करण्यामध्ये वसंतराव देवधरांचा सिंहाचा वाटा आहेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांना कर्ज पुरवठ्याचे एक नवे दालन उपलब्ध करून देणे व त्या माध्यमातून अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांची सुद्धा भरभराट होण्यासाठीची संधी निर्माण करण्याचे शिल्पकार म्हणून वसंतराव देवधरांचे नाव अग्रस्थानी राहील यात मुळी शंका नाही. वसंतराव देवधरांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख.
वसंतराव देवधरांचे कार्य प्रेरणास्वरूप असेच होते. समर्पित स्वयंसेवक म्हणून त्यांचा आदर्श आहेच, त्यासोबत त्यांनी अनेक संस्थाना मूर्त रूप दिले आणि त्यांच्या विस्तारासाठी कायम आग्रही व प्रयत्नशील राहिले.
सातपुडा पर्वतरांगांमधील अत्यंत दुर्गम भागात निवास करत असलेल्या हजारो भिल्ल-पावरा वनवासी बांधवांना आपला कुणी वाली आहे की नाही? आपण खरंच माणूस आहोत का? असे अनेक प्रश्न जेव्हा सतावत होते तेव्हा लखन भतवाल नावाचा एक कार्यकर्ता या सर्व बांधवांच्या मदतीला धावून आला. त्यांच्या दृष्टीने हा अक्षरशः देवच! वनवासी समाजाने लखनजींना आपल्या निरलस प्रेमाने एवढे चिंब भिजवले की, लखन भतवाल नावाची ही व्यक्ती ’लखा पावरा’ या नावाने कशी ओळखली जाऊ लागली आणि या भागातील भोळीभाबडी वनवासी मंडळी न्यायालयात आपल्या या लखा देवाची शपथ कशी घ
...त्याच्यामधल्या जिंदादिल वृत्तीनं मृत्यूवरही एकवार मात केली. 11 नोव्हेंबरला जेव्हा सर्वांनी त्याची आशा सोडली होती, तेव्हा यमराजाला झुकांडी देऊन तो परत आला. पण 24 नोव्हेंबर 2025 या दिवशी मात्र त्याच्यासारख्या बुलंद व्यक्तीलाही मृत्यूपुढे हार पत्करावी लागली. अभिनेता धर्मेंद्र हा एक खिलाडू आणि सुस्वभावी माणूस होता. जीवनमृत्यूच्या खेळात एकदा जीवदान मिळालं, त्यावर समाधान मानून त्यानं आपला ओरिजिनल ‘ढाई किलो का हाथ’ आयुष्याच्या हातातून सोडवून घेतला.
साईबाबांची सम्यक ओळख करून देणारा आशयपूर्ण पुस्तक - साई माझा सांगाती
आपण आत्मचरित्रे, चरित्रे वाचलेली असतात. हे दोन्ही साहित्यप्रकार सर्वश्रुत आहेत. मात्र ”विचार-चरित्र” हा एक आगळावेगळा चरित्रप्रकार एका पुस्तकाच्या निमित्ताने समोर आला, ते पुस्तक म्हणजे रवींद्र गोळे लिखित ’गिरीश प्रभुणे-जसे कळले तसे’ हे होय!
भारतीय ज्ञानपरंपरेमध्ये विशिष्ट विषयाचे ज्ञान पूर्वीपासून अस्तित्वात होते असे एखाद्या भारतीय अभ्यासकाने सांगितले तर त्यावर विश्वास बसत नाही, परंतु तीच गोष्ट एखाद्या पाश्चिमात्य विद्वानाकडून ऐकली की मग मात्र ती पटते, अशी अनेक भारतीयांची मानसिकता असते. आयआयटी कानपूर येथून डॉक्टरेट मिळवलेल्या भास्कर कांबळे यांच्या बाबतीतही असेच झाले.
‘विवेक प्रकाशन’ गेली अनेक वर्षे राष्ट्र व समाजोपयोगी विषयांवर अभ्यासपूर्ण अशी पुस्तके प्रकाशित करीत असतेच. त्याशिवाय मानवाचे आरोग्य व्यवस्थित असेल तर समाज निरोगी राहू शकेल, या भावनेने योगाचार्य मनोज पटवर्धन यांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. यंदाच्या योग दिनानिमित्त योगाचार्य मनोज पटवर्धन यांचे ‘प्राणायाम - एक अमृतानुभव’ हे पुस्तक प्रकाशित करीत आहे. याच पुस्तकातील ही प्रस्तावना.
‘पुत्र ज्ञानदेवतेचा’ या गौरवग्रंथाच्या रूपाने बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचा पट वाचकांसमोर प्रस्तुत होत आहे. संपादक आशुतोष अडोणी यांनी प्रस्तुत ग्रंथाच्या प्रस्तावनेतून बाळशास्त्रींच्या विचारांचे सूत्र आणि चिंतनाची व्यापकता यांचे उत्कृष्ट विवेचन केले आहे.
अमेरिका, इंग्लंड, युरोप अशा प्रसिद्ध देशांवर अनेक प्रवासवर्णने वाचायला मिळतात; पण एक असा देश ज्याबद्दल मी तरी फारशी पुस्तके बघितली नाहीत. ते नाव म्हणजे नायजेरिया. हे नुसतंच प्रवासवर्णन नाही, तर ही लेखकाची एक छोटीशी कहाणी आहे. फारसा नावारूपाला न आलेला असा हा नायजेरिया. लेखक राजेश कापसे यांनी आरोग्य विभागातील नोकरी करून तिथली माणसं, परंपरा, चालीरीती समजून घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
"Hindus in Hindu Rashtra" या पुस्तकात काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय, 1995 वक्फ कायदा, शिक्षण क्षेत्रातील घटना दुरुस्तीचा हिंदू शाळांवर झालेला परिणाम, देशात कशा प्रकारे हिंदूंवर अन्याय झाला आहे. याची पुराव्यानिशी मांडणी लेखकांनी केली आहे भारतात हिंदू बहुसंख्याक (तेही विभागलेले) असले, तरी जगात अल्पसंख्याक आहेत. अत्यंत छोट्या पण हिंदूंच्या डोळ्यात अंजन घालणार्या पुस्तकाविषयी...
आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संस्था हा संघकामाचाच एक भाग आहे, याचे भान नानांनी कधी सोडले नाही. म्हणून मीपणाचा लोभ, सामूहिक निर्णय प्रक्रिया, राष्ट्रभक्तीचा भाव असे सगळे विषय त्यांनी प्रत्येक संस्थेत रुजविले. नानांनी जो उपक्रम हाती घेतला, तो सक्षम कार्यकर्त्यांच्या हाती सोपविला आणि दुसर्या उपक्रमात रममाण झाले.
विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक… साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit, sed do eiusmod tempor incididunt ut labore et dolore magna aliqua.
‘केशवार्पण’ हे पुस्तक म्हणजे प्रकल्प चालवणारे कार्यकर्ते आणि लाभार्थी यांच्या भावबंधनाचे अप्रतिम चित्रण आहे. यानिमित्त प्रकल्पाच्या मूळ प्रेरणेचे आणि त्या प्रेरणेला मध्यवर्ती ठेवून कार्य करणार्या कार्यकर्त्यांच्या मनोभावाचे दर्शन झाले आहे. आपल्या आसपास दिसणार्या समस्यांवर शोधलेले उत्तर म्हणजे हे प्रकल्प आहेत. त्यांचे स्वरूप कमी-जास्त असेल, पण त्यामागची भावना उदात्त आहे, हे या पुस्तकातून लक्षात येते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील उत्तेजानार्थ क्रमांक प्राप्त संतोष पाटील यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील तृतीय क्रमांक प्राप्त डॉ. अविनाश भोंडवे यांची कथा...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, 'सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील द्वितीय क्रमांक विजेती कथा..
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील प्रथम क्रमांक विजेती कथा..
Vivek saptahik - साप्ताहिक विवेक
लोकमान्यांनी बसवलेल्या गणपतीची नावे कशी बदलत गेली ?
‘हा’ गणपती आहे हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक
…आणि लोकमान्य भावूक झाले
आकर्षक देखावे हे ‘या’ गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्ये